AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फेब्रुवारी महिन्यात ‘या’ पिकांची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा, काय आहे शास्त्रज्ञांचा सल्ला?

फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यात उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी शक्य आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुख्य पिकांच्या पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याचे भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे वेळेत पेरण्या केल्या तर पिकांची वाढ जोमात होणार असून उत्पादनातही फरक पडणार आहे. शेतकऱ्यांना या हंगामात मार्चमध्ये मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीसाठी प्रमाणित बियाणे खरेदी करण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.

फेब्रुवारी महिन्यात 'या' पिकांची लागवड करा अन् भरघोस उत्पादन मिळवा, काय आहे शास्त्रज्ञांचा सल्ला?
फेब्रुवारी महिन्यात पिकांची जोपासणा आणि पालभाज्याची लागवड याबाबत कृषी संशोधन संस्थेने सल्ला दिला आहे.
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 23, 2022 | 4:13 PM
Share

मुंबई : फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम टप्प्यात उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी शक्य आहे. त्यामुळे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून ते मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुख्य पिकांच्या (Crop Sowing) पेरणीसाठी पोषक वातावरण असल्याचे (Agricultural Research Institute) भारतीय कृषी संशोधन संस्थेच्यावतीने सांगण्यात आले आहे. त्यामुळे वेळेत पेरण्या केल्या तर पिकांची वाढ जोमात होणार असून उत्पादनातही फरक पडणार आहे.  (Farmer) शेतकऱ्यांना या हंगामात मार्चमध्ये मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीसाठी प्रमाणित बियाणे खरेदी करण्याचा सल्ला शास्त्रज्ञांनी दिला आहे.पेरणी करण्यापूर्वी बियाणांवर रायझोबियम आणि फॉस्फरस विद्रव्य जीवाणूंचा मिसळणे गरजेचे आहे. या बीज प्रक्रियेमुळे बियांणा किडीचा प्रादुर्भाव होणार नाही. मूगामध्ये-पुसा विशाल, पुसा बैसाखी, पीडीएम-11, एसएमएल-32 तर उडीदमध्ये पंत उडीद-19, पंत उडीद-30, पंत उडीद-35 आणि पीडीयू-1 या वाणाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या आठवड्यात तापमानात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी भेंडी लागवड करताना प्रमुख जातींमध्ये ए-4, परबानी क्रांती, अर्का अनामिका या बियाणांची निवड करावी. लागवड करण्यापूर्वी शेत भिजवणे गरजेचे आहे.हवामान लक्षात घेता या आठवड्यात टोमॅटो, मिरची, भोपळ्याची भाजी या तयार रोपांची लागवड करू शकतात.

पालेभाज्यांना हवे हलके पाणी

आता तापमानामध्ये वाढ होण्यास सुरवात झाली आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या वतीन हा सल्ला 27 फेब्रुवारीपर्यंत असल्याचे सांगितले आहे. पिकांची पेरणी आणि आहे ते जोपासण्यासाठी हा सल्ला आहे.या सप्ताहात वाढते तापमान व जोरदार वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आवश्यकतेनुसार पिके व भाजीपाल्यात हलके पाणी देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

गहू पिकाचे असे करा व्यवस्थापन

बदलत्या हवामानामुळे पिकांवर रोगावरही लक्ष ठवणे गरजेचे आहे. सध्याच्या वातावरणामुळे गव्हाच्या पिकातील काळा, भुरा किंवा पिवळा चट्टा आल्यावर पिकामध्ये डिथान एम-45 हे 2.5 ग्रॅम हे 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे. पिवळ्या चट्टा घालवण्यासाठी 10-20 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. तर 25 अंश सेल्सिअसपेक्षा अधिकचे तापमानात हा आजार होत नाही. काळा चट्टा घालवण्यासाठी फवारणी करताना 20 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आणि आर्द्रता विरहित हवामान आवश्यक असते.

भाज्या आणि मोहरीत चेपाचा आजार

सध्याचे कोरडे व वाढते तापमान लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी सर्व भाजीपाला व मोहरीच्या पिकांमध्ये चेपा या किडीचा प्रादुर्भाव वाढतो. या किडीच्या नियंत्रणासाठी भाज्यांची तोड झाल्यावर इमिडाक्लोप्रिड 0.25-0.5 मि.लि. हे 1 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी लागणार आहे.फवारणीनंतर आठवडाभर भाजीपाल्याची तोडणी करु नये.बियाणे असलेल्या म्हणजेच भेंडी, गवार अशा भाज्यांवर चेपाने केलेल्या हल्ल्याकडे विशेष लक्ष द्या.

संबंधित बातम्या :

Rabi Season: हरभऱ्याचे क्षेत्र वाढले-उत्पादन घटले, अंतिम टप्प्यात नेमके काय झाले ?

बाजार समितीमध्ये मापात-पाप, 300 ग्रॅममुळे लाखोंचे व्यवहारच बंद, काय आहे नेमके प्रकरण?

ऊस लागवड करतानाच होते तोडणीचे नियोजन तरी गोदाकाठच्या ऊसाला फडातच तुरे..!

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ