AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

E-Pik Pahani : खरिपात घडले रब्बीत मात्र बिघडले, असे नांदेड जिल्ह्यात नेमके काय झाले?

खरीप हंगामात 'ई-पीक पाहणी' ही प्रणाली नवखी असतानाही या माध्यमातून राज्यात सर्वाधिक पिकांच्या नोंदी ह्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यामुळे नुकसानभरपाईच्या दरम्यान अनेक शेतकऱ्यांना त्याचा उपयोगही झाला होता. लाखो शेतकऱ्यांना मदत मिळाली होती. एवढे सर्व होऊन देखील रब्बी हंगामात 'ई-पीक पाहणी'च्या माध्यमातून नोंदणीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

E-Pik Pahani : खरिपात घडले रब्बीत मात्र बिघडले, असे नांदेड जिल्ह्यात नेमके काय झाले?
संग्रहीत छायाचित्र
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 15, 2022 | 4:30 PM
Share

नांदेड : खरीप हंगामात (E-Pik Pahani) ‘ई-पीक पाहणी’ ही प्रणाली नवखी असतानाही या माध्यमातून राज्यात सर्वाधिक (Records of crops) पिकांच्या नोंदी ह्या शेतकऱ्यांनी केल्या होत्या. त्यामुळे नुकसानभरपाईच्या दरम्यान अनेक शेतकऱ्यांना त्याचा उपयोगही झाला होता. लाखो शेतकऱ्यांना मदत मिळाली होती. एवढे सर्व होऊन देखील (Rabi Season) रब्बी हंगामात ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून नोंदणीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. कारण ‘ई-पीक पाहणी’च्या माध्यमातून आतापर्यंत केवळ 25 हजार एवढ्या शेतकऱ्यांनीच नोंदणी केली आहे. त्यामुळे नेमके गणित कुठे चुकले असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्ह्यात 3 लाख 50 हजार हेक्टरावर पेरणी झाली आहे. मात्र, मोबाईल अॅपच्या माध्यमातून पिकांच्या नोंदणीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे भविष्यात नुकासन देखील होणार आहे.

खरिपात जोमात, रब्बीत मात्र कोमात

खरीप हंगामाच्या दरम्यान ई-पीक पाहणी ही प्रणाली नवीन होती. त्यामुळे शेतकरी कशा नोंदी करणार हा प्रश्न प्रशासनापुढे होता. असे असतानाही राज्यात 89 लाख शेतकऱ्यांनी नोंदी केल्या होत्या. दरम्यान, नांदेड जिल्ह्यातून सर्वाधिक पिकांच्या नोंदी ह्या झाल्या होत्या. त्यावेळी महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने जनजागृती करण्यात आली होती. याशिवाय बांधावर जाऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यामुळे उद्दीष्टाप्रमाणे शेतकऱ्यांच्या नोंदी ह्या झाल्या होत्या. आता रब्बी हंगामात पिक नोंदणीकडे शेतकऱ्यांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.

केवळ 25 हजार खातेदारांनीच केल्या नोंदी

खरिपाप्रमाणे रब्बी हंगामातील पिकांच्या नोंदीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात आले होते. मात्र, या दरम्यानच्या काळात ना शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता ना प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये. त्यामुळे ‘ई-पीक पाहणी’ मध्ये केवळ 25 हजार खातेदारांनीच पिकांच्या नोंदी केल्या आहेत. खरीप हंगामात 1 लाख 93 हजार 709 जणांनी पिकांच्या नोंदी केल्या होत्या. त्यामुळे रब्बी हंगामात यामध्ये अणखीन वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र, पीक पेऱ्याच्या नोंदणीची अंतिम मुदत जवळ येत असातानाही या मोहिमेला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकासान झाले तर शेतकऱ्यांना मदत मिळणार की नाही याबाबत साशंका आहे.

हरभरा विक्रीसाठीही अडचण

हरभरा काढणीला सुरवात झाली आहे. आता हमी भाव केंद्र सुरु झाल्यावर या केंद्रावरच शेतकऱ्यांना हरभऱ्याची विक्री करावी लागणार आहे. मात्र, याकरिता ऑनलाईन पेरा नोंदणी केलेला सातबारा आवश्यक आहे. असे असतानाही पेरलेल्या पिकांच्या नोंदी ह्या ई-पीक पाहणीच्या माध्यमातून केलेली नाही. त्यामुळे आता खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री करताना शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार आहेत.

संबंधित बातम्या :

Turmeric : राजापुरी हळदीचा ‘राजेशाही’ थाट..! आवक सुरु होताच विक्रमी दर

Sugarcane : ऊसाचे क्षेत्र वाढूनही मोबदला मिळेना, काय आहेत फडातल्या अडचणी?

Latur Market: शेतकऱ्यांनो हीच ‘ती’ योग्य वेळ, सोयाबीन दर स्थिरावले, आता घ्या निर्णय..!

Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा