AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded: उन्हाच्या झळा त्यात बुरशीचा प्रादुर्भाव, 20 वर्षापासून मोसंबी फळबाग जोपसणाऱ्या शेतकऱ्याची अनोखी कहाणी

असे म्हणतात एखाद्या व्यवसायामध्ये 3 वर्ष सातत्य ठेवले तर त्या व्यवसायाचा जम बसतो. मात्र, शेती याला अपवाद आहे. कारण 3 नव्हे तर गेली 20 वर्ष मोसंबी फळबागाची जोपासणा करुन नांदेडच्या शेतकऱ्याला अद्यापही अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हेमंत पाटील यांनी 20 वर्षापूर्वी 350 मोसंबीची लागवड केली होती. मात्र, बुरशीजन्य रोगामुळे वर्षाकाठी 5 ते 6 झाडे ही नष्ट होत आहेत.

Nanded: उन्हाच्या झळा त्यात बुरशीचा प्रादुर्भाव, 20 वर्षापासून मोसंबी फळबाग जोपसणाऱ्या शेतकऱ्याची अनोखी कहाणी
वाढत्या उन्हामध्ये फळबागांचे व्यवस्थापन गरजेचे आहे.Image Credit source: TV9 Marathi
Reporter Rajiv Giri
Reporter Rajiv Giri | Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 14, 2022 | 11:16 AM
Share

नांदेड : असे म्हणतात एखाद्या व्यवसायामध्ये 3 वर्ष सातत्य ठेवले तर त्या व्यवसायाचा जम बसतो. मात्र, (Farming) शेती याला अपवाद आहे. कारण 3 नव्हे तर गेली 20 वर्ष (Mosambi Orchard) मोसंबी फळबागाची जोपासणा करुन (Nanded) नांदेडच्या शेतकऱ्याला अद्यापही अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील हेमंत पाटील यांनी 20 वर्षापूर्वी 350 मोसंबीची लागवड केली होती. मात्र, बुरशीजन्य रोगामुळे वर्षाकाठी 5 ते 6 झाडे ही नष्ट होत आहेत. फळबाग जोपासण्यासाठी ठिबक सिंचन, औषध फवारणी वेळच्यावेळी केल्यानंतर अपेक्षित उत्पादन मिळते मात्र, व्यापारी अन् किरकोळ विक्रेत्यांच्या तावडीतून योग्य दरच पदरी पडत नाही. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारभावातील फटका यामुळे गेल्या 20 वर्षात शेती व्यवसाय काही उबदार आल्याचे चित्र नाही.

दीड एकरामध्ये 250 मोसंबीची झाडे

पारंपरिक पिकांना बाजूला सारत हेमंत पाटील यांनी तब्बल 20 वर्षापूर्वी मोसंबी फळबागेचा प्रयोग केला होता. दर्जेदार आणि केमिकल मुक्त फळ ग्राहकांना मिळावे म्हणून त्यांनी सेंद्रीय पध्दतीने बाग जोपासण्याचा निर्धार केला होता. यामुळे मात्र, उत्पादनात घटच होत गेल्याने पुन्हा त्यांनी रासायनिक खतांचा वापर सुरु केला होता. असे असले तरी मोसंबी बागेवर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे त्यांची 100 झाडे ही नष्ट झाली असून यंदा तर बुरशीबरोबर वाढत्या उन्हाचाही परिणाम झाला आहे. कधी निसर्गाचा लहरीपणा तर कधी बाजारपेठेतील घटते दर यामुळे गेल्या 20 वर्षात अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

कष्ट शेतकऱ्यांचे फायदा व्यापाऱ्यांना

केवळ उत्पादन वाढून उपयोग नाहीतर बाजारपेठेतील दरावरही सर्वकाही अवलंबून आहे. शेतकरी स्वत:चा शेतीमाल स्वत: विकू शकत नाही. याकरिता व्यापाऱ्यांची मध्यस्ती ही ठरलेलीच आहे. त्यामुळे शेतीमाल पिकवणे हातामध्ये असले तरी त्याचे मूल्य हे व्यापारी करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांपेक्षा अधिकचा फायदा हा व्यापारी आणि किरकोळ विक्रत्ये यांना होत आहे.

यंदा वाढत्या उन्हाबरोबर बुरशीचा प्रादुर्भाव

फळबागांवरील बुरशीमुळे वर्षाकाठी मोसंबीची झाडे ही नष्ट होत आहेत. त्याचा थेट परिणाम हा उत्पादनावर होत असून हे कमी म्हणून की काय यंदा वाढत्या उन्हाचाही धोका निर्माण झाला आहे. वाढत्या उन्हामुळे फळांची गळती होतेय. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झाडांवर बुरशीजन्य आजाराचे प्रमाण वाढलंय. सध्या बाजारात मोसंबीची मागणी मोठया प्रमाणात वाढली आहे पण उत्पादनात घट झाली आहे.

संबंधित बातम्या :

Agricultural Department : ज्वारीची उत्पादकता वाढली उत्पादन घटले, दरावर काय होणार परिणाम ?

Washim : निर्णय झाला पण दिलासा नाही, शेती सिंचनासाठी सोडलेल्या पाण्यावर टांगती तलवार

Onion Market : कांदा दराला उतरती कळा, उन्हाळी हंगामात उत्पादन वाढलं पण दरामुळे नाही साधलं

Follow Us
उदय सामंत: 'एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य'
उदय सामंत: एमआयडीसीच्या समस्यांवर लक्ष, मराठी भाषेला प्राधान्य
मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे
'मराठीची सक्ती नाही मराठीची भक्ती आहे', रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरून शिंदेंची प्रतिक्रिया
मराठी न बोलल्यास परवाना रद्द करण्याच्या धमक्यांवरचा दुबेंचा इशारा
संजय दुबे यांचा प्रताप सरनाईक यांच्या मराठी भाषेच्या सक्तीला थेट विरोध
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल
प्रवीण दरेकर यांचा नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यावर हल्लाबोल:
शरद पवार एनडीएमध्ये जाणार नाहीत, विरोधातच राहणार
पवारांकडून एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या; पक्ष कार्यकर्त्यांना दिले स्पष्ट निर्देश
देशमुखांचं कारागृह महानिरीक्षकांना पत्र; गैरप्रकारांच्या चौकशीची मागणी
धनंजय देशमुखांचे बीड कारागृह महानिरीक्षकांना पत्र: गैरप्रकार चौकशी आणि आरोपी स्थलांतराची मागणी
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
भाजप-शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर? ठाण्यातील कार्यक्रमात भाजप नेत्यांची अनुपस्थिती
बेस्ट कामगारांचा बेमुदत संप; प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
बेस्ट कामगारांचा मंगळवारपासून बेमुदत संप: प्रलंबित मागण्यांसाठी कर्मचारी आक्रमक
पालकमंत्री महाजनांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पहिल्याच दिवशी ठाकरे गटाचे आंदोलन
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना मदत
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून गरजू रुग्णांना अवयव प्रत्यारोपणासाठी मदत