AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solapur : सोलापूरच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, सात गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड, लाखो रुपयांचं उत्पन्न

करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 3 येथील विकास वाघमोडे या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी केला आहे. त्यांना केवळ सात गुंठे क्षेत्रावर पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. इतर शेतकऱ्यांनी सुध्दा अशा पद्धतीने शेती करावी असं त्यांनी सांगितले आहे.

Solapur : सोलापूरच्या शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग, सात गुंठ्यात स्ट्रॉबेरीची लागवड, लाखो रुपयांचं उत्पन्न
karmalaImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 04, 2023 | 12:20 PM
Share

करमाळा : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील करमाळा (karmala) तालुक्यातील उजनी धरणाच्या (Ujani Dam) कुशीत शेतीचा यशस्वी प्रयोग पाहायला मिळाला आहे. वांगी नंबर 3 येथील शेतकरी विकास वाघमोडे यांनी सात गुंठे क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड केली होती. त्यातून त्यांना लाखो रुपयांचा फायदा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. करमाळा तालुक्यात हा चर्चेचा विषय ठरला आहे. त्याचबरोबर शेती पाहण्यासाठी तिथं नागरिक गर्दी सुध्दा करीत आहे. सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरुन शेती करुन अनेकांनी आतापर्यंत लाखो रुपये कमावल्याचे आपण पाहिले आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील वातावरण पाहता स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी होणार असा लोकांचा समज होता.

करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 3 येथील विकास वाघमोडे या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचा यशस्वी केला आहे. त्यांना केवळ सात गुंठे क्षेत्रावर पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. इतर शेतकऱ्यांनी सुध्दा अशा पद्धतीने शेती करावी असं त्यांनी सांगितले आहे.

स्ट्रॉबेरी म्हटले की, आपल्यासमोर उभा राहतो तो सातारा जिल्हा, अन् महाबळेश्वर परिसर स्ट्रॉबेरीचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणारा म्हणून हा भाग ओळखला जातो. सोलापूर जिल्हयातील हवामान स्ट्रॉबेरीसाठी प्रतिकूल नसल्याने येथे स्ट्रॉबेरीचे उत्पादन होऊ शकणार नाही असा समज होता. परंतु हा निष्कर्ष चुकीचा ठरवत करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 3 येथील विकास वाघमोडे या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरी शेतीचे आवाहन स्वीकारत ही शेती यशस्वी करून आपल्या सात गुंठे क्षेत्रामध्ये पाच लाख रुपयांचे उत्पादन मिळवले आहे. सात गुंठे क्षेत्रात 4 हजार रोपांची लागवड केली होती. यासाठी 1 लाख 13 हजार रुपये खर्च झाला होता. तर त्यातून त्यांना पाच लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे.

महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत शेती करीत असताना अनेक प्रयोग केले आहेत. त्यासाठी त्यांनी विविध कृषी प्रदर्शनं पाहली आहे. त्याचबरोबर शेतीच्या तज्ज्ञांच्या साहाय्याने शेती केली आहे. पारंपारिक शेती करीत असताना शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Follow Us
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप