AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक मेनंतर गाळप झालेल्या उसाला प्रति टनामागे 200 रुपयांचे अनुदान ; संपूर्ण गाळप होईपर्यंत कारखाने सुरू ठेवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

एक मेनंतर गाळप झालेल्या उसाला आता प्रति टनामागे 200 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच संपूर्ण गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरूच ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

एक मेनंतर गाळप झालेल्या उसाला प्रति टनामागे 200 रुपयांचे अनुदान ; संपूर्ण गाळप होईपर्यंत कारखाने सुरू ठेवा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 18, 2022 | 7:27 AM
Share

मुंबई : राज्यात उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. यंदा उसाचे (Sugar cane) अतिरिक्त उत्पदन झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या उसाला अद्यापही तोड आलेली नाही. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर जादा ऊस क्षेत्र आहे. अनेक शेतकऱ्यांचे (farmers) ऊस गाळप शिल्लक असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. दरम्यान या शेतकऱ्यांना दिलासा दिण्यासाठी संपूर्ण गाळप होईपर्यंत कारखाने सुरूच राहणार असल्याचे राज्य सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एक मेनंतर गाळप झालेल्या सर्व उसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून 200 रुपये प्रति टनाप्रमामे अनुदान देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे सुमारे 100 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवर पडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली या बैठकीमध्ये ऊस गाळप अनुदान म्हणून 200 रुपये प्रति टनाप्रमामे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरूच ठेवावेत असे निर्देश देखील यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार साखर कारखाने आता संपूर्ण गाळप होईपर्यंत सुरू राहणार असल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात एक मे 2022 नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे 52 लाख टन गाळप अपेक्षित आहे. त्यामुळे हा अतिरिक्त 100 कोटी रुपयांचा भार सरकारी तिजोरीवर पडणार आहे.

ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत

दरम्यान गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध झाले. पाणी असल्याने अनेक शेतकरी हे उसाच्या शेतीकडे वळले. परिणामी चालू हंगामात तब्बल 2.25 लाख हेक्टर जादा ऊस क्षेत्र वाढले आहे. यामुळे साखरे कारखान्यांचे नियोजन कोलमडले असून, मे महिना सुरू झाला तरी देखील अनेक शेतकऱ्यांच्या उसाला अद्यापही तोड आलेली नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र आता मुख्यमंत्र्यांकडून संपूर्ण गाळप होईलपर्यंत साखर कारखाने सुरूच ठेवण्याचे आदेश देण्यात आल्याने शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.