AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain in Thane : जोरदार आणि धुवाँधार! ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या 106 टक्के पाऊस; खरीपाची सुमारे 87 टक्के लागवड

Rain in Thane : खरीप हंगामासाठी सुमारे 133 टक्के रासायनिक खतांचा पुरवठा झाला असून खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यातील 112 कृषी सेवा केंद्रांतुन खतांची व 120 कृषी सेवा केंद्रांतुन बियाणे विक्री केली जात आहे.

Rain in Thane : जोरदार आणि धुवाँधार! ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या 106 टक्के पाऊस; खरीपाची सुमारे 87 टक्के लागवड
जोरदार आणि धुवाँधार! ठाणे जिल्ह्यात सरासरीच्या 106 टक्के पाऊस; खरीपाची सुमारे 87 टक्के लागवडImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 29, 2022 | 12:57 PM
Share

ठाणे: ठाणे जिल्ह्यात (thane) कालपर्यंत सरासरीच्या 106 टक्के पाऊस झाला (rain in thane) असून खरीपाची सुमारे 87 टक्के लागवड झाली आहे. जिल्ह्यात या हंगामासाठी सुमारे 133 टक्के रासायनिक खतांचा पुरवठा करण्यात आला आहे. जिल्ह्यात खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला आहे. विविध योजनेंतर्गत ठाणे जिल्ह्यात 177 शेतीशाळा सुरु असून 5310 शेतकरी बांधवाना प्रशिक्षण दिले जात असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ (mohan wagh) यांनी सांगितले. तालुकानिहाय पावसाचे प्रमाण पाहता ठाणे तालुक्यात 97 टक्के, कल्याणमध्ये 96 टक्के, मुरबाड 96.50 टक्के, भिवंडी 106.60 टक्के, शहापूर 126.70 टक्के, उल्हासनगर 123.70 टक्के तर अंबरनाथ तालुक्यात 156.80 टक्के पाऊस झाला आहे. जिल्ह्यात कालपर्यंत सुमारे 1653.50 मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरीच्या 106.10 टक्के असल्याचे कृषी विभागाने सांगितले.

दमदार पाऊस झाल्यान खरीपाची लागवड जवळपास पूर्ण होत आली आहे. आतापर्यंत ठाणे जिल्ह्यात 87 टक्के लागवड झाल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक मोहन वाघ यांनी सांगितले. त्यामध्ये भात 47 हजार 169 हेक्टरवर (85.88 टक्के) लागवड झाली आहे. नागली 1825.50 हेक्टर (75.85 टक्के), वरी 992.40 हेक्टर (94 टक्के) तर तूर 4327 हेक्टर (104.70 टक्के) अशी लागवड झाली आहे.

खते आणि बियाणांची विक्री जोरात

खरीप हंगामासाठी सुमारे 133 टक्के रासायनिक खतांचा पुरवठा झाला असून खते, बियाण्यांचा पुरेसा पुरवठा करण्यात आला. जिल्ह्यातील 112 कृषी सेवा केंद्रांतुन खतांची व 120 कृषी सेवा केंद्रांतुन बियाणे विक्री केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या सेस फंडातून 800 क्विंटल भात बियाणे शेतकरी बांधवांना 50 टक्के अनुदानावर देण्यात आले आहे. जिल्ह्यातील 542 गावामध्ये शेतकरी बांधवानी घरचे नागली व भात बियाणे पेरणीसाठी वापरले असल्याने 3 टक्के मिठाच्या द्रावणाची व जैविकखताची बिजप्रक्रिया करणेचे प्रात्याक्षिके व प्रशिक्षण त्यांना देण्यात आले आहे.

जिल्ह्यात 177 शेतीशाळा सुरु

राष्ट्रीय कृषि विकास योजनेतून जिल्ह्यातील कमी उत्पादकता असलेल्या गावात भातपिकाचे रत्नागिरी 8 वाणाचे प्रमाणीत बियाणेचे भात पिकांचे पिक प्रात्यक्षिके 580 हेक्टर क्षेत्रावर राबविण्यात येत आहे. 232क्विंटल बियाणे 50 टक्के अनुदानावर पुरवठा करण्यात आले आहे. विविध योजनेंतर्गत जिल्ह्यात 177 शेतीशाळा सुरु असून 5310 शेतकरी बांधवाना प्रशिक्षण दिले जात आहे. क्रॉपसप योजनेच्या माध्यमातून भात व नागली पिकावरील कीड, रोग इत्यादी सर्वेक्षण सुरु असून शेतकरी बांधवाना किड/रोग नियंत्रणाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले जात असल्याचे वाघ यांनी सांगितले.

भात पिकाचा विमा काढा

जिल्ह्यातील भात उत्पादक शेतकरी बांधवांचा पिक विमा योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत एकूण 31 हजार 44 शेतकऱ्यांनी भात पिकाचा विमा उतरविला आहे. त्यामाध्यमातून 12 हजार 543 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी भात पिकाचा विमा काढावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

Follow Us
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
Kumbh Mela | बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या नावाने नेमकं काय घडलं?
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?