AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थकबाकी शेतकऱ्यांकडे नव्हे महावितरणकडेच, आंदोलनानंतरची बैठकही निष्फळ, आता तोडगा काय?

सध्या कृषीपंप थकबाकीवरुन विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा धडाका महावितरणकडून सुरु आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. मात्र, विद्युत पुरवठा खंडीत करणे हे बेकायदेशीर असून थकबाकी ही शेतकऱ्यांकडे नाही तर महावितरणकडेच असल्याचा दावा भाजपच्या वताीने करण्यात आला आहे.

थकबाकी शेतकऱ्यांकडे नव्हे महावितरणकडेच, आंदोलनानंतरची बैठकही निष्फळ, आता तोडगा काय?
Agricultural Pump
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Feb 03, 2022 | 9:36 AM
Share

सुनिल थिगळे : शिरुर : सध्या कृषीपंप थकबाकीवरुन (Light Connection) विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा धडाका महावितरणकडून सुरु आहे. त्यामुळे (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होत असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे. मात्र, विद्युत पुरवठा खंडीत करणे हे बेकायदेशीर असून (Arrears) थकबाकी ही शेतकऱ्यांकडे नाही तर महावितरणकडेच असल्याचा दावा भाजपच्या वताीने करण्यात आला आहे. महावितरणच्या कारवाई विरोधात केलेल्या आंदोलनादरम्यान हा आरोप भाजप उद्योग आघाडीच्यादतीने करण्यात आला आहे. महावितरणने उभारलेले विद्युत खांब, रोहित्र आणि मनोरा टॉवर हे शेतकऱ्यांच्या शेत जमिनीवरच असून या भागातील शेतकऱ्यांना 2003 पासूनची नुकसान भरपाई ही महावितरणकडून मिळालेली नाही. त्याचअनुशंगाने भाजपाच्या उद्योग आघाडीच्यावतीने शिरुर येथील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरु करण्यात आले होते.

वीज तोडणी करण्यास आलेले कर्मचारी परत जाणार कसे?

कृषीपंपाकडील वाढत्या थकबाकीमुळे सध्या विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय महावितरण कंपनीने घेतलेला आहे. ऐन रब्बी हंगामातील पिके बहरात असतानाच ही कारवाई होत असल्याने पिकांचे नुकसान होत आहे. मध्यंतरी निसर्गाचा लहरीपणा आणि आता ही कारवाई त्यामुळे शेतकऱ्यांचे न भरुन निघणारे नुकसान होत आहे. त्यामुळे वीजतोडणी करण्यास आलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यास पुन्हा माघारी फिरकू देले जाणार नसल्याचा इशारा भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने सरसकट विद्युत पुरवठा खंडीत करु नये उलट अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची मागणी आंदोलना दरम्यान करण्यात आली आहे.

आंदोलनानंतरची बैठकही निष्फळ

शेतकऱ्यांच्या विविध मागण्या आणि कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत करु नये म्हणून भाजप उद्योग आघाडीच्यावतीने शिरुर महावितरण कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनातील विविध मुद्यावर पदाधिकारी आणि महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्यामध्ये बैठक पार पडली मात्र, महावितरणची शेतकऱ्यांकडे नाही शेतकऱ्यांचीच महावितरणकडे थकबाकी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले शिवाय आता विद्युत पुरवठा खंडीत करण्यास कर्मचारी आले तर पुन्हा त्यांना माघारी फिरकू देणार नाहीत अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे ही बैठकही निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आता नेमका काय तोडगा निघणार हे पहावे लागणार आहे.

कारवाईमुळे पिकांचे नुकसान

सध्या निसर्गाचा लहरीपणा दूर झाला असला तरी महावितरणच्या कारवाईमुळे संकट कायम आहे. मुबलक प्रमाणात पाणी असतानाही केवळ विद्युत पुरवठा खंडीत केल्याने पिके सुकत आहेत. आता अवकाळी, गारठा या नैसर्गिक संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला होता. आता हे नवीनच संकट उभे राहत असल्याने शेतकरी आणि भाजप पदाधिकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

संबंधित बातम्या :

शॉर्टसर्किटमुळं दहा ते बारा एकर ऊस जळून खाक, टॅक्टरही जळाला; महावितरणचा गलथान कारभार

Onion Market: सोलापुरात कशामुळे होतेय रेकॉर्ड ब्रेक कांद्याची आवक? लासलगावही पिछाडीवर

Banana : केळीची आवक घटूनही दर स्थिरावलेलेच, केव्हा बदलणार चित्र?

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?