AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde : प्रोत्साहनपर रकमेसाठी तारिख पे तारिख, यांचं राजकारण त्यात शेतकऱ्यांचं मरण, रक्कम मिळणार नेमकी केव्हा..!

प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांना मिळणार याची घोषणा 2019 ला झाली असली तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने कोरोना, आर्थिक स्थिती ही कारणे सांगितली होती. एवढेच नाही गत अर्थसंकल्पात यासाठी किती निधी लागणार, शेतकऱ्यांना ते कसे वाटप होणार याबाबींची उकल करण्यात आली होती.

Eknath Shinde : प्रोत्साहनपर रकमेसाठी तारिख पे तारिख, यांचं राजकारण त्यात शेतकऱ्यांचं मरण, रक्कम मिळणार नेमकी केव्हा..!
सांकेतिक छायाचित्र
| Updated on: Aug 23, 2022 | 4:46 PM
Share

मुंबई : 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच मुख्यमंत्री (Udhav Thackeray) उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीची घोषणा केली होती. शिवाय राज्यभरातील लाखों शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभही मिळाला पण ज्यांनी नियमित (Repayment of loans) कर्ज परतफेड केले त्यांना काय असा सवाल उपस्थित झाला. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जफेड केली आहे त्यांना प्रोत्साहनपर रक्कम म्हणून 50 हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, कोरोना, आर्थिक अडचणी यासारखी कारणे सांगून ही मदत रक्कम शेतकऱ्यांना काही देऊ केली नाही. आता सरकार बदलले पण या रकमेचा प्रश्न कायम आहे. अर्थसंकल्पात निधीची तरतूदही झाली पण अद्यापही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळालेली नाही. आता (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यापासून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरवात होईल असे म्हटले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा निराशा पडली आहे.

शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच

प्रोत्साहनपर रक्कम शेतकऱ्यांना मिळणार याची घोषणा 2019 ला झाली असली तरी अद्यापही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. यापूर्वी महाविकास आघाडी सरकारने कोरोना, आर्थिक स्थिती ही कारणे सांगितली होती. एवढेच नाही गत अर्थसंकल्पात यासाठी किती निधी लागणार, शेतकऱ्यांना ते कसे वाटप होणार याबाबींची उकल करण्यात आली होती. मात्र, असे असतानाही अद्यापही एकाही शेतकऱ्यास या योजनेचा लाभ मिळालेला नाही.आता एकनाथ शिंदे यांनीच ही रक्कम सप्टेंबरपासून वितरीत होणार असल्याचे सांगितले आहे.

राजकारणात सर्वसामान्यांचा मात्र परवड

महाविकास आघाडी सरकारच्या काळात निर्णय झाला आणि अंमलबजावणीच्या अनुशंगाने त्याचे कामेही पार पडली. मात्र, राज्याचे राजकीय वातावरण असे काय ढवळून निघाले आहे की, घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासही राज्य सरकार राजकारण करीत आहे. अर्थसंकल्पात सर्व तरतूदी करण्यात आल्या आहेत. मात्र, ऐन वेळी राज्याचे राजकारण बदलून आता शिंदे सरकार सत्तेत आहे. असे असतानीही आता ही रक्कम सप्टेंबरपासून वितरीत केले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार लाभ

या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल. याचा लाभ लाखो शेतकऱ्यांना होणार आहे. यासंदर्भात राज्य सरकारनं घोषणा केली होती. तेव्हापासून मंत्रीमंडळाची मान्यता केव्हा मिळते. याची वाट शेतकरी पाहत होते. अखेर महाविकास आघाडीच्या सरकारनं हा निर्णय घेतला. यामुळं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.