AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded Farmer : शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत, नुकसानभरपाईसाठी आता आक्रमक पवित्रा, सरकारची भूमिका राहणार महत्वाची..!

मराठवाड्याची ओळख तशी दुष्काळी विभाग म्हणूनच आहे. पण गेल्या काही वर्षांपासून येथील चित्र बदलत आहे. यंदा तर नवलच झाले. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांचे सर्वाधिक नुकसानही याच जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून पेरणीपासून या पिकावर संकट ओढावले आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर निश्चित मानली जात आहे. गेल्या दोन महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याची नोंद आहे.

Nanded Farmer : शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत, नुकसानभरपाईसाठी आता आक्रमक पवित्रा, सरकारची भूमिका राहणार महत्वाची..!
नुकसानभरपाईसाठी नांदेडमधील शेतकरी हे आक्रमक झालेआहेत
| Edited By: | Updated on: Aug 30, 2022 | 5:45 PM
Share

नांदेड : यंदाच्या खरिपात होतं..नव्हतं ते पावसाने हिरावलेले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्यय अगदी सुरवातीलाच आला होता. असे असताना जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली खरी पण ती देखील नुकसानीचीच ठरली. जुलै आणि 15 ऑगस्टपर्यंत (Heavy Rain) पावसाने अशी काय हजेरी लावली की खरिपातील सर्व पिके ही तब्बल दीड महिना ही पिके पाण्यात राहिलेली आहेत. त्यामुळे (State Government) राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन मदत करावी, यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज, विनंत्या केल्या मात्र, राज्य सरकारने हे गांभिर्यांने घेतलेच नाही. आता शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळेच बळीराजा आता रस्त्यावर उतरुन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत आहे. (Nanded Farmer) नांदेड-लातूर मार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको करीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

नांदेडमध्ये सर्वाधिक पाऊस

मराठवाड्याची ओळख तशी दुष्काळी विभाग म्हणूनच आहे. पण गेल्या काही वर्षांपासून येथील चित्र बदलत आहे. यंदा तर नवलच झाले. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांचे सर्वाधिक नुकसानही याच जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून पेरणीपासून या पिकावर संकट ओढावले आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर निश्चित मानली जात आहे. गेल्या दोन महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे येथील परस्थिती आणि शेतकऱ्यांचे हाल पाहता त्वरीत मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

नांदेड-लातूर महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या

गेल्या महिन्याभरात केवळ पीक पाहणी दौरे झाले आहेत. शिवाय प्रत्येक लोकप्रतिनीधींनी केवळ मदतीचे आश्वासन दिले असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. नांदेड-लातूर या महामार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची कोंडी झाली होती. शिवाय यावेळी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

यंदा हंगामाच्या सुरवातीलाच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. तब्बल दीड महिना पावसामध्ये सातत्य राहिल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना भरपाईच्या अनुशंगाने हेक्टरी 50 हजार रुपये ते देखील जिरायतीसाठी आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये आर्थिक मदत करावी. एवढेच नाहीतर ओला दुष्काळ जाहीर होताच त्या निकषाप्रमाणे मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....