Nanded Farmer : शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत, नुकसानभरपाईसाठी आता आक्रमक पवित्रा, सरकारची भूमिका राहणार महत्वाची..!

मराठवाड्याची ओळख तशी दुष्काळी विभाग म्हणूनच आहे. पण गेल्या काही वर्षांपासून येथील चित्र बदलत आहे. यंदा तर नवलच झाले. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांचे सर्वाधिक नुकसानही याच जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून पेरणीपासून या पिकावर संकट ओढावले आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर निश्चित मानली जात आहे. गेल्या दोन महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याची नोंद आहे.

Nanded Farmer : शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत, नुकसानभरपाईसाठी आता आक्रमक पवित्रा, सरकारची भूमिका राहणार महत्वाची..!
नुकसानभरपाईसाठी नांदेडमधील शेतकरी हे आक्रमक झालेआहेत
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 5:45 PM

नांदेड : यंदाच्या खरिपात होतं..नव्हतं ते पावसाने हिरावलेले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा प्रत्यय अगदी सुरवातीलाच आला होता. असे असताना जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी चाढ्यावर मूठ ठेवली खरी पण ती देखील नुकसानीचीच ठरली. जुलै आणि 15 ऑगस्टपर्यंत (Heavy Rain) पावसाने अशी काय हजेरी लावली की खरिपातील सर्व पिके ही तब्बल दीड महिना ही पिके पाण्यात राहिलेली आहेत. त्यामुळे (State Government) राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन मदत करावी, यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज, विनंत्या केल्या मात्र, राज्य सरकारने हे गांभिर्यांने घेतलेच नाही. आता शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला आहे. त्यामुळेच बळीराजा आता रस्त्यावर उतरुन ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करीत आहे. (Nanded Farmer) नांदेड-लातूर मार्गावर शेतकऱ्यांनी रास्तारोको करीत ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली.

नांदेडमध्ये सर्वाधिक पाऊस

मराठवाड्याची ओळख तशी दुष्काळी विभाग म्हणूनच आहे. पण गेल्या काही वर्षांपासून येथील चित्र बदलत आहे. यंदा तर नवलच झाले. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांचे सर्वाधिक नुकसानही याच जिल्ह्यात झाले आहे. जिल्ह्यात सोयाबीनचे क्षेत्र अधिक असून पेरणीपासून या पिकावर संकट ओढावले आहे. त्यामुळे उत्पादनात घट तर निश्चित मानली जात आहे. गेल्या दोन महिन्यात सरासरीच्या दुप्पट पाऊस झाल्याची नोंद आहे. त्यामुळे येथील परस्थिती आणि शेतकऱ्यांचे हाल पाहता त्वरीत मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

नांदेड-लातूर महामार्गावर शेतकऱ्यांचा ठिय्या

गेल्या महिन्याभरात केवळ पीक पाहणी दौरे झाले आहेत. शिवाय प्रत्येक लोकप्रतिनीधींनी केवळ मदतीचे आश्वासन दिले असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी काहीच पडलेले नाही. त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी लोहा तालुक्यातील माळाकोळी येथील शेतकऱ्यांनी आंदोलन केले. नांदेड-लातूर या महामार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी ठिय्या दिला. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची कोंडी झाली होती. शिवाय यावेळी पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता.

काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?

यंदा हंगामाच्या सुरवातीलाच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे. तब्बल दीड महिना पावसामध्ये सातत्य राहिल्याने ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना भरपाईच्या अनुशंगाने हेक्टरी 50 हजार रुपये ते देखील जिरायतीसाठी आणि फळबागांसाठी हेक्टरी दीड लाख रुपये आर्थिक मदत करावी. एवढेच नाहीतर ओला दुष्काळ जाहीर होताच त्या निकषाप्रमाणे मदत करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.