AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kharif Season : खरिपातील पिके पाण्यात अ्न कृषी विभागाचे वरातीमागून घोडे, अनोख्या मोहिमेचा होईल का उपयोग?

खरीप हंगामातील उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने ज्या भागात अधिकचे पीक घेतले गेले त्यानुसार मार्गदर्शन पार पडले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकासाठी युरिया ब्रिकेट खताचा वापर, कीड रोग नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले आहे. शिवाय कपाशीच्या पिकांमध्ये कामगंध सापळे लावून किडीपासून पिकांचा बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

Kharif Season : खरिपातील पिके पाण्यात अ्न कृषी विभागाचे वरातीमागून घोडे, अनोख्या मोहिमेचा होईल का उपयोग?
कृषी विभागाच्या मार्गदर्शनानंतर खरीपाच्या उत्पादनात होईल का वाढ
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 30, 2022 | 4:35 PM
Share

पुणे : यंदा हंगामाच्या सुरवातीपासून (Kharif Season) खरिपावर निसर्गाची अवकृपा राहिलेली आहे. सुरवातीला वेळेवर वरुणराजाचे आगमन झाले नाही. त्यामुळे जूनच्या पंधरवाड्यात होणाऱ्या पेरण्या थेट जुलैच्या पहिल्या आठवड्यात झाल्या होत्या. शिवाय पेरणी होताच अतिवृष्टी आणि सततच्या पावसाने पिके पाण्यात होती. प्रतिकूल परस्थितीमुळे उत्पादनात घट निश्चित मानली जात आहे. पावसाने उघडीप दिल्यावर ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भावही वाढला होता. हे सर्व झाल्यानंतर  (Agricultural Department) कृषी विभागाने आता (Kharif Crop) खरीप पिके उत्पादन वाढीसाठीची मोहिम सुरु केली आहे. त्यामुळे या मोहिमेचा नेमका काय फायदा होईल असा प्रश्न पडला आहे. 17 ऑगस्ट ते 30 ऑगस्टपर्यंत या मोहिमेचे आयोजन केले होते. शेतकऱ्यांच्या हातून सर्वकाही गेल्यानंतर दिलेला सल्ला काय उपयोगाचा असा सवाल उपस्थित होत आहे.

कृषी विभागाच्या मोहिमेत नेमके मार्गदर्शन काय?

खरीप हंगामातील उत्पादनात वाढ होण्याच्या दृष्टीने ज्या भागात अधिकचे पीक घेतले गेले त्यानुसार मार्गदर्शन पार पडले आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात भात पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी भात पिकासाठी युरिया ब्रिकेट खताचा वापर, कीड रोग नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले आहे. शिवाय कपाशीच्या पिकांमध्ये कामगंध सापळे लावून किडीपासून पिकांचा बचाव कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे. पण हे सर्व करण्यासाठी कृषी विभागाला उशीर झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

भात उत्पादकांच्या जाणून घेतल्या समस्या

यंदा पुणे जिल्ह्यात धान पिकांमध्ये वाढ झालेली आहे. क्षेत्र वाढीबरोबर शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढावे यासाठी कृषी विभागाने यंदा अभिनव उपक्रम राबवला आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांना धानाचे उत्पादन वाढवावे कसे याबाबत मार्गदर्शन केले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी वापरायचा युरिया, किड रोग निंयत्रणासाठी काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले गेले आहे. शिवाय आगामी काळात नियोजन कसे असावे याबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने केलेल्या मार्गदर्शनाचा कितपत फायदा होणार हे पहावे लागणार आहे.

13 दिवस उत्पादन वाढीची मोहिम

राज्यात पावसाने उघडीप देताच यामधून शेतकऱ्यांना सावरता यावे यासाठी कृषी विभागाने यंदा अनोखा फंडा राबवला आहे. केवळ उत्पादन वाढीसाठी एक मोहिम राबवली जात आहे. यामध्ये त्या भागातील मुख्य पिकांनुसार मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे याचा फायदा शेतकऱ्यांना कितपत होणार हे पहावे लागणार आहे.

Follow Us
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा