AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिमानास्पद..! फलोत्पादन निर्यातीमध्ये महाराष्ट्रच नंबर ‘वन’, काय आहेत कारणे? वाचा सविस्तर

शेती व्यवसयामधले सर्वात मोठे संकट म्हणजे निसर्गाचा लहरीपणा. गेल्या तीन वर्षापासून तर याचा प्रत्यय अधिक तीव्रतेने येत आहे. मात्र, सुधारित वाण, यांत्रिकीकरणात झालेला बदल आणि शेतीमाल बाजारपेठेत पोहचवण्याची अत्याधुनिक प्रणाली यामुळे नैसर्गिक संकटावर देखील मात करुन शेतकरी उत्पादनात वाढ करीत आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही फळे आणि भाजीपाला निर्यातीमध्ये महाराष्ट्राने आपले नेतृत्व कायम ठेवले आहे.

अभिमानास्पद..! फलोत्पादन निर्यातीमध्ये महाराष्ट्रच नंबर 'वन', काय आहेत कारणे? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Feb 16, 2022 | 12:34 PM
Share

पुणे : शेती व्यवसयामधले सर्वात मोठे संकट म्हणजे निसर्गाचा लहरीपणा. गेल्या तीन वर्षापासून तर याचा प्रत्यय अधिक तीव्रतेने येत आहे. मात्र, सुधारित वाण, (In mechanization) यांत्रिकीकरणात झालेला बदल आणि (Agricultural Goods) शेतीमाल बाजारपेठेत पोहचवण्याची अत्याधुनिक प्रणाली यामुळे नैसर्गिक संकटावर देखील मात करुन शेतकरी उत्पादनात वाढ करीत आहे. प्रतिकूल परस्थितीमध्येही फळे आणि भाजीपाला (Export) निर्यातीमध्ये महाराष्ट्राने आपले नेतृत्व कायम ठेवले आहे. सन 2020-21 या वर्षात देशातून 15 लाख 74 हजार टन कांद्याची निर्यात झाली होती पैकी एकट्या महाराष्ट्रातून 8 लाख कांद्याची निर्यात होती. भाजीपाल्याप्रमाणेच फळांच्या निर्यातीमध्ये महाराष्ट्रच नंबर वन असल्याचे समोर आले आहे. गतवर्षी एकट्या महाराष्ट्रातून 1 हजार 500 कोटी रुपयांचे उत्पादन हे कांदा निर्यातीमधून मिळाले आहे. शेती व्यसायात होत असलेल्या बदलाचे चित्र आहे.

पायाभूत सुविधांमुळेच हे शक्य

काळाच्या ओघात उत्पादनात तर वाढ होतच आहे पण बाजार जवळ करण्यासाठी पायाभूत सुविधाही पुरवल्या जात आहेत. शेतीमाल निर्यातीसाठी आवश्यक असलेली विमानतळे, बंदरे, 10 कोरडी बंदरे ,क्वारंटाईन लॅब, फूडपार्क यासारख्या अत्याधुनिक सुविधा ह्या वाढत आहे. शिवाय शेतकरी हे स्वीकारत आहे. त्यामुळे वाढत्या उत्पादनाला योग्य बाजारपेठेची जोड मिळू लागली आहे. शिवाय शेतीमाल निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढत आहे.

भाजीपाला निर्यातीमध्ये कांदाच ‘टॉपवर’

कांदा हे बेभरवश्याचे पीक असले तरी देखील निर्यातीमध्ये आणि परकीय चलन मिळवून देण्यामध्ये या पिकाचा मोठा वाटा राहिलेला आहे. एवढेच नाही तर देशातील बाजारभाव टिकून ठेवण्यासाठी कांदा निर्यात उपयुक्त ठरत आहे. गतवर्षी देशातून 15 लाख 74 हजार टन कांद्याची निर्यात झाली. पैकी एकट्या महाराष्ट्रतील 8 लाख टन कांदा होता. कांद्याचे दर जरी घडीत बदलत असले तरी उत्पादनाच्या दृष्टीने त्याकडे पाहिले जात असल्याने दिवसेंदिवस क्षेत्र हे वाढत आहे.

कृषी विभागाचीही मोठी भूमिका

शेतामालाच्या निर्यातीबाबत शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे याकरिता पणन मंडळ आणि कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्याच्या ठिकाणी मार्गदर्शन केंद्राची उभारणी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ही सर्व प्रक्रिया माहित होत असून त्याचा शेतीमालाची निर्यात करताना फायदा होत आहे. तर दुसरीकडे पणन मंडळाकडूनही बाजारपेठा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत.

संबंधित बातम्या :

कृषी विभागाचा सल्ला, शेतकऱ्यांकडून अंमलबजावणी अन् उन्हाळी हंगामात झाली ‘ही’ क्रांती

Rabi Season : सकाळी थंडी अन् दुपारी उन्हाचा चटका, पिकांसाठी पोषक की हानिकारक..! काय आहे कृषितज्ञांचा सल्ला?

काय सांगता? महावितरणच देणार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई, एकाच मोर्चात अनेक प्रश्न मार्गी..!

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?