AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गाचा लहरीपणा त्यात बाजारपेठेतील अस्थिरता, गव्हाची विक्री की साठवणूक, पुन्हा शेतकरी संभ्रमात

नैसर्गिक संकटावर मात करीत अखेर रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला सुरवात झाली. ऐन काढणी सुरु असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पण अवकाळीने कृपादृष्टी दाखवली अन् रब्बीतील सर्वच पिकांना जीवदान मिळाले. मात्र, शेतकऱ्यांच्या संकटाची मालिक येथेच संपत नाही. अवकाळीचे संकट टळले तर आता बाजारपेठेतील दराची अस्थिरता शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे.

निसर्गाचा लहरीपणा त्यात बाजारपेठेतील अस्थिरता, गव्हाची विक्री की साठवणूक, पुन्हा शेतकरी संभ्रमात
रब्बी हंगामातील गव्हाची आवक सुरु झाली आहे पण बाजारपेठेतील दर घसरले आहेत.Image Credit source: TV9 Marathi
राजेंद्र खराडे
राजेंद्र खराडे | Updated on: Mar 27, 2022 | 2:03 PM
Share

औरंगाबाद : नैसर्गिक संकटावर मात करीत अखेर (Rabi Season) रब्बी हंगामातील पिकांच्या काढणीला सुरवात झाली. ऐन काढणी सुरु असतानाच ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. पण (Unseasonal Rain) अवकाळीने कृपादृष्टी दाखवली अन् रब्बीतील सर्वच पिकांना जीवदान मिळाले. मात्र, शेतकऱ्यांच्या संकटाची मालिक येथेच संपत नाही. अवकाळीचे संकट टळले तर आता बाजारपेठेतील दराची अस्थिरता शेतकऱ्यांची परीक्षा घेत आहे. कारण काढणीपर्यंत (Wheat Rate) गव्हाला उच्चांकी दर होता मात्र, रब्बी हंगामातील गहू बाजारात दाखल होताच 3 हजार रुपये क्विंटलवर गेलेला गहू थेट 2 हजार 300 वर येऊन ठेपला आहे. त्यामुळे आता सोयाबीन, कापूस, तूर याप्रमाणेच गव्हाचीही साठवणूक की विक्री हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

कशामुळे झाली दरात घट?

मध्यंतरी रशिया-युक्रेन युध्दाचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत झाला होता. गव्हाच्या मागणीत वाढ झाल्याने दर 3 हजार रुपये क्विंटलवर पोहचले होते. त्यामुळे यंदा वाढीव उत्पादनाबरोबरच वाढीव दरही मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मार्चच्या सुरवातीला गव्हाचे दर वाढलेले होते. पण आता चित्र बदलले आहे. बाजारपेठांमध्ये गव्हाला 1 हजार 900 ते 2 हजार 300 पर्यंतचा दर मिळत आहे. त्यामुळे गव्हाबाबत काय निर्णय घ्यावा या विवंचनेत शेतकरी आहेत.

रब्बी हंगामातील आवक सुरु पुढे काय?

सध्या रब्बी हंगामात पोषक वातावरणामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. त्यामुळे आवकही वाढली आहे. पण दरात सातत्याने घसरण होत असल्याने नेमकी साठवणूक की विक्री याबाबत शेतकरी चिंतेत आहे. पण अशाचप्रकारे आवक वाढत राहिली तर मात्र दरात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. केवळ गहूच नाही तर सध्या सोयाबीन, तूर आणि हरभऱ्याबाबतही अशीच परस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचा शेतीमाल बाजारात येताच अशी परस्थिती निर्माण होत आहे.

अवकाळीचे संकट टळले, दराच्या कचाट्यात शेतीपिके

रब्बी हंगामातील काढणी सुरु असतानाच मराठवाड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. एवढेच नाही तर पावसाचाही अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, अवकाळीने अवकृपा दाखवली नाही त्यामुळे नुकसान टळले होते. पण बाजारपेठेतील दरात चढउतार असल्याने शेतकऱ्यांवरील संकट हे कायम आहे. रशिया-युक्रेन युध्दाचा परिणा गव्हाच्या दरावर असला तरी इतर पिकांचीही हीच अवस्था आहे. त्यामुळे सुगी होऊनही शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार की नाही हा प्रश्न कायम आहे.

संबंधित बातम्या :

Weather Report : अवकाळीचे संकट टळले, आता वाढत्या ऊन्हाचा चटका, मार्चच्या अखेरीस होणार अंगाची लाहीलाही

Chickpea Crop : शेतकऱ्यांनो हमीभावाचाच घ्या आधार अन्यथा होईल नुकसान, ऊन-पावसाच्या खेळात घटले उत्पादन

पिंपळगाव बाजार समितीच्या एका निर्णयाचा हजारो शेतकऱ्यांचा फायदा, समितीमधील व्यवहारात आता नियमितता

Follow Us
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! खासगी अकॅडमी चालकाला अटक
TET पेपरफुटीचं महाराष्ट्र कनेक्शन उघड! सोलापुरातून खासगी अकॅडमी चालकाला अटक
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ!
रेवती सुळेंच्या रिसेप्शन सोहळ्यातील सर्वात खास व्हिडीओ! पंतप्रधान आणि रोहित पवारांच्या संवादादरम्यानच...
जरांगेंनी विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नये! अभ्यासपूर्ण बोला
Sachin Kharat | विशिष्ट समाजाच्या भावना दुखावू नका! अभ्यासपूर्ण बोला; सचिन खरातांचा जरांगेंना थेट इशारा
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार...
उबाठाचा मोठा डाव! शिवसेना पक्षाच्या 2018च्या घटनेनुसार... ठाकरेंचे वकील थेट निवडणुक आयोगालाच घेरणार?
वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना...
Vasai-Virar | वसई-विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ! विवा कॉलेज परिसर जलमय, रस्त्यांना नदीचं स्वरूप
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!