AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्याला झोडपले, महसूल विभागातील कर्मचारी संपावर, शेतकरी म्हणतात…

लागवडीवर केलेला खर्च देखील निघणार नसल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात काहीतरी योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी बळीराजा करू लागला आहे.

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने नंदुरबार जिल्ह्याला झोडपले, महसूल विभागातील कर्मचारी संपावर, शेतकरी म्हणतात...
रात्री गारपीटीसह पाऊस झाला. Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2023 | 10:55 AM
Share

जितेंद्र बैसाणे, नंदूरबार : नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यात सोमवारी रात्री अवघड पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं (Farmer) अतोनात नुकसान झालं आहे. एका आठवड्यात दोनदा अवकाळी पाऊस झाला असून पहिल्या पावसाचे पंचनामे पूर्ण होत नाही, तेवढ्यात दुसऱ्यांदा देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. मात्र कृषी विभागाने शेतीक्षेत्रातील प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. दुसरीकडे महसूल विभागातील (Department of Revenue) अधिकारी कर्मचारी जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी संपावर गेले असून, शेतकरी आता वाऱ्यावर असल्याचे दिसून येत आहे. या अवकाळी पावसात जीवितहानी झालेली नसल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे. या अवकाळी पावसात पंचनामे झाल्यानंतरच नुकसान किती झालंय हे स्पष्ट होईल. मात्र संपामुळे पंचनामे कधी होणार असे काहीच प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाला आहे. त्यामुळे मायबाप सरकारने लवकर काहीतरी करावं आणि शेतकऱ्यांच्या तोंडात गोड घास घालावा एवढीच माफक अपेक्षा शेतकरी राजा करू लागला आहे.

नंदूरबार जिल्ह्यात उन्हाळी लागवड करण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळी पीक म्हणून बाजरी, डांगर, टरबूज, मका, यासारखे पारंपरिक पीक सोडून सद्या स्थितीत ऐन उन्हाळ्यात ऊस पीक घेण्याकडे आता मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. जिल्ह्यातील बागायतदार शेतकरी ऊस लागवडीकडे अधिक भर देत आहेत. जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे पिकांना धोका निर्माण होणार आहे, तर दुसरीकडे पिकांना भावना त्यांनी शेतकरी आता ऊस लागवडीकडे अधिक वाढताना दिसून येत आहे. ऊस शेतीला ठिबकद्वारे पाणी दिल्याने पाणी देखील कमी लागत असतं. मात्र ऊसाला चांगला भाव मिळावा एवढीच अपेक्षा आता शेतकरी करत असल्याने ऊस लागवडीकडे अधिक भर देत आहे.

शेतकऱ्यांच्या पांढऱ्या सोन्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. दिवाळीत कापूस निघाल्यानंतर शेतकऱ्यांच्या घरी गोडधोड होते. मात्र, भावच नसल्याने कापूस घरातच पडून होता. आज ना उद्या भाव मिळेल, या आशेवर कापसाचे ढीग वाढत गेले. आता होळीही गेली तरी कापसाला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे टेन्शन वाढले आहे. आणखी किती दिवस कापूस ठेवायचा, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. उत्पादन खर्च वाढूनही कापसाचा भाव आठ हजारांच्या पुढे जात नाही आहे. लागवडीवर केलेला खर्च देखील निघणार नसल्याची परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उभी आहे. त्यामुळे शासनाने कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भात काहीतरी योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी बळीराजा करू लागला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.