AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Water level in Dam : उजनी ‘ओव्हरफ्लो’, गडचिरोलीत पावसाच्या उघडीपीनंतरही पूरस्थिती कायम..!

राज्यातील मोठ्या धरणांमध्ये जुलैपासूनच पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली होती. शिवाय पावसामध्ये सातत्य राहिल्याने पाणीपातळीत वाढ होतच गेली आहे. धरणात होत असलेल्या पाण्याची आवक पाहता पाण्याचा विसर्ग करण्यास सुरवात केली जाते. त्यानुसार आता धराणातील पाणी हे नदीपात्रात सोडले जात असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Water level in Dam : उजनी 'ओव्हरफ्लो', गडचिरोलीत पावसाच्या उघडीपीनंतरही पूरस्थिती कायम..!
सरासरीऐवढा पाणीसाठा धरणांमध्ये झाल्याने आता नदीपात्रात विसर्ग सुरु करण्यात आला आहे
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Aug 12, 2022 | 5:25 PM
Share

गडचिरोली/ इंदापूर : पावसाळा ऐन मध्यावर आला असताना सगळीकडे पाणीच-पाणी अशी स्थिती झालेली आहे. जुलैमध्ये महिनाभर (Heavy rain) पावसामध्ये सातत्य राहिल्याने यंदाचे चित्रच बदलले आहे. विदर्भात पावसाचा जोर हंगामाच्या सुरवातीपासूनच होता. त्यामुळेच जिल्ह्यातील सर्वात मोठे असलेल्या (Dam) मेडिगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे हे उघडण्यात आले आहेत. यामधून 10 लाख 99 हजार 550 क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचे समजले जाणारे (Ujani Dam) उजनी धरणीही पूर्ण क्षमतेने भरले आहे. या धरणाचे 16 दरवाजे उघडण्यात आले असून यामधून 31 हजार 600 क्युसेक्स ने पाण्याचा विसर्ग भीमा नदीत सुरु आहे. त्यामुळे नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिली असताना देखील जिल्ह्यात पूरस्थिती ही कायम आहे.

धरणातील पाणी नदीपात्रात

राज्यातील मोठ्या धरणांमध्ये जुलैपासूनच पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली होती. शिवाय पावसामध्ये सातत्य राहिल्याने पाणीपातळीत वाढ होतच गेली आहे. धरणात होत असलेल्या पाण्याची आवक पाहता पाण्याचा विसर्ग करण्यास सुरवात केली जाते. त्यानुसार आता धराणातील पाणी हे नदीपात्रात सोडले जात असल्याने अनेक नद्यांना पूर आला आहे तर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मेडीगट्टा लक्ष्मी धरणाचे 85 दरवाजे सोडल्याने 10 लाख 99हजार 550 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे गोदावरी व प्राणहिता नदी ला मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर दुसरीकडे उजनी धरण 100 टक्के भरल्याने भीमा नदीत विसर्ग सुरु झाला आहे.

सतर्कतेचा इशारा

धरणात पाणीसाठा अधिक होताच दरवाजे उघडून हे पाणी नदीपात्रात सोडले जाते. त्यानुसार सध्या मोठ्या धरणांचे पाणी हे नदीपात्रातच सोडले जात आहे. त्यामुळे धरणातील पाणी आणि पाऊस यामुळे नद्यांनाही पूर अशी स्थिती निर्माण झाली. दरवर्षी परतीच्या पावसाच्या दरम्यान ही स्थिती शासनावर ओढावली जाते. यंदा मात्र, जुलैपासूनच प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मेडीगट्टा धरणामुळे गोदावरी व प्राणहिता नदी ला मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे तर उजनी धरणातील पाण्याने भीमा नदीनेही पात्र सोडले आहे.

उजनी भरल्याने सिंचनाची चिंता मिटली

उजनी हे धरण पश्चिम महाराष्ट्रातील इंदापूर तालुक्यात असले तरी पुणे, सोलापूर नगर जिल्ह्यासह मराठवाडयास वरदान ठरलेले आहे. या धरणामुळे शेत जमिन सिंचनाखाली तर आलीच आहे फळबागाचेही क्षेत्र वाढले आहे. या धरणाचा फायदा सोलापूर, माढा, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, करमाळा या भागातील शेतकऱ्यांना झाला आहे. यंदाही हे धरण भरल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा प्रश्न मिटला आहे.

ही बातमी पण वाचा

Airtel 5G Network: ‘एअरटेल’ भारतीय ग्राहकांसाठी 5G क्रांती आणण्यासाठी सज्ज!

Follow Us
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल
शिंदेंनी शब्द पाळला! आणखी एका खासदाराला दिलं सर्वात मोठं गिफ्ट? तब्बल...
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?
पुन्हा पेपरफुटी! TET परीक्षेचा पेपर फुटला, पुन्हा परिक्षा कधी होणार?