AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Alert : राज्यात आजपासून मुसळधार, पुढील 4 दिवस कुठे-कधी पाऊस?

मुंबईसह, ठाणे, कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Weather Alert : राज्यात आजपासून मुसळधार, पुढील 4 दिवस कुठे-कधी पाऊस?
कोकण, मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस पावसाचा ‘रेड अ‍ॅलर्ट’; मुंबईत चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’
| Edited By: | Updated on: Jul 08, 2021 | 9:59 AM
Share

पुणे : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस सक्रीय होणार आहे. तर 10 जुलैपासून राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. (Weather Alert Heavy rains in the Maharashtra from today)

हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. तर बंगालच्या उपसागरातून कमी उंचीवरून जमिनीच्या दिशेने बाष्प येत आहे. यामुळे कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. तर विदर्भ, मराठवाडय़ासह मध्य भारतात 9 जुलैपासून पाऊस होणार होईल. तसेच 11 जुलैला अनेक ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्यामुळे पावसाचा जोर आणखी वाढेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबईसह, ठाणे, कोकण विभाग, पुणे, कोल्हापूर, सातारा, मध्य महाराष्ट्र, विदर्भातील नागूपर, वर्धा आणि मराठवाडय़ातील काही भागांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना दिलासा

महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल झाला. मात्र, जूनच्या अखेरच्या दिवसानंतर राज्यातील विविध ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. विदर्भात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला होता. सुरुवातीच्या पावसाच्या जोरावर विदर्भातील शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. मात्र, पावसाचा मोठा खंड पडल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जर पाऊस पुन्हा सक्रीय झाला तर शेतकऱ्यांना काही प्रमाणाता दिलासा मिळेल.

राज्यात कुठे कधी पाऊस?

8 जुलै : पुणे, नगर, नाशिक, जळगावात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस. तर परभणी, हिंगोली, नांदेडमध्येही पावसाची हजेरी.

9 जुलै : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस

10 जुलै : मुंबई, ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

10 जुलै : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा.

10 जुलै : पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांत तुरळक भागात मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता

11 जुलै : मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रातील संबंधित विभागांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस

11 जुलै : विदर्भातील नागपूर, वर्धा जिल्ह्य़ांत मुसळधार, तर मराठवाडय़ातही काही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार

पाहा व्हिडीओ : 

(Weather Alert Heavy rains in the Maharashtra from today)

संबंधित बातम्या : 

पावसानं टेन्शन वाढवलं, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! 86 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण

पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात, पिकांनी माना टाकल्या, पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू

Weather Update: राज्यात पावसाचा मोठा खंड, पिकं करपू लागली, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.