AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : शिंदे सरकार मुख्य शहरांपुरतेच, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे काय झाले? आंबादास दानवेंचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या गावातूनच सवाल..!

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात आगमन होताच त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील समनापूर येथे नवनाथ शेळके या शेतकऱ्याने विष प्राशन करुन आपले जीवन संपवले होते. राज्यात शेतकरी आत्महत्या ह्या सुरुच आहेत. सरकारला याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही.

Beed : शिंदे सरकार मुख्य शहरांपुरतेच, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे काय झाले? आंबादास दानवेंचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या गावातूनच सवाल..!
शिंदे सरकारवर अंबादास दानवे यांची टीकाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 04, 2022 | 5:55 PM
Share

बीड : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच, हा (Farmer) महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचे धोरण आखले जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, गेल्या दीड महिन्यातही (Farmer suicides) शेतकरी आत्महत्या ह्या सुरुच आहेत. उलट यामध्ये वाढ झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर हे शिंदे सरकार मुंबई, ठाणे आणि पुणे या प्रमुख शहरांपुरतेच मर्यादीत असून उर्वरित राज्यात काय सुरु आहे? याचे काही देणेघेणे त्यांना राहिलेले नाही. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे काय झाले असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते (Ambadas Danve) आंबादास दानवे यांनी बीड जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या गावातूनच मुख्यमंत्री यांना विचारलेला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेट

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात आगमन होताच त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील समनापूर येथे नवनाथ शेळके या शेतकऱ्याने विष प्राशन करुन आपले जीवन संपवले होते. राज्यात शेतकरी आत्महत्या ह्या सुरुच आहेत. सरकारला याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही. केवळ स्वार्थापोटी हे सरकार सत्तेत आले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आश्वासनाचे काय झाले?

सरकारची स्थापना होताच मुख्यमंत्र्यांनी हा महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त केला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या विधानानंतरच मराठवाड्यात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. कुठे आहे धोरण..? आणि कुठे आहे सरकारचे आश्वासन असा सवाल उपस्थित करीत दानवे यांनी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते, त्याची आठवणच करुन दिली.

बुलेट ट्रेनमध्ये अडकले सरकार

घोषणा शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि निर्णय मात्र मेट्रोचे असे हे सरकार आहे. मध्यंतरी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईबाबत केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच जमा झालेले नाही. शिवाय या सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणते असे धोरण राबवले असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे.

पक्ष संघटनेसाठी दानवे बीडमध्ये..!

शिवसेनेतील बंडाचा परिणाम बीड जिल्ह्यावरही झाला आहे. येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याअनुशंगानेच आंबादास दानवे हे बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांची भेट घेऊन दौऱ्याला सुरवात केली आहे. शिवसेनेतून शिंदे गटात होत असलेले आऊटगोइंग थोपवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या