AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : शिंदे सरकार मुख्य शहरांपुरतेच, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे काय झाले? आंबादास दानवेंचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या गावातूनच सवाल..!

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात आगमन होताच त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील समनापूर येथे नवनाथ शेळके या शेतकऱ्याने विष प्राशन करुन आपले जीवन संपवले होते. राज्यात शेतकरी आत्महत्या ह्या सुरुच आहेत. सरकारला याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही.

Beed : शिंदे सरकार मुख्य शहरांपुरतेच, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे काय झाले? आंबादास दानवेंचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या गावातूनच सवाल..!
शिंदे सरकारवर अंबादास दानवे यांची टीकाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 04, 2022 | 5:55 PM
Share

बीड : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच, हा (Farmer) महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचे धोरण आखले जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, गेल्या दीड महिन्यातही (Farmer suicides) शेतकरी आत्महत्या ह्या सुरुच आहेत. उलट यामध्ये वाढ झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर हे शिंदे सरकार मुंबई, ठाणे आणि पुणे या प्रमुख शहरांपुरतेच मर्यादीत असून उर्वरित राज्यात काय सुरु आहे? याचे काही देणेघेणे त्यांना राहिलेले नाही. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे काय झाले असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते (Ambadas Danve) आंबादास दानवे यांनी बीड जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या गावातूनच मुख्यमंत्री यांना विचारलेला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेट

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात आगमन होताच त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील समनापूर येथे नवनाथ शेळके या शेतकऱ्याने विष प्राशन करुन आपले जीवन संपवले होते. राज्यात शेतकरी आत्महत्या ह्या सुरुच आहेत. सरकारला याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही. केवळ स्वार्थापोटी हे सरकार सत्तेत आले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आश्वासनाचे काय झाले?

सरकारची स्थापना होताच मुख्यमंत्र्यांनी हा महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त केला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या विधानानंतरच मराठवाड्यात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. कुठे आहे धोरण..? आणि कुठे आहे सरकारचे आश्वासन असा सवाल उपस्थित करीत दानवे यांनी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते, त्याची आठवणच करुन दिली.

बुलेट ट्रेनमध्ये अडकले सरकार

घोषणा शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि निर्णय मात्र मेट्रोचे असे हे सरकार आहे. मध्यंतरी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईबाबत केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच जमा झालेले नाही. शिवाय या सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणते असे धोरण राबवले असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे.

पक्ष संघटनेसाठी दानवे बीडमध्ये..!

शिवसेनेतील बंडाचा परिणाम बीड जिल्ह्यावरही झाला आहे. येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याअनुशंगानेच आंबादास दानवे हे बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांची भेट घेऊन दौऱ्याला सुरवात केली आहे. शिवसेनेतून शिंदे गटात होत असलेले आऊटगोइंग थोपवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच