AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beed : शिंदे सरकार मुख्य शहरांपुरतेच, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे काय झाले? आंबादास दानवेंचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या गावातूनच सवाल..!

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात आगमन होताच त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील समनापूर येथे नवनाथ शेळके या शेतकऱ्याने विष प्राशन करुन आपले जीवन संपवले होते. राज्यात शेतकरी आत्महत्या ह्या सुरुच आहेत. सरकारला याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही.

Beed : शिंदे सरकार मुख्य शहरांपुरतेच, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे काय झाले? आंबादास दानवेंचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या गावातूनच सवाल..!
शिंदे सरकारवर अंबादास दानवे यांची टीकाImage Credit source: tv9 marathi
| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Sep 04, 2022 | 5:55 PM
Share

बीड : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच, हा (Farmer) महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचे धोरण आखले जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, गेल्या दीड महिन्यातही (Farmer suicides) शेतकरी आत्महत्या ह्या सुरुच आहेत. उलट यामध्ये वाढ झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर हे शिंदे सरकार मुंबई, ठाणे आणि पुणे या प्रमुख शहरांपुरतेच मर्यादीत असून उर्वरित राज्यात काय सुरु आहे? याचे काही देणेघेणे त्यांना राहिलेले नाही. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे काय झाले असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते (Ambadas Danve) आंबादास दानवे यांनी बीड जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या गावातूनच मुख्यमंत्री यांना विचारलेला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेट

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात आगमन होताच त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील समनापूर येथे नवनाथ शेळके या शेतकऱ्याने विष प्राशन करुन आपले जीवन संपवले होते. राज्यात शेतकरी आत्महत्या ह्या सुरुच आहेत. सरकारला याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही. केवळ स्वार्थापोटी हे सरकार सत्तेत आले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आश्वासनाचे काय झाले?

सरकारची स्थापना होताच मुख्यमंत्र्यांनी हा महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त केला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या विधानानंतरच मराठवाड्यात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. कुठे आहे धोरण..? आणि कुठे आहे सरकारचे आश्वासन असा सवाल उपस्थित करीत दानवे यांनी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते, त्याची आठवणच करुन दिली.

बुलेट ट्रेनमध्ये अडकले सरकार

घोषणा शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि निर्णय मात्र मेट्रोचे असे हे सरकार आहे. मध्यंतरी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईबाबत केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच जमा झालेले नाही. शिवाय या सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणते असे धोरण राबवले असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे.

पक्ष संघटनेसाठी दानवे बीडमध्ये..!

शिवसेनेतील बंडाचा परिणाम बीड जिल्ह्यावरही झाला आहे. येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याअनुशंगानेच आंबादास दानवे हे बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांची भेट घेऊन दौऱ्याला सुरवात केली आहे. शिवसेनेतून शिंदे गटात होत असलेले आऊटगोइंग थोपवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.

Follow Us
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा
राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली! नवनीत राणा NCPमध्ये प्रवेश करणार? पुन्हा सुनेत्रा पवारांच्या भेटीनंतर चर्चांना उधाण
बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला अटक, महसूल गुप्तचर संचालनालयाची धडक कारवाई, तब्बल 5 कोटीचं सोनं...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...