AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या कारमध्ये आहे का ADAS सिस्टम? कसे काम करते हे तंत्रज्ञान? काय आहे त्याची वैशिष्ट्ये?

नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक जोडपे महामार्गावर धावत्या एसयूव्ही (महिंद्रा XUV700) चे स्टीयरिंग व्हील आणि एक्सलेटर सोडून रील बनवत होते...

तुमच्या कारमध्ये आहे का ADAS सिस्टम? कसे काम करते हे तंत्रज्ञान? काय आहे त्याची वैशिष्ट्ये?
Image Credit source: Social Media
| Updated on: Mar 14, 2023 | 5:59 PM
Share

मुंबई : अॅडव्हान्स्ड ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टीम (ADAS System) या तंत्रज्ञानाची ऑटो क्षेत्रात मोठी चर्चा आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय बाजारपेठेत या तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून तयार करण्यात आलेल्या या फिचरचा गैरवापरही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. नुकताच इंटरनेटवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये एक जोडपे महामार्गावर धावत्या एसयूव्ही (महिंद्रा XUV700) चे स्टीयरिंग व्हील आणि एक्सलेटर सोडून रील बनवत होते. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या या फिचरचा गैरवापर होण्याचे प्रकार अनेकवेळा पाहायला मिळाले आहेत, पण खऱ्या अर्थाने या फिचरचा उपयोग काय? याचा वापर कसा करावा. याबद्दल जाणून घेऊया

काय आहे ADAS तंत्रज्ञान ?

सर्वप्रथम, अॅडव्हांस ड्रायव्हिंग असिस्टन्स सिस्टम (ADAS) तंत्रज्ञान काय आहे हे जाणून घेऊया? असे मानले जाते की या तंत्रज्ञानामुळे मानवी चुकांमुळे होणारे वाहन अपघात मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते. भविष्यातील मॉडेल्ससाठी स्वायत्त तंत्रज्ञानाच्या विकासाच्या दिशेने पहिले पाऊल म्हणूनही रडार-आधारित तंत्रज्ञानाकडे पाहिले जात आहे. वास्तविक ही ADAS प्रणाली मल्टी व्हिजन-आधारित अल्गोरिदमवर कार्य करते जी आसपासच्या परिस्थितीवर आणि वातावरणावर आधारित असते आणि त्यानुसार ही प्रणाली काम करते.

सोप्या भाषेत सांगायचे तर, ड्रायव्हिंग करताना ड्रायव्हरला मदत करण्यासाठी ADAS सिस्टम प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि अशा प्रकारे ड्रायव्हरची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करतात. हे सिस्टम वाहनाच्या सभोवतालच्या परिस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी सेन्सर तंत्रज्ञानाचा वापर करतात आणि नंतर ड्रायव्हरला माहिती देतात किंवा आवश्यकतेनुसार स्वतःहून कारवाई करतात.

ADAS प्रणाली कशी कार्य करते?

वर सांगितल्याप्रमाणे, हे सेन्सर आणि कॅमेरावर आधारित तंत्रज्ञान आहे. कॅमेरा-आधारित सेन्सर्सचा वापर करून, सिस्टम ड्रायव्हर आणि वाहन यांना ड्रायव्हिंगच्या परिस्थितीबद्दल माहिती देण्यास मदत करते. रस्ता, रस्त्याची चिन्हे, पादचारी, रस्त्यावरील वाहनांची स्थिती आणि इतर अडथळे अचूकपणे टिपण्यासाठी विविध कॅमेरे वापरले जातात. जे सेन्सर्सच्या मदतीने वाहनाच्या आजूबाजूची परिस्थिती कॅप्चर करते आणि सिस्टममध्ये प्रदान केलेल्या सॉफ्टवेअरला पाठवते.

कॅमेऱ्यांद्वारे टिपलेल्या प्रतिमांचे सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषण केले जाते आणि त्याच्या आधारे सुरक्षा वैशिष्ट्ये सक्रिय केली जातात. ही प्रणाली कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत स्वयंचलित आपत्कालीन ब्रेकिंग देखील लागू करू शकते, किंवा वाहन आपल्या लेनच्या बाहेर जात असल्यास किंवा अंध ठिकाणी वाहन असल्यास, अशा परिस्थितीत हे तंत्रज्ञान वाहन नियंत्रित करते. एकूणच, हे तंत्रज्ञान वाहनात सहाय्यक चालक म्हणून काम करते, पण या व्यवस्थेवर पूर्णपणे अवलंबून राहणे अजिबात योग्य नाही.

तज्ज्ञांचे मत आहे की तुम्ही तुमच्या वाहनात प्रदान केलेल्या एडीएएस तंत्रज्ञानाच्या पातळीच्या आधारे वाहन चालवावे. शेवटी, हे एक मशीन आहे आणि ते पूर्णपणे सेन्सर्स आणि कॅमेऱ्यांवर आधारित कार्य करते. त्यामुळे याचा वापर फक्त ड्रायव्हिंग सुधारण्यासाठी करा आणि स्टीयरिंग व्हील धरल्याशिवाय रस्त्यावर गाडी चालवू नका.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.