AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवीन कार किंवा बाईक खरेदी करताना दोन चाव्या का देतात? अनेकांना नाही माहिती यामागचे खरे कारण

वाहनांची जेव्हा खरेदी केली जाते तेव्हा कंपन्या ग्राहकाला दोन चाव्या (Keys For Car) देतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, असं का होतं, कंपनी दोन चाव्या का देते

नवीन कार किंवा बाईक खरेदी करताना दोन चाव्या का देतात? अनेकांना नाही माहिती यामागचे खरे कारण
कारची चावीImage Credit source: Social Media
| Updated on: Aug 22, 2023 | 2:16 PM
Share

मुंबई : कार, बाईक, स्कूटर यांसारख्या वाहनांची जेव्हा खरेदी केली जाते तेव्हा कंपन्या ग्राहकाला दोन चाव्या (Keys For Car) देतात. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, असं का होतं, कंपनी दोन चाव्या का देते ? याचे सर्वात मोठे कारण चावी हरवण्याशी संबंधित आहे आणि त्यानंतर दुसरे कारण देखील तितकेच महत्त्वाचे आहे. कार, बाईक आणि स्कूटर इत्यादींसोबत दोन चाव्या दिल्या आहेत जेणेकरून एक चावी नेहमी तुमच्याकडे असते आणि दुसरी चावी तुम्ही तुमच्या घरी सुरक्षितपणे ठेवू शकता. हे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही तुमची एक चावी गमावल्यास किंवा ती चोरीला गेल्यास, तुमच्याकडे वाहन वापरण्यासाठी दुसरी चावी असेल.

फायनान्य कंपनीसाठी

कंपन्यांनी दोन चाव्या देण्यामागे ग्राहकांना होणारा आर्थिक फायदा हे देखील एक कारण आहे. ग्राहकाची एक चावी हरवली तर दुसऱ्या चावीसाठी त्याला पैसे खर्च करावे लागतात, मात्र कंपन्यांनी दिलेल्या दुसऱ्या चावीमुळे ग्राहकांचा हा खर्च वाचतो. दुसरी चावीही हरवली तर ग्राहकाला पैसे खर्च करावे लागतात. वाहनाच्या चाव्या चोरीला गेल्यास विमा दाव्यातही वापरल्या जातात. दाव्यासाठी दोन्ही चाव्या विमा कंपनीला द्याव्या लागतात. जर तुमच्याकडे दोन्ही चाव्या नसतील तर अनेक वेळा कंपन्या दावा नाकारतात. याशीवाय अनेक फायनान्स कंपन्या गाडीची दुसरी चावी स्वःताजवळ ठेवते. जेणेकरून कर्जाची थकबाकी पुर्ण न झाल्यास गाडी जप्त करण्यासाठी कंपनी त्या चावीचा वापर करू शकते.

सध्या अनेक कारमध्ये रिमोट पद्धतीच्या चाव्या देण्यात येत आहे. अशा कारमध्ये एक रिमोट आणि एक मॅनुअल अशा दोन्ही प्रकारच्या चाव्या देण्यात येते. काही तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास कारची दुसरी जावी वापरून कार सुरू करता यावी हा यामागचा उद्देश असतो.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.