Budget 2022 Speech Highlights : या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे गरिबांचे कल्याण : नरेंद्र मोदी

| Updated on: Feb 01, 2022 | 11:48 PM

Budget 2022 Full Speech Highlights in Marathi : 2023 पर्यंत 25 हजार किलोमीटर चा महामार्ग बांधला जाणार आहे. येत्या तीन वर्षात  वंदे भारत योजनेत 400 ट्रेन येणार आहेत.केंद्र सरकार सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे.

Budget 2022 Speech Highlights : या अर्थसंकल्पाचा महत्त्वाचा पैलू म्हणजे गरिबांचे कल्याण : नरेंद्र मोदी
Nirmala Sitharaman budget speech
Follow us on

Budget 2022 LIVE : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यंदाचा अर्थसंकल्प (Union Budget 2022 ) सादर करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी हे अर्थसंकल्पीय अधिवेशन महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. 2023 पर्यंत 25 हजार किलोमीटर चा महामार्ग बांधला जाणार आहे. येत्या तीन वर्षात  वंदे भारत योजनेत 400 ट्रेन येणार आहेत.केंद्र सरकार सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणार आहे. देशात डिजीटल विद्यापीठ स्थापन केली जाणार आहेत. येत्या 2 वर्षात देशात 80 लाख घर तयार केली जाणार आहेत. शाळांमध्ये प्रत्येक वर्गात टीव्ही बसवला जाणार आहे. शेतकऱ्यांना डिजिटल बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं निर्मला सितारमण यांनी सांगितलं. 2.37 कोटी रुपये MSP द्वारे शेतकऱ्यांना दिले जाणार असल्याची घोषणा निर्मला सितारमण यांनी केली. येत्या वर्षभरात खासगी नेटवर्क प्रोव्हायडरच्या सहकार्यानं 5जी सेवा सुरु करणार असल्याचं  अर्थमंंत्र्यांनी सांगितलं. भारतनेट द्वारे गाव इंटरनेटनं जोडली जाणार आहेत. सेझचा कायदा बदलणार असून त्याद्वारे राज्य सरकार उद्योगात भागिदार होतील,

SITHARAMAN SPEECH ON BUDGET 2022 LIVE :

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण  यंदाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.निर्मला सितारमण यंदाच्या अर्थसंकल्पात आत्मनिर्भर भारत अभियानाला प्राधान्य देण्याची शक्यता आहे. नोकरदार,उद्योजक, शेतकरी, आरोग्य क्षेत्रासाठी अर्थसंकल्प कसा राहणार हे पाहायला लागणार आहे.