AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Budget 2025: घर भाड्याने देऊन मिळते उत्पन्न? अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी दिली आणखी एक भेट

Budget 2025: अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गींयांचा चांगलाच विचार केलेला दिसत आहे. आयकर सुटची मर्यादा १२ लाखांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे एक लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्यांना आयकर लागणार नाही. मध्यमवर्गींसाठी ही चांगली बातमी असताना घरभाड्याच्या टीडीएससंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. 

Budget 2025: घर भाड्याने देऊन मिळते उत्पन्न? अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी दिली आणखी एक भेट
budget 2025
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Feb 02, 2025 | 3:30 PM
Share

Budget 2025: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी देशाचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात घरभाड्याने देणाऱ्या घरमालकांसाठी चांगली बातमी आहे. सरकारने घर भाड्याने देण्यातून मिळणाऱ्या संपत्तीची मर्यादा सध्याच्या वार्षिक 2.4 लाख रुपयांवरुन सहा लाख रुपये करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. निर्मला सीतारमण यांनी आर्थिक वर्ष 2025-26 साठी भाड्यातून मिळणाऱ्या टीडीएसची वार्षिक मर्यादा वाढवण्याची घोषणा केली आहे.

अर्थमंत्र्यांनी काय म्हटले…

निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना सांगितले होते की, घर भाड्यावर टीडीएससाठी 2.40 लाख रुपयांची वार्षिक मर्यादा 6 लाख रुपये करण्यात येत आहे. यामुळे टीडीएससाठी असलेल्या व्यवहारांची संख्या कमी होईल, ज्यामुळे कमी घरभाडे मिळणाऱ्या करदात्यांना फायदा होईल.

काय आहे नियम

आयकर कायद्याच्या कलम 194-I नुसार घरभाडे म्हणून कोणतीही रक्कम मिळताना आर्थिक वर्षात भाड्याचे उत्पन्न 2.4 लाख रुपयांपेक्षा जास्त असू नये. त्यापेक्षा जास्त उत्पन्न गेल्यावर आयकर कापला जावा. तथापि 2025-26 च्या अर्थसंकल्पात भाड्याच्या उत्पन्नाची ही कर कपात मर्यादा वाढवून 50,000 रुपये प्रति महिना म्हणजेच वर्षाला सहा लाख करण्याचा प्रस्ताव आहे. ही तरतूद वैयक्तिक करदाता किंवा हिंदू अविभक्त कुटुंबासही लागू होईल.

काय म्हणतात तज्ज्ञ

डेलॉयट इंडियाच्या भागीदार आरती रावते यांनी या तरतुदीवर सांगितले की, भाड्याने देण्याचा अर्थ असा होईल की जर जमीन किंवा यंत्रसामग्री काही महिन्यांसाठी भाड्याने घेतली असेल आणि भाडे 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तरच टीडीएस कपात करावी लागेल. या संदर्भात क्रेडाई-एमसीएचआयचे अध्यक्ष डॉमिनिक रोमेल म्हणाले की, भाड्यावरील वार्षिक टीडीएसची मर्यादा 6 लाख रुपयांपर्यंत वाढवल्याने लहान करदात्यांना मोठा फायदा होईल.

बजेटमध्ये 6 लाख रुपयांपर्यंतच्या भाड्यावर टीडीएस वाढल्याने दुसरे घर घेऊन भाड्याने देण्याचे चलन वाढणार आहे. यामुळे लोकांना दुसरे फ्लॅट खरेदी करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. ज्यामुळे रिअल इस्टेटमध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळेल.

अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना मध्यमवर्गींयांचा चांगलाच विचार केलेला दिसत आहे. आयकर सुटची मर्यादा १२ लाखांपर्यंत वाढवली आहे. त्यामुळे एक लाख रुपयांपर्यंत पगार असलेल्यांना आयकर लागणार नाही. मध्यमवर्गींसाठी ही चांगली बातमी असताना घरभाड्याच्या टीडीएससंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.