AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानपेक्षा किती मोठा असणार भारताचा अर्थसंकल्प? यंदा किती रुपयांचा असणार बजेट

Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि अर्थसचिव तुहिन कांत पांडे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसह 2025-26 साठी 50 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट तयार केले आहे. या अर्थसंकल्पात त्यांना अनेक आव्हाने पेलावी लागणार आहेत.

पाकिस्तानपेक्षा किती मोठा असणार भारताचा अर्थसंकल्प? यंदा किती रुपयांचा असणार बजेट
Nirmala Sitharaman
| Updated on: Feb 01, 2025 | 8:04 AM
Share

Nirmala Sitharaman: अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहे. हा अर्थसंकल्प देशाच्या इतिहासातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असण्याची शक्यता आहे. यंदा 50 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कमेचा अर्थसंकल्प सादर होण्याची शक्यता आहे. भारताकडे नेहमीच शत्रूत्वाच्या नजरेने पाहणाऱ्या शेजारील पाकिस्तानचा अर्थसंकल्पापेक्षा हा कितीतरी मोठा असणार आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानचा अर्थसंकल्प 5.65 लाख कोटी रुपयांचा होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण सलग आठव्यांदा अर्थसंकल्प मांडणार आहे.

हे असणार आव्हान

अर्थमंत्री निर्मला सीतारामण आणि अर्थसचिव तुहिन कांत पांडे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसह 2025-26 साठी 50 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट तयार केले आहे. या अर्थसंकल्पात त्यांना अनेक आव्हाने पेलावी लागणार आहेत. ज्यामध्ये आर्थिक विकासातील घसरण, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत कमकुवत झालेला रुपया आणि उत्पादनांच्या मागणीत झालेली घट यांचा समावेश आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये आर्थिक विकास दर चार वर्षांच्या नीचांकी 6.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. 2019 मध्ये कोविड महामारीचा उद्रेक झाल्यानंतर हा सर्वात कमी वाढीचा दर आहे.

आर्थिक सर्वेक्षणातून दिसले चित्र

विविध आव्हाने असतानाही 2025-26 या आर्थिक वर्षात वित्तीय तूट सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) 4.5 टक्क्यांच्या खाली आणण्याच्या वित्तीय लक्ष्यावर सरकार टिकून राहण्याची अपेक्षा आहे. मुख्य आर्थिक सल्लागार व्ही अनंत नागेश्वरन सामान्य अर्थसंकल्प 2025-26 च्या एक दिवस आधी तिसरा आर्थिक आढावा सादर केला. नागेश्वरन यांना जानेवारी 2022 मध्ये सरकारने सीईए बनवले होते. त्यांनी जाहीर केलेल्या आर्थिक सर्वेक्षणातून संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेचे चित्र समोर आले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण 2024-25 सादर केले. या सर्वेक्षणात भारताचा GDP वाढीचा दर 6.3% ते 6.8% दरम्यान असण्याचा अंदाज आहे. जीएसटी कलेक्शनमध्ये अंदाजे 11 टक्के वाढ झाली असून ती 10.62 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकते. जीएसटी संकलनात 11 टक्के वाढीचा अंदाज आहे, जो 10.62 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. हे सर्वेक्षण धोरणात्मक सुधारणा आणि आर्थिक स्थैर्यासाठी सरकारचे प्रयत्न अधोरेखित करते.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.