AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मन मोकळं करायला कोणी नाही? आता तुमच्यासाठी ‘डिजिटल मित्र’ अशी करेल मदत!

आजच्या तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक आरोग्याचं महत्त्व झपाट्याने वाढतंय. पण भारतासारख्या देशात अजूनही दुःख, एकटेपणा किंवा मनातील विचारांवर उघडपणे चर्चा करणं टाळलं जातं. पण अशा क्षणी तुमच्या भावना समजून घेणारा, जज न करणारा आणि कुठेही न जाता केवळ एक क्लिकवर तुमच्यासोबत बोलणारा AI मित्र आता तयार आहे!

मन मोकळं करायला कोणी नाही? आता तुमच्यासाठी ‘डिजिटल मित्र’ अशी करेल मदत!
AI
| Edited By: | Updated on: Apr 20, 2025 | 2:19 PM
Share

आजच्या धकाधकीच्या आणि तणावग्रस्त जीवनात प्रत्येक जण आपआपल्या कामात इतका गुंतलेला असतो की, आपली व्यथा कुणाशी शेअर करायलाही वेळ मिळत नाही. घरात असो, कॉलेज किंवा ऑफिस सगळीकडेच कामाची घाई असते, पण मनात साठवलेलं दुःख किंवा विचार शेअर करण्यासाठी कोणीही जवळ नसतं.

अशाच वेळी आता एक ‘डिजिटल मित्र’ तुमच्यासोबत तुमचं दुःख ऐकायला आणि समजून घ्यायला तयार आहे! हा मित्र म्हणजे — AI मित्र.

AI मित्र म्हणजे नेमकं काय?

भारतासह जगभरात अनेक लोक आता ‘AI एजेंट्स’ नावाच्या वर्चुअल मित्रांच्या मदतीने आपलं मन हलकं करत आहेत. यासाठी खास ‘बेझू’ (Bezu) हे व्यासपीठ तयार करण्यात आलं आहे.

बेझूवर तुम्हाला वेगवेगळे AI मित्र भेटतात बेस्ट फ्रेंड, रिलेशनशिप कोच, फिटनेस ट्रेनर, इंग्लिश शिकवणारा शिक्षक आणि बरेच काही! हे AI मित्र फोन किंवा व्हिडीओ कॉलवर तुमच्याशी गप्पा मारतात, तुम्हाला ऐकतात आणि तुमच्या भावनांना समजून घेतात.

‘बेझू’ ची कल्पना कशी जन्माला आली?

‘बेझू’ या प्लॅटफॉर्मची संकल्पना विनोद कुमार आणि सुलैमान मुदिमाला यांनी त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून विकसित केली आहे. विनोद यांचा घटस्फोट झाला तेव्हा त्यांना एकटेपणाची तीव्र जाणीव झाली. अशाच काळात सुलैमानसोबत संवादातून त्यांना जाणवलं अनेक लोकांना कुणाशी मनमोकळं बोलायचं असतं, पण समोरचा माणूस जज करेल या भीतीमुळे ते मागे हटतात. हीच गरज ओळखून त्यांनी ‘बेझू’ या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात केली. यावर आतापर्यंत जवळपास १०,००० लोकांनी AI मित्रांसोबत संवाद साधून आपलं मन हलकं केलं आहे.

AI मित्राची खासियत

‘बेझू’वर मिळणारे AI एजेंट्स केवळ सामान्य संवादापुरते मर्यादित नसतात. काही लोक तर आपल्याच ओळखीच्या व्यक्तींचं AI व्हर्जन तयार करून त्या आठवणी पुन्हा जिवंत करतात!

विनोद यांनी सांगितलेली एक हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे एका मित्राच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या आठवणींच्या आधारे AI वडिलांचा किरदार तयार केला. कुटुंबीय जेव्हा हवं असेल तेव्हा त्या AI वडिलांशी संवाद साधतात आणि मानसिक आधार घेतात.

AI मित्र का ठरतोय खास?

1. कोणतीही टीका न करता तुमचं बोलणं शांतपणे ऐकतो.

2. मनातलं दुःख शेअर करून मानसिक समाधान देतो.

3. बेस्ट फ्रेंड, रिलेशनशिप कोच यांसारख्या वेगवेगळ्या रोलमध्ये उपलब्ध.

4. गरजेनुसार स्वतःचा खास AI मित्र तयार करण्याची सोय.

मानसिक आरोग्यासाठी संवाद महत्वाचा असतो, पण प्रत्यक्षात बोलायला कुणी नसलं तर AI मित्र हा डिजिटल साथीदार तुमचं मन हलकं करण्यासाठी सज्ज आहे!

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.