AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM द्वारे पैसे काढताना आता पासवर्डसोबत OTP टाकावा लागणार

आता तुम्हाला एटीएममधून (ATM)  पैसे काढताना पिनसोबतच (PIN) ओटीपीही (OTP) टाकावा लागणार आहे. नुकतंच कॅनरा बँकेने ही नवी प्रणाली कार्यरत केली आहे.

ATM द्वारे पैसे काढताना आता पासवर्डसोबत OTP टाकावा लागणार
| Updated on: Aug 28, 2019 | 12:17 PM
Share

नवी दिल्ली : सध्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचे युग आहे. अनेकजण पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे पंसत करतो. आपण एटीएम कार्डचा (ATM) वापर बँकेतून पैसे काढण्यासाठी सर्रास करतो. मात्र यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. याला आळा घालण्यासाठी आता तुम्हाला एटीएममधून (ATM)  पैसे काढताना पिनसोबतच (PIN) ओटीपीही (OTP) टाकावा लागणार आहे. नुकतंच कॅनरा बँकेने ही नवी प्रणाली कार्यरत केली आहे.

यानुसार, जर तुम्ही एटीएमद्वारे 10 हजारांपेक्षा जास्त पैसे काढले, तर तुम्हाला एटीएम पिनसोबत ओटीपी टाकावा लागणार आहे. कॅनरा बँकेने पैसे काढण्यासाठी 10 हजारांची मर्यादा ठेवली आहे. यापेक्षा जास्त पैसे काढल्यास तुम्हाला ओटीपी टाकवा लागणार आहे. कॅनरा बँकेप्रमाणे इतर बँकाही ही प्रणाली लागू करण्याची शक्यता आहे.

देशातील सर्व बँकाना एटीएमद्वारे होणाऱ्या फसवणूक थांबवण्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात असे आदेश रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिले आहेत. यामुळे कॅनरा बँकेने सुरक्षेच्या दृष्टीने हे पाऊल उचलले आहे.

एटीएम कार्डद्वारे पैसे काढताना फसवणूक, कार्ड क्लोनिंग अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतात. त्यामुळे गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात RBI ने सर्व बँकांनी एटीएममध्ये अँटी स्किमिंगचे मशीन लावावे असे सांगितले होते.

गेल्या वर्षभरात दिल्लीत 2018-19 मध्ये एटीएम कार्डच्या फसवणुकीचे 179 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. देशभरात एटीएमद्वारे होणाऱ्या अनेक फसवणूक या रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान होतात असेही माहिती नुकतीच समोर आली आहे. नुकतंच बँकांच्या राज्यस्तरीय बैठकीत दोन एटीएम ट्रांझेक्शनदरम्यान 6 ते 12 तासांपर्यंतचा कालावधी ठेवावा, असा उपाय सुचवण्यात आला होता.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.