Budget 2026: आपण 2047 पर्यंत होणार ग्लोबल लीडर..’, सीतारमण यांच्या बजेट भाषणातील 10 मोठ्या घोषणा काय?

Budget 2026 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी आज रविरवारी 1 फेब्रुवारी रोजी बजेटचं वाचन करायला सुरूवात केली आहे. त्या बजेट भाषणातील 10 मोठ्या घोषणा काय जाणून घ्या...

Budget 2026: आपण 2047 पर्यंत होणार ग्लोबल लीडर.., सीतारमण यांच्या बजेट भाषणातील 10 मोठ्या घोषणा काय?
Nirmala Sitaraman
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Feb 01, 2026 | 12:02 PM

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी 3.O सरकारच्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत, तर अर्थमंत्री म्हणून हा त्यांचा नववा अर्थसंकल्प आहे. लोकसभेत अर्थसंकल्प भाषणाची सुरुवात करताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठे वक्तव्य केले. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, आपण खूप लवकरच जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहोत.

निर्मला सीतारमण यांनी भाषणाच्या सुरुवातीला सांगितले की, सरकारचा मुख्य फोकस गरीब आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीवर राहिला आहे. यासोबतच रोजगार निर्मितीच्या दिशेने काम करत असून, असे निर्णय घेतले जात आहेत जे वाढीला (ग्रोथ) आधार देत आहेत. याचा परिणाम भारताच्या जीडीपीवर दिसतो आहे आणि ती 7 टक्क्यांपेक्षा जास्त राहिला आहे. आम्ही घरगुती निर्यात वाढवण्याचे काम केले आहे आणि जागतिक बाजारपेठेत आपली पोहोच वाढवली आहे.

अर्थमंत्र्यांच्या बजेट भाषणातील 10 मोठ्या गोष्टी खालीलप्रमाणे…

१. हे युवाशक्तीचे बजेट आहे, ज्यात शेतकरी, गरीब आणि सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवले आहे.

२. महसूल तूट कमी करण्यावर सरकारची भर राहिली आहे.

३. उत्पादकता वाढवणे, जागतिक अनिश्चिततेचा सामना करणे, सर्वांचा विकास आणि सर्वांना सोबत घेणे यावर काम करणे.

४. पायाभूत सुविधा वाढवणे आणि एकत्रित करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. रोजगार निर्मिती आणि व्यापार सुधारणांवर भर.

५. सार्वजनिक गुंतवणुकीवर (पब्लिक इन्वेस्टमेंट) सरकारचा फोकस आहे. आर्थिक वाढ तीन प्रमुख उद्दिष्टांवर केंद्रित आहे.

६. EMS PLI योजनेची तरतूद ४० हजार कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव.

७. तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशात रेअर अर्थ मिनरलसाठी कॉरिडॉर तयार केले जातील.

८. एमएसएमई ग्रोथ फंडसाठी ₹१०,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

९. सीतारमण म्हणाल्या, आम्ही ISM 2.0ची सुरुवात करत आहोत. यामुळे सेमीकंडक्टर उत्पादन वाढेल.

१०. इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी ४०,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या अर्थसंकल्पातून भारताच्या आर्थिक प्रगतीला नवीन गती मिळेल असा विश्वास वर्तवला जात आहे.