AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google play store: सरकारने कडक भूमिका घेताच गुगलची माघार, प्ले स्टोरवर पुन्हा दिसू लागले हे ॲप

गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून अनेक भारतीय ॲप्स काढून टाकले होते. मात्र सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर कंपनीने त्यांना पुन्हा सेवेत आणले आहे. सरकारने म्हटले आहे की स्टार्टअप इकोसिस्टम ही देशाच्या अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे. सरकारने याबाबत गुगलला बैठकीसाठी बोलावले आहे.

Google play store: सरकारने कडक भूमिका घेताच गुगलची माघार, प्ले स्टोरवर पुन्हा दिसू लागले हे ॲप
| Updated on: Mar 02, 2024 | 8:16 PM
Share

नवी दिल्ली : सरकारच्या कठोर भूमिकेनंतर गुगलने शनिवारी प्ले स्टोअरवरून काढून टाकलेले सर्व ॲप्स पुन्हा एकदा सुरू केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगल प्ले स्टोरवर Shaadi.com, Info Edge’s Naukri.com, 99Acres आणि Naukri Gulf सारखे ॲप्स पुन्हा लिस्ट केले आहेत. Google ने आपल्या Play Store वरून काही भारतीय ॲप्स काढून टाकले होते. यानंतर सरकारने लगेचच कठोर भूमिका घेतली. सरकारने गुगल आणि संबंधित स्टार्टअप्सना या संदर्भात पुढील आठवड्यात बैठकीसाठी बोलावले आहे. आयटी आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, स्टार्टअप इकोसिस्टम ही भारतीय अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे.

भारतीय ॲप्स रिस्टोअर

गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकलेले सर्व भारतीय ॲप्स रिस्टोअर केले आहेत. इन्फो एजचे सह-संस्थापक संजीव बिकचंदानी यांनीही X वरील पोस्टमध्ये याची पुष्टी केली आहे. त्याने पोस्ट केले की अनेक इन्फो एज ॲप्स प्ले स्टोअरवर परत आले आहेत. इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) ने भारतीय कंपन्यांचे ॲप्स काढून टाकल्याबद्दल टीका केली होती. त्यांनी Google ला ते काढून टाकलेले ॲप्स प्ले स्टोअरवर रिस्टोर करण्यासल सांगितले होते. Google ने Matrimony आणि Shaadi.com या सारखे प्रमुख भारतीय डिजिटल कंपन्यांचे ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकले होते.

सरकारने बोलावली बैठक

सरकारने कडक भूमिका घेतल्यानंतर अश्विनी वैष्णव म्हणाले की, गुगलला भारतीय ॲप्स काढून टाकण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. भारत सरकारचे धोरण अगदी स्पष्ट आहे. आमच्या स्टार्टअप्सना आवश्यक ते संरक्षण मिळेल.’

हा वाद सोडवण्यासाठी सरकारने गुगल आणि ॲप कंपन्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. पुढील आठवड्यात ही भेट होणार आहे. ते म्हणाले की, भारताने 10 वर्षांत एक लाखाहून अधिक स्टार्टअप आणि 100 हून अधिक युनिकॉर्नची मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम तयार केली आहे. तरुण आणि उद्योजकांच्या ऊर्जेला योग्य दिशा दिली पाहिजे आणि ती मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या धोरणांवर सोडता येणार नाही.’

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.