AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Google play store: सरकारने कडक भूमिका घेताच गुगलची माघार, प्ले स्टोरवर पुन्हा दिसू लागले हे ॲप

गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून अनेक भारतीय ॲप्स काढून टाकले होते. मात्र सरकारने कठोर भूमिका घेतल्यानंतर कंपनीने त्यांना पुन्हा सेवेत आणले आहे. सरकारने म्हटले आहे की स्टार्टअप इकोसिस्टम ही देशाच्या अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे. सरकारने याबाबत गुगलला बैठकीसाठी बोलावले आहे.

Google play store: सरकारने कडक भूमिका घेताच गुगलची माघार, प्ले स्टोरवर पुन्हा दिसू लागले हे ॲप
shailesh musale
shailesh musale | Updated on: Mar 02, 2024 | 8:16 PM
Share

नवी दिल्ली : सरकारच्या कठोर भूमिकेनंतर गुगलने शनिवारी प्ले स्टोअरवरून काढून टाकलेले सर्व ॲप्स पुन्हा एकदा सुरू केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगल प्ले स्टोरवर Shaadi.com, Info Edge’s Naukri.com, 99Acres आणि Naukri Gulf सारखे ॲप्स पुन्हा लिस्ट केले आहेत. Google ने आपल्या Play Store वरून काही भारतीय ॲप्स काढून टाकले होते. यानंतर सरकारने लगेचच कठोर भूमिका घेतली. सरकारने गुगल आणि संबंधित स्टार्टअप्सना या संदर्भात पुढील आठवड्यात बैठकीसाठी बोलावले आहे. आयटी आणि दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, स्टार्टअप इकोसिस्टम ही भारतीय अर्थव्यवस्थेची गुरुकिल्ली आहे.

भारतीय ॲप्स रिस्टोअर

गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकलेले सर्व भारतीय ॲप्स रिस्टोअर केले आहेत. इन्फो एजचे सह-संस्थापक संजीव बिकचंदानी यांनीही X वरील पोस्टमध्ये याची पुष्टी केली आहे. त्याने पोस्ट केले की अनेक इन्फो एज ॲप्स प्ले स्टोअरवर परत आले आहेत. इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया (IAMAI) ने भारतीय कंपन्यांचे ॲप्स काढून टाकल्याबद्दल टीका केली होती. त्यांनी Google ला ते काढून टाकलेले ॲप्स प्ले स्टोअरवर रिस्टोर करण्यासल सांगितले होते. Google ने Matrimony आणि Shaadi.com या सारखे प्रमुख भारतीय डिजिटल कंपन्यांचे ॲप प्ले स्टोअरवरून काढून टाकले होते.

सरकारने बोलावली बैठक

सरकारने कडक भूमिका घेतल्यानंतर अश्विनी वैष्णव म्हणाले की, गुगलला भारतीय ॲप्स काढून टाकण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. भारत सरकारचे धोरण अगदी स्पष्ट आहे. आमच्या स्टार्टअप्सना आवश्यक ते संरक्षण मिळेल.’

हा वाद सोडवण्यासाठी सरकारने गुगल आणि ॲप कंपन्यांना बैठकीसाठी बोलावले आहे. पुढील आठवड्यात ही भेट होणार आहे. ते म्हणाले की, भारताने 10 वर्षांत एक लाखाहून अधिक स्टार्टअप आणि 100 हून अधिक युनिकॉर्नची मजबूत स्टार्टअप इकोसिस्टम तयार केली आहे. तरुण आणि उद्योजकांच्या ऊर्जेला योग्य दिशा दिली पाहिजे आणि ती मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या धोरणांवर सोडता येणार नाही.’

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...