AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताशी दुश्मनी मालदीवला महागात पडणार, भारत अ‍ॅक्शन मोडवर; सर्वात मोठा निर्णय

India maldive row : भारत आणि मालदीव यांच्यात संबंध बिघडले आहेत, मालदीवमधील नवीन सरकारने भारत विरोधी भूमिका घेत संबंधात विष कालवले आहे. यामागे नक्कीच चीन आहे. भारताने देखील आता मालदीवला पर्यायी व्यवस्था सुरु केली आहे. मालदीव आणि चीनला झटका देण्यासाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

भारताशी दुश्मनी मालदीवला महागात पडणार, भारत अ‍ॅक्शन मोडवर; सर्वात मोठा निर्णय
| Updated on: Mar 02, 2024 | 6:24 PM
Share

India maldive row : भारत आणि चीनचे संबंध आधीच खराब आहेत. त्यानंतर चीन मालदीवला भारतापासून लांब करण्याचा प्रयत्न करत आहे. मालदीवमध्ये सरकार बदलल्यानंतर आणि चीन समर्थक राष्ट्राध्यक्ष झाल्याने आता मालदीव आणि भारत या दोन देशांमधील संबंध देखील बिघडले आहेत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष जर सार्वभौमत्वाची भाषा करत असले तरी त्यांना चीनचा पाठिंबा असल्याने ते भारतविरोधी भूमिका घेऊ लागले आहेत. भारताने देखील मालदीवला धडा शिकवण्याचा प्रण घेतलेला दिसत आहे. भारत भविष्यात मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना आता चोख प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत दिसत आहे.

भारत करणार जटायूचे उद्घाटन

मालदीवपासून अवघ्या ५०७ किमी अंतरावर असलेल्या लक्षद्वीपमधील मिनिकॉय येथे भारत पुढील आठवड्यात हवाई आणि नौदल तळ INS जटायूचे उद्घाटन करणार आहे. भारताचा हा नौदल तळ आता भारतासाठी मालदीवचा पर्याय बनणार आहे. मालदीवचे हिंद महासागरातील स्थान महत्त्वाचे होते. म्हणून भारत त्याला इतके महत्त्व देत होता. पण आता भारतानेच लक्षद्वीप बेटावर नवीन तळ तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.

लक्षद्वीपमध्ये या भारतीय नौदल तळाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर राफेलसारखी भारताची सर्वात प्राणघातक लढाऊ विमाने लक्षद्वीपमध्ये उतरू शकतील. त्यामुळे मालदीवमधील मुइज्जू सरकारला या भारतीय लढाऊ विमानांची गर्जना ऐकू येईल. याचा परिणाम संपूर्ण पश्चिम हिंदी महासागरात दिसून येईल. कारण या क्षेत्रात चीनची गुप्तहेर जहाजे आणि युद्धनौका येत राहतात. या भागात चीन आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा हा डाव भारत हाणून पाडणार आहे.

मुईज्जू यांना भारत देणार झटका

मालदीवमधून भारतीय सैनिकांना मायदेशी परत बोलवण्याची सूचना मुइज्जू यांनी केली होती. हे भारतीय सैन्य आता माघारी येत असतानाच भारत हा नौदल तळाचे उद्घाटन पुढील आठवड्यात करणार आहे. ‘इंडिया आऊट’चा नारा देणारे मुइज्जू यांना मात्र भारतासोबतचा पंगा महागात पडणार आहे. मुइज्जूने मालदीवच्या भारतासोबतच्या मैत्रीत विष कालवले आहे. आता मालदीव चीनच्या इशाऱ्यावर चालत आहे. भारत दौऱ्याऐवजी चीनचा आधी दौरा करणारे मुइज्जू यांचा मनसुबा भारताला कळाला आहे. आधीच कर्जात बुडालेल्या मालदीवला मुइज्जू आणखी कर्जात ढकलत आहे.

मालदीवने तुर्कीशी कोट्यवधी डॉलर्सच्या ड्रोन करारावर स्वाक्षरी केली आहे. भारताला लागून असलेल्या सीमेवर तो हे ड्रोन तैनात करणार आहे. पण भारत आता मालदीवला लागून असलेल्या सीमेवर अख्खं तळच बनवत आहे. ज्यामुळे लढाऊ विमाने कधीही तेथे उतरु शकतात.

हिंदी महासागरातून दळणवळण करण्यासाठी दोन महत्त्वाच्या सागरी मार्ग आहेत जे आग्नेय आशिया आणि दुसरी पश्चिम आशिया. हे मार्ग मालदीवच्या दक्षिणेकडील आणि उत्तरेकडील टोकांवर आहेत. त्यामुळे मालदीवला भारत इतके महत्त्व देत आहे. चीनचा देखील याच्यावरच डोळा आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ऊर्जा प्रवाहासाठी या मार्गांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहेत. आता भारत लक्षद्वीप बेटांना आणखी मजबूत तर करणारच आहे पण पर्यटनाच्या दृष्टीने देखील त्याला विकसित करणार आहे. ज्यामुळे भारताचे वर्चस्व हिंद महासागरात वाढणार आहे.

Follow Us
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा
चाकणकरांना अटक होत नाही म्हणजे... रुपाली ठोंबरेंचा खळबळजनक दावा.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पीडीत मुलीच्या धायरीमधील घरी पोहोचल्या,.
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले....
बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावरून राजकारणात मोठी खळबळ, म्हणाले.....
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत
'शिवसेना वाढवण्यासाठी महाराष्ट्रभर...' आईच्या समाधीस्थावर आशिर्वाद घेत.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे.
मोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याला 28लाखांची लाच घेताना रंगे..
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित...
गडचिरोलीत उष्णतेचा कहर; ट्रान्सफॉर्मर जळाले, वीजपुरवठा खंडित....
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने...
उबाठा गटाची हीच मानसिकता...शिंदे गटाची ताकद वाढल्याने....
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला
धाराशिवमध्ये महावितरणच्या सबस्टेशनला भीषण आग, वाढत्या उष्णतेमुळे उडाला.
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन
मोठी बातमी! पुण्यातील चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे याआधीही दोन.
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन...
मी आज तुमच्यासोबत आहे, पण उद्याचे सांगता येणार नाही; ठाकरेंच टेन्शन....