AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Highest Salary: भारतातील या राज्यात मिळतो सर्वाधिक पगार, महाराष्ट्राचा नंबर कितवा?

Highest Salary: भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक पगार मिळतो, तुम्हाला माहिती आहे का? तर देशातील सर्वात कमी पगार असलेली राज्य कोणती आहेत ती तुम्हाला माहिती आहेत का? RPG ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांची पोस्ट यामुळे चर्चेत आली आहे.

Highest Salary: भारतातील या राज्यात मिळतो सर्वाधिक पगार, महाराष्ट्राचा नंबर कितवा?
सर्वाधिक पगार कोणत्या राज्यात?Image Credit source: गुगल
| Updated on: Dec 05, 2025 | 4:07 PM
Share

Highest Salary in India News: भारतात पगाराचा आकडा सातत्याने बदलत आहे. देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक पगार मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर सर्वात कमी वेतन कोणत्या राज्यात मिळते याविषयीची चर्चा आता समाज माध्यमावर रंगली आहे. RPG समुहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर वाद पेटला आहे. प्रत्येक राज्यातील सरासरी मासिक वेतनाचे आकडे त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या पोस्टनुसार, जेव्हा तळागळातील कर्मचाऱ्याचे वेतन वाढेल. तेव्हा भारत सशक्त आणि समृद्ध होईल. भारतातील कोणते राज्य सर्वाधिक पगार देतात? महाराष्ट्राचा यामध्ये कितवा क्रमांक आहे?

सर्वाधिक पगार कुठे?

फोर्ब्स ॲडव्हायझर इंडियाचे हर्ष गोयंका यांनी नवीन आकडेवारी सादर केली आहे. त्यानुसार, 2025 पर्यंत भारताचे सरासरी मासिक वेतन 28000 रुपयांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. देशाची राजधानी दिल्ली, 35000 रुपयांच्या सरासरी मासिक वेतनासह या यादीत सर्वोच्च स्थानावर आहे. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात सरासरी मासिक वेतन 33000 रुपये इतके आहे.

कोणत्या क्रमांकावर महाराष्ट्र?

बेंगळुरू हे आयटी आणि स्टार्टअप हब आहे. येथे टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. इथे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. कंपन्या कर्मचाऱ्यांना तगडे वेतन देतात. तर महाराष्ट्राचा क्रमांक सरासरी वेतनात तिसरा आहे. महाराष्ट्रात सरासरी मासिक वेतन 32000 रुपये इतके आहे. तर त्यानंतर तेलंगाणा या राज्याचा क्रमांक आहे. येथे कर्मचाऱ्याला सरासरी 31000 रुपये प्रति महिना पगार मिळतो. मुंबई आणि पुणे येथे व्यावसायिक आणि हैदराबाद येथे आयटी कंपन्यांचे जाळे वाढले आहे. त्यामुळे या राज्यात सरासरी मासिक वेतनात वाढ झाली आहे.

बिहारची स्थिती सर्वात भयावह

बिहारमध्ये भारतातील सर्वात कमी सरासरी मासिक वेतन मिळते. येथे सरासरी मासिक वेतन केवळ 13500 रुपये मिळते. त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटे, येथे 13000 रुपये सरासरी मासिक वेतन मिळते. नागालँडमध्ये पगाराचा आकडा 14000 तर मिझोरमही या यादीत काठावर आहे. या राज्यात मर्यादीत रोजगार, लघु उद्योग, कमी गुंतवणूक यामुळे या राज्यात पगाराचा आकडा अगदी तोकडा आहे.

दक्षिण भारतातील राज्यात मजबूत पगार

दक्षिण भारतातील राज्य रोजगार आणि पगार याबाबतीत अग्रेसर आहेत. कर्नाटकाशिवाय तामिळनाडू राज्यातील सरासरी मासिक वेतन 29000, आंध्र प्रदेशमध्ये 26000 आणि केरळमध्ये सरासरी मासिक वेतन 24500 इतके आहे.

Follow Us
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या
शरद पवारांचा गट NDAच्या वाटेवर? थेट अमित शाहांसोबतच... पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली!
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... -प्रियांका गांधी
पंतप्रधानांनी कॅमेरा अँगल नव्हे तर हृदयाचा... नीट पेपरफुटीवर बोलताना प्रियंका गांधी हे काय बोलून गेल्या?
मंत्री-सचिव सगळेच घामाघुम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण..
मंत्री-सचिव सगळ्यांनाच फुटला घाम! शिंदेंच्या आढावा बैठकीत मोठं घडलं? शिक्षण खातं...
विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल
Priyanka Gandhi | विद्यार्थी दहशतवादी होते का? संसदेत प्रियंका गांधींचा सरकारला थेट सवाल; लाठीचार्जवरून मोदी-शहांकडे मागितलं उत्तर
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह...
परीक्षा सुधारणा विधेयकाबाबत लोकसभेत चर्चा, मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिली मोठी अपडेट
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत बैठक
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रालयांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक, ईराण-अमेरिका तणावादरम्यान...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे...
मोठा निर्णय! CJP आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे मागे; मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलिसांना तातडीचे आदेश
पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर
मोठा खुलासा! पुणे विद्यापीठात बनावट डिग्रीचा खेळ खल्लास; 70 हजारांच्या व्यवहारानंतर एकच खळबळ
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास...
शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर सहन करू, पण उद्योजकांना त्रास... गुलाबराव पाटलांचं विधान तुफान चर्चेत
उत्तम शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर..
मोठी कारवाई! शिंदेंविरोधात गुन्हा दाखल; सहकारी संघाच्या इमारतीवर बेकायदेशीर ताब्याचा आरोप