AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Highest Salary: भारतातील या राज्यात मिळतो सर्वाधिक पगार, महाराष्ट्राचा नंबर कितवा?

Highest Salary: भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक पगार मिळतो, तुम्हाला माहिती आहे का? तर देशातील सर्वात कमी पगार असलेली राज्य कोणती आहेत ती तुम्हाला माहिती आहेत का? RPG ग्रुपचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांची पोस्ट यामुळे चर्चेत आली आहे.

Highest Salary: भारतातील या राज्यात मिळतो सर्वाधिक पगार, महाराष्ट्राचा नंबर कितवा?
सर्वाधिक पगार कोणत्या राज्यात?Image Credit source: गुगल
| Updated on: Dec 05, 2025 | 4:07 PM
Share

Highest Salary in India News: भारतात पगाराचा आकडा सातत्याने बदलत आहे. देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक पगार मिळतो हे तुम्हाला माहिती आहे का? तर सर्वात कमी वेतन कोणत्या राज्यात मिळते याविषयीची चर्चा आता समाज माध्यमावर रंगली आहे. RPG समुहाचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांच्या सोशल मीडियावरील पोस्टनंतर वाद पेटला आहे. प्रत्येक राज्यातील सरासरी मासिक वेतनाचे आकडे त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या पोस्टनुसार, जेव्हा तळागळातील कर्मचाऱ्याचे वेतन वाढेल. तेव्हा भारत सशक्त आणि समृद्ध होईल. भारतातील कोणते राज्य सर्वाधिक पगार देतात? महाराष्ट्राचा यामध्ये कितवा क्रमांक आहे?

सर्वाधिक पगार कुठे?

फोर्ब्स ॲडव्हायझर इंडियाचे हर्ष गोयंका यांनी नवीन आकडेवारी सादर केली आहे. त्यानुसार, 2025 पर्यंत भारताचे सरासरी मासिक वेतन 28000 रुपयांपर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. देशाची राजधानी दिल्ली, 35000 रुपयांच्या सरासरी मासिक वेतनासह या यादीत सर्वोच्च स्थानावर आहे. कर्नाटक दुसऱ्या क्रमांकावर आहे. या राज्यात सरासरी मासिक वेतन 33000 रुपये इतके आहे.

कोणत्या क्रमांकावर महाराष्ट्र?

बेंगळुरू हे आयटी आणि स्टार्टअप हब आहे. येथे टेक कंपन्या मोठ्या प्रमाणावर आहेत. इथे मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळतो. कंपन्या कर्मचाऱ्यांना तगडे वेतन देतात. तर महाराष्ट्राचा क्रमांक सरासरी वेतनात तिसरा आहे. महाराष्ट्रात सरासरी मासिक वेतन 32000 रुपये इतके आहे. तर त्यानंतर तेलंगाणा या राज्याचा क्रमांक आहे. येथे कर्मचाऱ्याला सरासरी 31000 रुपये प्रति महिना पगार मिळतो. मुंबई आणि पुणे येथे व्यावसायिक आणि हैदराबाद येथे आयटी कंपन्यांचे जाळे वाढले आहे. त्यामुळे या राज्यात सरासरी मासिक वेतनात वाढ झाली आहे.

बिहारची स्थिती सर्वात भयावह

बिहारमध्ये भारतातील सर्वात कमी सरासरी मासिक वेतन मिळते. येथे सरासरी मासिक वेतन केवळ 13500 रुपये मिळते. त्यानंतर अंदमान आणि निकोबार बेटे, येथे 13000 रुपये सरासरी मासिक वेतन मिळते. नागालँडमध्ये पगाराचा आकडा 14000 तर मिझोरमही या यादीत काठावर आहे. या राज्यात मर्यादीत रोजगार, लघु उद्योग, कमी गुंतवणूक यामुळे या राज्यात पगाराचा आकडा अगदी तोकडा आहे.

दक्षिण भारतातील राज्यात मजबूत पगार

दक्षिण भारतातील राज्य रोजगार आणि पगार याबाबतीत अग्रेसर आहेत. कर्नाटकाशिवाय तामिळनाडू राज्यातील सरासरी मासिक वेतन 29000, आंध्र प्रदेशमध्ये 26000 आणि केरळमध्ये सरासरी मासिक वेतन 24500 इतके आहे.

Follow Us
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...