AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भारतातील कामगारांना काम करायचे नाही’, एल अँड टी चेअरमन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावरून वाद

'90 तास काम' या विधानाने प्रकाशझोतात आलेले लार्सन अँड टुब्रोचे (L&T) चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांनी भारतीय कामगारांवर वक्तव्य करून नवा वाद निर्माण केला. नुकत्याच पार पडलेल्या सीआयआय मिस्टिक साऊथ ग्लोबल लिंकेज समिट 2025 मध्ये ते म्हणाले की, ‘भारतातील कामगार काम करण्यास तयार नाहीत, यामुळे उद्योगासमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत.’

'भारतातील कामगारांना काम करायचे नाही', एल अँड टी चेअरमन सुब्रमण्यम यांच्या वक्तव्यावरून वाद
लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम
| Edited By: Jitendra Zavar | Updated on: Feb 14, 2025 | 8:06 PM
Share

लार्सन अँड टुब्रोचे (L&T) चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सीआयआय मिस्टिक साऊथ ग्लोबल लिंकेज समिट 2025 मध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यावर आता जोरदार टीका होऊ लागली आहे.

सीआयआय मिस्टिक साऊथ ग्लोबल लिंकेज समिट 2025 मध्ये लार्सन अँड टुब्रोचे (L&T) चेअरमन एस. एन. सुब्रमण्यम म्हणाले की, ‘भारतातील कामगार काम करण्यास तयार नाहीत, यामुळे उद्योगासमोर अनेक आव्हाने निर्माण होत आहेत.’ या वक्तव्यावरुन आता वाद निर्माण झाला आहे.

एसएन सुब्रमण्यम यांच्या या वक्तव्यावर भाजपचे खासदार आणि कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे (कॅट) सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी जोरदार टीका केली आहे.

वीण खंडेलवाल यांनी सुब्रमण्यम यांचे विधान भारतातील कष्टकरी जनतेची दिशाभूल करणारे, अपमानजनक आणि मनोबल खच्चीकरण करणारे असल्याचे म्हटले आहे. खंडेलवाल म्हणाले की, सुब्रमण्यम यांचे वक्तव्य केवळ दिशाभूल करणारेच नाही तर भारतातील तळागाळातील स्तरावर झालेल्या महत्त्वपूर्ण प्रगती आणि विकासाबद्दल अपमानजनक आणि मनोबल कमी करणारे आहे.

ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मनरेगा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अशा अनेक योजनांचा फायदा भारतीय कामगारांना होत आहे. यामुळे आपली स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. सुब्रमण्यम यांचे विधान म्हणजे देशातील कामगारांचा थेट अपमान असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात ज्या प्रकारे पायाभूत सुविधांचा विकास होत आहे, त्यामुळे आपले गाव आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होत आहे.

सुब्रमण्यम काय म्हणाले?

सुब्रमण्यम म्हणाले होते की, जगभरातील लोक चांगल्या रोजगाराच्या शोधात आपल्या देशाबाहेर जात आहेत, परंतु भारतात परिस्थिती उलट आहे. इथले कामगार कामानिमित्त गावाबाहेर जायला तयार नाहीत. भारतीय कामगारांच्या कामाच्या अनिच्छेसाठी सरकारी कल्याणकारी योजनांना जबाबदार धरले. त्यासाठी मनरेगा, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (डीबीटी) आणि जनधन खात्यांसारख्या कार्यक्रमांना जबाबदार धरले. या योजनांअंतर्गत कामगारांना घरबसल्या कामासाठी पैसे मिळतात, जेणेकरून त्यांना बाहेर जाऊन कष्ट करण्याची गरज भासणार नाही.

या योजनांमुळे कामगारांना घरबसल्या रोजगार मिळणे शक्य झाले आहे आणि म्हणूनच ते बांधकाम उद्योगासारख्या क्षेत्रात काम करण्यासाठी गावाबाहेर पडत नाहीत, असे त्यांचे मत आहे. जोपर्यंत सरकार या योजना सुरू ठेवेल, तोपर्यंत भारतात कामगारांची कमतरता भासणार असून उद्योगांना त्याची मोठी किंमत मोजावी लागणार आहे.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!