AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतंजलीने पहिल्यांदात केली घोषणा, केली सुमारे २,५०० कोटींची कमाई

बीएसईच्या आकड्यांनुसार पतंजली फूड्सच्या शेअरचे भाव अनेक दिवसांपासून वाढले आहेत. आकड्यानुसार कंपनीचा शेअरचे भाव ४.०५ टक्के उसळी घेऊन १,७४३.१५ रुपयांवर बंद झाले आहेत, कंपनीचा शेअर कामकाजाच्या सत्रात १,७५१.७० रुपयांच्या दिवसभराच्या कमाल पातळीवर पोहचला होता.

पतंजलीने पहिल्यांदात केली घोषणा, केली सुमारे २,५०० कोटींची कमाई
| Updated on: Jul 15, 2025 | 8:54 PM
Share

बाबा रामदेव यांच्या पंतजली फूड्स पहिल्यांदा घोषणा केली आहे की त्यांच्या कंपनीने २,५०० कोटींची कमाई केली आहे. ही गोष्ट अगदी खरी आहे. वास्तविक पतंजली फूड्सने पहिल्यांदा गुंतवणूकदारांना बोनस शेअर देण्याची तयारी केली आहे.१७ जुलै रोजी यावर विचार करुन घोषणा केली जाणार आहे. त्यानंतर कंपनीचा शेअर सतत वाढतच आहे. एका क्षणी कंपनीचा शेअर १,७५० रुपयांच्या पार गेला होता. परंतू बाजार बंद होईपर्यंत कंपनीच्या शेअरमध्ये चार टक्के वाढ दिसली. त्यामुळे कंपनीचा मार्केट कॅप ( बाजारमुल्य ) २,५०० कोटींवर पोहचले आहे.

कंपनीचा शेअरमध्ये मोठी उसळी

बीएसईच्या आकड्यांनुसार पतंजली फूड्सच्या शेअरमध्ये अनेक दिवसांपासून वाढ पाहायला मिळत आहे. आकडेवारी नुसार कंपनीचा शेअर ४.०५ टक्के वेगाने वाढत शेअरचा भाव १,७४३.१५ रुपयांवर बंद झाला आहे. कंपनीचा शेअर कामकाजाच्या सत्रात १,७५१.७० रुपयांचा दिवसाच्या सर्वोच्च पातळीवर पोहचला होता. कंपनीचा शेअर कामकाज सुरु होताना १,६७५.३५ या भावाने सुरु झाला होता.४ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचा शेअर २,०३०.०० रुपयांसह ५२ आठवड्यांच्या सर्वाच्च पातळीवर पोहचला होता.यामुळे कंपनीचा शेअर रेकॉर्ड हायवरुन १४ टक्के जास्त खाली पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते येत्या काही दिवसात पतंजली फूड्स शेअरचे भावात आणखीन वाढ पाहायला मिळेल.

सुमारे २,५०० कोटींचा फायदा

कंपनीच्या शेअरचे भाव वाढल्याने पतंजली फूड्सचे मार्केट कॅप देखील चांगल्या पद्धतीने वाढलेला पाहायला मिळत असून तो जवळपास २,५०० कोटीवर पोहचला आहे.आकड्यांना पाहाता १४ जुलै रोजी म्हणजे एक दिवस आधी कंपनीचा मार्केट कॅप ६०,७३२.४९ कोटी रुपये पहायला मिळाला होता.जो मंगळवारी शेअरबाजार बंद होईपर्यंत ६३,१९०.२९ कोटी रुपयांपर्यंत पोहचला आहे. याचा अर्थ कंपनीचे मार्केट कॅपमध्ये २,४५७.८ कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या मते कंपनीचे टार्गेट लवकरात लवकर मार्केटचा कॅपला ७० हजार कोटीच्या रुपयांच्या पार घेऊन जाणार आहे.

का आली कंपनीच्या शेअरमध्ये वाढ

पतंजली फूड्सच्या शेअरच्या तेजीत ही वाढ उगाच झालेली नाही. लवकरच कंपनी आपल्या शेअरधारकांना मोठे गिफ्ट देणार आहे. माहितीनुसार पतंजली फूड्समध्ये पहिल्यांदा बोनस शेअर करण्याची घोषणा करु शकते. कंपनीने शेअर बाजाराला माहीती देताना सांगितले की कंपनी बोर्ड १७ जुलै रोजी बोनस शेअर जाही करण्यावर विचार करु शकते. बाबा रामदेव यांची परेंट कंपनीने साल २०१९ रोजी रुची सोयाला खरेदी केली होती. जिचे नाव २०२२ रोजी नाव बदलून पतंजली फूड्स असे केले आहे. त्यानंतर कंपनीने ४,३०० कोटी रुपयांचा एफपीओ आणला होता.

Follow Us
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं
अशोक खरातच्या मुलीच्या लग्न पत्रिकेत सत्ताधारी- विरोधकांची नावं.
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या...
मोठं संकट? वैजापूरमध्ये संध्याकाळी अचानक विमानाच्या घिरट्या....
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत
अशोक खरात प्रकरणात नवी नावं समोर; संजय राऊतांची प्रतिक्रिया चर्चेत.
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका
इराण-अमेरिका तणावावरून राऊतांचा ट्रम्पवर निशाणा; भाजपवरही जोरदार टीका.
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?
भोंदूबाबा खरातला आमदार करायचं होतं? तृप्ती देसाईंचा खळबळजनक दावा काय?.
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.