शरीरात वात दोष का वाढतो ? पतंजलीने सांगितला कमी करण्याचा उपाय
आयुर्वेदात निरोगी राहण्यासाठी वात, आणि कफ यांचे योग्य संतुलन आवश्यक आहे. या तिन्ही घटकांपैकी एकाचे जरी संतुलन ढळले तर शरीरात आजार डोके वर काढतात. पतंजली हे वात,कफ आणि पित्त वाढण्याची कारणे आणि उपाय सांगितलेले आहेत.

आयुर्वेदानुसार निरोगी राहण्यासाठी शरीरात कफ,वात आणि पित्त या तिघांचे संतुलन होणे खूपच गरजेचे असते. परंतू आजकालच्या बदलत्या लाईफ स्टाईल आणि चुकीच्या आहार पद्धतीने आरोग्यावर वाईट परिणाम होत आहे. तेलकट आणि मसालेदार जेवणाने पित्तदोष होऊ शकतो. तसाच प्रकार वात आणि कफासोबत होतो. जर या तिघांचे शरीरातील संतुलन बिघडले तर या संलग्न अडचणी आणि आजाराचा सामना करावा लागू शकतो. यात दोष व्यक्तीच्या प्रकृतीनुसार वेगवेगळी लक्षणं नजरेला येऊ शकतात.
शरीरात वात दोष वाढल्याने स्कीन ड्राय होणे, बद्धकोष्ठता किंवा सांध्या दुखी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. याशिवाय खुपसारे बदल होऊ शकतात.यासाठी शरीरात वाताचे संतुलन असणे गरजेचे असते. आता पित्त आणि कफ दोषासंदर्भात पाहूयात अनेक लोकांना माहीती आहे. परंतू शरीरात वात का वाढतो आणि त्याला कमी केले जाऊ शकते का ? या संदर्भात पतंजलीची पुस्तकात काय लिहीले आहे हे पाहूयात…
योग गुरु बाबा रामदेव यांनी सुरु केलेल्या पतंजलीचा मुख्य उद्देश्य लोकांमध्ये आयुर्वेदाप्रती जागरुकता वाढवणे हा आहे. आचार्य बालकृष्ण यांनी आयुर्वेदाची माहीती देण्यासाठी एक पुस्तक लिहीले आहे. त्याचे नाव “द सायन्स ऑफ आयुर्वेदा” असे आहे. या पुस्तकात वात दोषासंदर्भात खुपसारी माहीती दिली आहे. त्यांनी लिहीलेल्या या पुस्तकातून जाणून घेऊयात की वातदोष शरीरात का बिघडतो आणि कसा कमी करता येतो?
वातदोष
वात दोष हा आकाश आणि वायू या दोन्ही तत्वांपासून मिळून तयार होतो. जो तिन्ही दोषात सर्वात महत्वाचा मानला जातो. हा शरीरात हालचाल आणि सर्क्युलेशनला नियंत्रित करतो. चरक संहितेत वायूलाच पाचक अग्नी वाढणारा म्हटले आहे. सर्व इंद्रियांचा इफेक्टर आणि उत्साहाचा केंद्र मानला गेला आहे. वात शरीराच्या पोट आणि आतड्यात असतो.
वातामध्ये जुळण्याचा एक असा खास गुण असतो त्याने दुसऱ्या दोषांसोबत मिळून त्यांच्या गु्णांना देखील तो आपलेसे करतो. उदाहरणार्थ जर हा पित्तदोषासोबत मिळाला तर या उष्णतेचे गुण येतात. तर जर हा कफ दोषासोबत मिळाला तर शरीरात थंडपणाचे गुण वाढतात.
वात पाच प्रकारचे असतात
प्राण वात : याला जीवन ऊर्जा किंवा प्राणशक्ती श्वास म्हणतात जी मेंदू, फुफ्फुसे आणि हृदयाचे कार्य नियंत्रित करते.
उदान वात : हा श्वसनसंस्था आणि बोलण्याच्या क्षमतेला नियंत्रित करतो
समान वात : हा पाचन आणि मेटाबॉलिज्ममध्ये असतो. जो जेवण पचवणे आणि पोषक तत्वांना अब्सॉर्ब करणे आणि टॉक्सिन शरीराबाहेर टाकण्याच्या कार्यात मोठी भूमिका बजावतो
अपान वात : हा शरीराच्या खालच्या भागाला, खासकर पचन यंत्रणेच्या खालच्या रिप्रोडक्टीव्ह आणि बाऊल मुव्हमेंटला नियंत्रित करण्यास मदत करतो.
व्यान वात : हा शरीरातील ब्लड सर्क्युलेशन आणि मसल्स मुव्हमेंट आणि नव्हर्स सिस्टीमला नियंत्रित करतो. सर्व अवयवांना एक्टीव्ह राखण्यासाठी याचा रोल देखील होतो.
वात दोषाच्या गुणांच्या मते वात प्रकृतीचे लक्षणं शरीरात नजर येतो. ज्यामुळे शरीरात कोरडेपणाचा गुण म्हणजे ड्रायनेस होण्याच्या कारणाने आवाज घोगरा होऊ शकतो. झोपेची कमी, झोप न लागणे, खूप पातळ आणि कोरडी त्वचा असणे अशी लक्षणे आहेत. थंडी वाजल्यास,थंड वस्तूंचा स्पर्श सहन न होणे, शरीराचा थरकाप किंवा सांध्यांच्या समस्या जास्त असणे अशी लक्षणे आहेत. वेगाने चालताना अडखळणे अशी लक्षणे दिसून येतात. याशिवाय केस, त्वचा, तोंड, दात आणि हातपाय कोरडे होणे हे देखील त्याचे एक लक्षण आहे. दुसरीकडे, वात स्वभावाचे लोक त्यांचे निर्णय खूप लवकर घेतात. त्यांना राग खूप लवकर येतो आणि त्या चिडचिड करतात. दुसरीकडे, पित्त स्वभावाचे बाबींना लवकर समजून घेणे आणि लवकर विसरणे अशा स्वरूपाचे असू शकतात.
शरीरात वातदोष वाढण्याची कारण
शरीरात वातदोष वाढण्याची अनेक कारण असू शकतात त्यात वाढते वय सर्वात मोठे कारण आहे. ताण, थकवा, भीती यामुळे वात वाढू शकतो.शरीरात वात वाढण्याची कारण युरिन वा शिंकेला रोखणे हे देखील असू शकते.
शरीरात होणारा कोणताही बदल हा आपल्या आहारामुळे होतो. पहिले अन्न पचण्यापूर्वी काहीतरी खाणे किंवा जास्त प्रमाणात खाणे, जास्त कडू किंवा तुरट पदार्थ खाणे हे देखील याचे कारण असू शकते. याशिवाय, जास्त कोरडी फळे खाणे, जास्त थंड अन्न खाणे आणि तणावासारख्या मानसिक आरोग्य समस्यांमुळे देखील शरीरात वात दोष वाढू शकतो. पुरेशी झोप न घेणे आणि क्षमतेपेक्षा जास्त काम करणे, याशिवाय, पावसाळा देखील शरीरात वात वाढण्याचे कारण असू शकते.
शरीरात ही लक्षणे दिसतात
जेव्हा शरीरात वात दोष वाढतो तेव्हा या काळात ही लक्षणे दिसू शकतात. डोळ्यांत कोरडेपणा किंवा खडबडीतपणा जाणवणे, सुईसारखे वेदना होणे किंवा हाडे तुटणे किंवा निखळणे, हातपाय थरथरणे आणि सुन्न होणे, थंडी जाणवणे, वजन न वाढणे, बद्धकोष्ठता, वेदना, निस्तेज त्वचा, खराब नखे आणि तोंडात वाईट चव येणे. जास्त ताण घेणे, एकाग्रता कमी असणे, अतिक्रियाशील मन, नैराश्य, कान, आराम करण्यास असमर्थता, अस्वस्थता आणि भूक कमी असणे ही देखील त्याची एक लक्षणे आहेत.
पतंजलीचे वातावर नियंत्रण ठेवण्याचे घरगुती उपाय
शरीरातील वाढत्या वातदोषावर नियंत्रण ठेवण्यासाठी, सर्वप्रथम त्याच्या वाढीचे कारण काय आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. योग्य आहार आणि औषधांनी ते बरे करता येते. यासोबतच जीवनशैलीत बदल करणे देखील आवश्यक आहे. वात संतुलित करण्यासाठी, आहारात लोणी, तेलकट आणि चरबीयुक्त, काळ्या गोष्टींचा समावेश करा. तसेच, गरम पाण्याने आंघोळ करता येते. वात कमी करणाऱ्या औषधांपासून तयार केलेल्या काढ्याच्या मदतीने घाम आणणे देखील समाविष्ट आहे. उष्ण गुणधर्म असलेल्या वस्तूंचे सेवन करता येते.
उपाय काय आहेत ?
हात आणि पाय दाबणे, वात कमी करणाऱ्या पदार्थांनी मालिश करणे, गहू, तीळ, आले, लसूण आणि गूळ यासारख्या पदार्थांचे सेवन केल्याने देखील वात दोष नियंत्रित होण्यास मदत होते. वात वाढल्यावर दिसणाऱ्या लक्षणांवर उपचार करणे, जसे की मानसिक आरोग्य समस्यांसारखी लक्षणे दिसत असतील तर मानसिक तणाव किंवा नैराश्यासारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मानसशास्त्रज्ञांकडून उपचार घेणे यामध्ये समाविष्ट आहे.
विश्रांती घ्या, मानसिक दबाव आणि ताण टाळा. निकोटीन, कॉफी, चहा आणि अल्कोहोलचे सेवन टाळा. कोमट तेलाने नियमितपणे मालिश करा, तुम्ही मालिशसाठी तीळ तेल, बदाम तेल आणि ऑलिव्ह तेल वापरू शकता. दररोज व्यायाम करा. या काळात, कोबी, फुलकोबी, ब्रोकोली, नाशपाती आणि कच्चे केळ खाणे टाळण्याचा सल्ला दिला जातो
