Post Office Scheme : पोस्टाची तगडी स्कीम, दररोज 138 रुपये वाचवा, 23 लाख मिळवा, तब्बल 10 लाखांचा बोनस

तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात पण कुठे करावं हे तुम्हाला समजत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करुन देत आहोत (post office RPLI scheme will give you high returns).

Post Office Scheme : पोस्टाची तगडी स्कीम, दररोज 138 रुपये वाचवा, 23 लाख मिळवा, तब्बल 10 लाखांचा बोनस
बँकेप्रमाणे पोस्ट ऑफिसमध्ये फसवणूक झाल्यास काय करावे?
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 8:00 PM

मुंबई : तुम्ही कुठेतरी गुंतवणूक करण्याच्या विचारात आहात पण कुठे करावं हे तुम्हाला समजत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध करुन देत आहोत. गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिस हे एक चांगलं आणि सुरक्षित प्लॅटफॉर्म आहे. देशभरातील लाखो महिला, कष्टकरी माणसं पोस्टातील विविध योजनांअंतर्गत पैशांची गुंतवणूक करतात. पोस्टातील अशाच एका महत्त्वपूर्ण योजनेविषयी माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत (post office RPLI scheme will give you high returns).

योजनेचं नाव नेमकं काय?

या योजनेचं नाव सुमंगल रुरल पोस्टल लाईफ इन्शूरन्स स्कीम असं आहे. ही योजना ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी आहे. विशेष म्हणजे या योजनेत तुम्हाला विमा देखील मिळणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला आवश्यक असेल तेव्हा निश्चित रक्कमही मिळेल. या योजनेअंतर्गत तुम्ही दररोज 138 रुपये भरुन 23 लाख रुपयांपर्यंत पैसे मिळवू शकता (post office RPLI scheme will give you high returns).

योजनेविषयी माहिती

या योजनेची सुरुवात 1995 मध्ये झाली. या योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिस सहा वेगवेगळ्या वीमा विमा योजना सादर करतं. या योजनेअंतर्गत सम एश्योर्ड रक्कम ही 10 हजार रुपये आणि अधिकाधीक रक्कम ही 10 लाख रुपये इतकी आहे. पॉलिसी पूर्ण होईपर्यंत वीमाधारक जिवंत असेल तर त्या व्यक्तीला मनीबँकचा देखील फायदा होईल. या व्यतिरिक्त जर वीमाधारकाचा मृत्यू झाला तर वारसाला सम एश्योर्ड रकमेसह बोनस दिला जातो.

योजनेसाठी निकष काय?

या योजनेअंतर्गत गुंतवणूक करण्यासाठी कमीतकमी वय 19 आणि जास्तीत जास्त वय हे 45 असणं गरजेचं आहे. सुमंगल योजनेसाठी दोन पर्याय आहेत. यापैकी एक पर्याय हा 15 वर्ष तर दुसरा पर्याय हा 20 वर्षांचा आहे. तुम्ही जर 15 वर्षांची पॉलिसी घेतली तर तुम्हाला 6, 9 आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी 20 टक्के मनी बँकचा लाभ मिळेल. त्याचबरोबर मॅच्यूरिटीच्या वेळी बोनससोबतच उर्वरित 40 टक्के रक्कम मिळेल. याशिवाय तुम्ही 20 वर्षांची पॉलिसी घेतली तर तुम्हाला 8, 12, 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रत्येकी 20 टक्के पैसे मिळतील. इतर रक्कम 20 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मिळेल. याशिवाय त्यावर बोनस देखील दिला जाईल.

या योजनेता फायदा नेमका काय?

एखादी व्यक्ती 25 वर्षाच्या वयात 20 वर्षांची पॉलिसी घेत असेल आणि 10 लाख रुपये सम एश्योर्ड रक्कम असेल तर त्या व्यक्तीला प्रत्येक महिन्याला 4150 रुपये भरावे लागतील. याचा अर्थ दररोज त्या व्यक्तीला 138 रुपयांची बचत करावी लागेल. या व्यक्तीला नियमांनुसार 8, 12, 16 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 20 टक्के रक्कम म्हणजेच प्रत्येकी 2 लाख रुपये मिळतील. त्यानंतर 20 वर्षांनी 4 लाख रुपये रक्कम सम एश्योर्डच्या रुपात मिळेल. या रकमेवर 65 रुपयांच्या हिशोबाने प्रती हजार वार्षिक बोनस मिळेल. 10 लाख रुपयांच्या एश्योर्ड रकमेवर 65 हजार रुपयांचा बोनस दर वर्षाला मिळेल. याचा अर्थ 20 वर्षात तुम्हाला 13 लाख रुपये बोनस म्हणून वेगळे मिळतील. म्हणजेच या योजनेअंतर्गत तुम्हाला जवळपास 23 लाख रुपये मिळतील.

हेही वाचा : Gold Silver Rate Today | रुपयात घसरण झाल्याने सोन्याचे भाव वधारले, जाणून घ्या आजचा दर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.