AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेमानंद महाराजांमुळे 17 वर्षीय तरुणाची चांदीच चांदी, रोज 5 हजारांची कमाई, लोक म्हणतात हे तर पुण्य…

Premanand Maharaj Yatra : समाज माध्यमावर लोकप्रिय प्रेमानंद महाराज रोज पदयात्रा करतात. त्यांचे भल्या पहाटे दर्शन व्हावे यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी असते. भाविक भक्त त्यांची वाट पाहतात. या पदयात्रेमुळे एका 17 वर्षीय तरुणाला खास लॉटरी लागली आहे.

प्रेमानंद महाराजांमुळे 17 वर्षीय तरुणाची चांदीच चांदी, रोज 5 हजारांची कमाई, लोक म्हणतात हे तर पुण्य...
कमाईच कमाई
| Updated on: Feb 21, 2025 | 4:51 PM
Share

प्रेमानंद महाराज हे सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय आहेत. त्यांचे किर्तन, त्यांचा उपदेश, त्यांचे कथासार ऐकण्यासाठी, भागवत सार ऐकण्यासाठी अनेकजण युट्यूब वा इतर समाज माध्यमांचा वापर करतात. अनेक सेलिब्रिटी, दिग्गज त्यांच्या दरबारात हजेरी लावतात. त्यांना मनातील प्रश्न, अडचणी विचारतात. ते कोणतेही कर्मकांड सांगत नाहीत. नाम जपाचा महिमा सांगतात. चमत्कार, पाखंडावर आसूड ओढतात. साध्या भक्तीने सुद्धा जीवन जगता येते, असे प्रबोधन ते करतात. प्रेमानंद महाराज रोज पदयात्रा करतात. त्यांचे भल्या पहाटे दर्शन व्हावे यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी असते. भाविक भक्त रस्त्यावर त्यांची वाट पाहतात. या पदयात्रेमुळे एका 17 वर्षीय तरुणाला खास लॉटरी लागली आहे. हा तरूण रोज 5 हजार रुपयांची कमाई करतो. पदयात्रेमुळे त्याला पुण्यच मिळत नाही तर त्याची चांगली कमाई सुद्धा होते.

फुल विक्रीतून तरुणाची मोठी कमाई

प्रेमानंद महाराज रोज पद यात्रा करतात. त्यांच्या या पदयात्रेवेळी अनेक भाविक हे त्यांच्या मार्गावर फूल उधळतात. या रस्त्यावर जणू फुलांचा सडा पडतो. पाकळ्यांनी रस्ता भरून जातो. 17 वर्षांचा शांतनू यामधून कमाई करतो. तो या पद मार्गावर फुल विक्रीचा व्यवसाय करतो. अनेक ठिकाणी लोक त्याच्याकडून फूल खरेदी करतात. या फुलाच्या विक्रीतून त्याची मोठी कमाई होते. त्यावर त्याचे घर चालते.

शांतनू म्हणतो की, तो प्रत्येक रात्री 10:00 वाजता फूल विक्री करण्यासाठी येतो. तो जवळपास रात्री 1:00 पर्यंत फुलांच्या पॅकेटची विक्री करतो. तो रोज जवळपास 100 फुलांच्या पॅकेटची विक्री करतो. एक पॅकेट 50 रुपयांना विकतो. त्यातून त्याची मोठी कमाई होते.

100 हून अधिक फूल पॅकेटची होते विक्री

शांतनू याने फूल विक्रीविषयी माहिती दिली आहे. त्याच्या मते, रोज फूल पॅकेटची विक्री होते. कधी कधी तो 100 हून अधिक फूल पॅकेटची विक्री करतो. तर कधी कधी कमी विक्री होते. पण रोज त्याची फूल विकल्या जातात. रात्रीच्या वेळी हजारो भाविक येतात. त्यावेळी रस्ता विविध फुलांनी सजावला जातो. काही जण रांगोळी काढतात. शांतनू या ठिकाणी फुलाची विक्री करतो, त्यातून तो रोज जवळपास 5 हजार रुपयांची कमाई करतो.

Follow Us
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर? 
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं
मृत्युदंड की जन्मठेप? कोर्टाने सुट्टीच्या दिवशी... मुख्यमंत्र्यांचं नसरापूर अत्याचार प्रकरणी मोठं विधान
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे...
राज ठाकरेंच्या संतापानंतर जैन समाज नरमला; शिवाजी महाराजांच्या जिरे टोपावरील वाद... शिवतिर्थावर मोठं घडलं?
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चो
शिवसेनेने दान केलेली 4 किलो चांदीची ती विट अन्... अयोध्या मंदिरातील चोरीबाबत राऊतांचं खळबळजनक ट्वीट
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही...
Sanjay Raut | अशी अवस्था होईल की... पुन्हा कधीच सत्ता येणार नाही... संजय राऊतांनी आज पत्रकार परिषदेत हे काय सांगून टाकलं?