AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या गृहकर्जाचा EMI कमी होणार, आरबीआयकडून दिलासा

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. 0.25 टक्क्यांची कपात आरबीआयने रेपो रेटमध्ये केली असून, रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्क्यांवर आले आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतरही अनेक कर्जांवर याचा चांगला परिणाम होईल. गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, गृहकर्जदारांमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या […]

तुमच्या गृहकर्जाचा EMI कमी होणार, आरबीआयकडून दिलासा
तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढेच कर्ज फेडले तरी हरकत नाही. कर्जाची मूळ रक्कम कमी झाल्यास साहजिकच तुमचे व्याजही कमी होईल. त्यामुळे तुम्हाला कमी रकमेचा हप्ता भरावा लागेल. लोन फोरक्लोझरसाठी केवायएसी आणि इतर कागदपत्रे बँकेत जमा करावी लागतील. लोन फोरक्लोजर करताना तुमच्या मालमत्तेची कागदपत्र बँकेकडून घ्यायया विसरु नका.
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:29 PM
Share

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो रेटमध्ये कपात केली आहे. 0.25 टक्क्यांची कपात आरबीआयने रेपो रेटमध्ये केली असून, रेपो रेट 6.50 टक्क्यांवरुन 6.25 टक्क्यांवर आले आहे. गृहकर्ज, वाहन कर्ज आणि इतरही अनेक कर्जांवर याचा चांगला परिणाम होईल. गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाल्याने, गृहकर्जदारांमध्ये काहीसं आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. रिझर्व्ह बँकेने गेल्या तीन पतधोरणांमध्ये रेपो रेटमध्ये कोणतेही बदल केले नव्हते.

2019-2020 या आर्थिक वर्षासाठी 7.4 एवढं जीडीपीचं लक्ष्य रिझर्व्ह बँकेने जाहीर केले आहे.

तसेच, रिझर्व्ह बँकेचे दर कमी केल्यानंतर रिव्हर्स रेपो रेट 6 टक्के होईल. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेने आपलं मत तटस्थ ठेवलं असून, मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या 6 सदस्यांमध्ये 4 जणांनी दर कमी करण्यासाठी मत दिले आहे.

अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी एक मोठी संस्था उभारावी, असा प्रस्ताव रिझर्व्ह बँकने दिला आहे.

शेतकऱ्यांसाठी काय?

शेतकऱ्यांसाठीही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. काहीही तारण न ठेवता एक लाख 60 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. याआधी ही मर्यादा एक लाख रुपयांपर्यंतच होती. आता 60 हजार रुपयांची रक्कम यात वाढवण्यात आली आहे.

पुढील अंदाज काय?

आरबीआयच्या मते, जानेवारी ते मार्च 2019 दरम्यान महागाईचे दर 2.8 टक्के राहील, तर एप्रिल ते सप्टेंबर 2019 च्या दरम्यान महागाई दर 3.2 टक्के ते 3.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे. रिझर्व्ह बँकेच्या या अंदाजामुळे येत्या काळातही व्याजाचे दर कमी होण्याची शक्यता वाढली आहे.

VIDEO : आरबीआयची पत्रकार परिषद

Follow Us
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास
जिल्हा परिषदेत भाजपाचा अध्यक्ष होईल! चंद्रकांत पाटील यांचा विश्वास.
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी
सोलापूरात मराठा क्रांती मोर्चाकडून काळी रंगपंचमी साजरी.
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह
भारताला पुन्हा विश्वचषक जिंकण्याची संधी! क्रिकेटप्रेमींचा उत्साह.
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर
संतोष देशमुख हत्या प्रकरण; आरोपी जयराम चाटे एक दिवस जेलबाहेर.
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!
बहुप्रतिक्षीत सायन उड्डाणपूल 15 ऑगस्टला खुला होणार!.
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.