AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी! मुकेश अंबानींकडून नव्या कंपनीची घोषणा, भारतात नव्या क्रांतीचे वारे!

रिलायन्स इंडस्ट्रिज हा देशातील सर्वात मोट्या उद्योग समूहांपैकी एक आहे. या उद्योग समूहाने आतापर्यंत अनेक क्षेत्रांत आपला विस्तार केलेला आहे. विशेष म्हणजे हा विस्तार करून रिलायन्स उद्योग समूहाने भरपूर नफा कमवला आहे. दरम्यान, आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. या उद्योग समूहाने एका नव्या उपकंपनीची घोषणा केली आहे.

सर्वात मोठी बातमी! मुकेश अंबानींकडून नव्या कंपनीची घोषणा, भारतात नव्या क्रांतीचे वारे!
mukesh ambani
| Updated on: Aug 29, 2025 | 5:29 PM
Share

Reliance Intellengince : रिलायन्स इंडस्ट्रिज हा देशातील सर्वात मोट्या उद्योग समूहांपैकी एक आहे. या उद्योग समूहाने आतापर्यंत अनेक क्षेत्रांत आपला विस्तार केलेला आहे. विशेष म्हणजे हा विस्तार करून रिलायन्स उद्योग समूहाने भरपूर नफा कमवला आहे. दरम्यान, आता मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. या उद्योग समूहाने एका नव्या उपकंपनीची घोषणा केली आहे. या घोषनेंतर आता भारतात नवी क्रांती येणार, असे बोलले जात आहे.

मुकेश अंबानी यांनी काय घोषणा केली आहे?

रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी वार्षिक सर्वसाधारण बैठकीत (एजीएम) नव्या कंपनीची घोषणा केली आहे. या कंपनीचे नाव रिलायन्स इंटेलिजन्स असे असेल. तसेच ही कंपनी पूर्णत: रिलायन्सच्या मालकीची असून ती एक अपकंपनी असेल, असे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे. भारताला कृत्रिम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात वैश्विक पातळीवर नेतृत्व करता यावे असा उद्देश या कंपनीचा असल्याचे यावेळी मुकेश अंबानी यांनी सांगितले आहे.

घोषणा करताना मुकेश अंबानी नेमकं काय म्हणाले?

सर्वसाधारण बैठकीत मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंटेलिजन्स या कंपनीची घोषणा करताना या कंपनीचे काम काय असेल याबाबतही सांगितले आहे. ही कंपनी प्रामुख्याने चार महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष ठेवणार आहे. या कंपनीच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर एआय डेटा सेंटर तयार केले जाईल. हे डेटा सेंटर अपारंपरिक उर्जेवर चालेल. या डेटा सेंटरची निर्मिती गुजरातमधील जामनगर येथे केली जात आहे.

कोणकोणत्या क्षेत्रात ही कंपनी काम करणार?

मुकेश अंबानी यांची ही नवी कंपनी जगभरातील प्रमुख टेक कंपन्या तसेच ओपन-सोअर्स कम्यूनिटीसोबत काम करेल. भारतातील सामान्य जनता, छोटे व्यावसायिक, मोठे उद्योजक यांना विश्वसनीय एआय सेवा उपलब्ध होतील. शिक्षण, कृषी आदी क्षेत्रातील समस्यांवर एआय आधारित उत्तर शोधण्यासाठी काम केले जाईल. त्यामुळे आता ही कंपनी भविष्यात नेमकी काय क्रांती करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच,बंड करण्याआधी
ठाकरेंच्या खासदारांना मोठं गिफ्ट? मंत्रिपदासाठी रस्सीखेच, बंड करण्याआधीच...ऑपरेशन लोटसबाबत मोठी माहिती समोर!
राजकीय हालचालींना वेग! ठकारेंचे चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं
राजकीय हालचालींना वेग! ठकारे सेनेतील चार खासदार उद्या दिल्लीत, कारण... मोठं घडणार?
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला...
धक्कादायक! फ्लॅट घेण्यच्या बहाण्याने लव्ह जिहाद? नंतर नशेत तिला... नागपूरमध्ये डोकं चक्रावणारा प्रकार
काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर... गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकद
Chandrapur | काँग्रेसमधील अंतर्गत संघर्ष चव्हाट्यावर...  गटनेतेपदाचा वाद पुन्हा एकदा चिघळणार
महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
Chandrashekhar Bawankule | महिलांसाठी सरकारची मोठी घोषणा! बचत गटांना एक लाख रुपये आणि जमीन देणार
तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळं; संशयाचा काटा
Sanchita Ugle Case | तिच्यासोबत काम करणारेच... संचिताच्या वडिलांना रडूच कोसळलं; संशयाचा काटा नेमका कुणावार
एकही मत फुटता कामा नये; महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
एकही मत फुटता कामा नये; विधान परिषद निवडणुकीत महायुतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा व्हीप
उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
मोठी बातमी! पांढऱ्या कोटामागचा काळा चेहरा? उपचाराच्या बहाण्याने डॉक्टरची घृणास्पद कृती; अन् पुढे जे घडलं....
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केल
ऑपरेशन टायगर खरंच सुरू आहे? प्रश्न विचारताच एकनाथ शिंदेंनी हात वर केला अन्...त्या कृतीची सगळीकडे चर्चा!
मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप..
Manda Mhatre | मंदा म्हात्रे यांचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर पुन्हा गंभीर आरोप, भाजपाचे दोन्ही नेत्यांमध्ये मोठा वाद!