
जिओ आज भारतातील सर्वात मोठे मोबाईल नेटवर्क असलेली कंपनी बनली आहे. भारतात जिओचे जवळपास 47 कोटी ग्राहक आहेत. जी भारतातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार ऑपरेटर कंपनी आहे. मोफत सेवा देत सुरु झालेल्या कंपनीने आर्थिक वर्ष 2020 मध्ये तब्बल 12,537 कोटी रुपये नफा कमवला होता. ग्राहकांना 2 वर्ष मोफत सेवा देणारी ही कंपनी आता मोठा नफा कमवत आहे. पण जिओ कंपनी स्थापन करण्याची आयडिया मुकेश अंबानी यांना आली कशी? जिओने कोणतं बिझनेस मॉडेल वापरलं याबाबत अनेकांना जाणून घ्यायला आवडेल.? या बातमीत आपण रिलायन्स जिओच्या बिझनेस मॉडेलवर तपशीलवार चर्चा करणार आहोत. जिओचे धोरण, उत्पादन विभागणी, स्पर्धात्मक विश्लेषण याबाबत आपण जाणून घेणार आहोत. JIO ची आयडिया आली कशी? मुकेश अंबानी यांची मुलगी इशा अंबानी अमेरिकेत शिक्षणासाठी गेली होती. कॉलेजला सुट्ट्या लागल्याने ती घरी आली होती. या दरम्यान ती काही माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा वापर करत होती....