AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL : आयपीएल स्पर्धेत सर्वात संथ शतक झळकावणारे 5 फलंदाज, विराटचा पहिला नंबर

Slowest Centuries in IPL : आयपीएलमध्ये सर्वात संथ शतक करणारे पाचही फलंदाज भारतीय आहेत. या 5 फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्यासह आणखी कोण कोण आहेत? जाणून घ्या.

IPL : आयपीएल स्पर्धेत सर्वात संथ शतक झळकावणारे 5 फलंदाज, विराटचा पहिला नंबर
RCB Virat Kohli IPL 2026Image Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 17, 2026 | 11:01 PM
Share

क्रिकेट चाहत्यांना कायमच आयपीएल स्पर्धेची प्रतिक्षा असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू हा देशासाठी खेळत असतो. मात्र आयपीएलमध्ये सर्व देशातील खेळाडू वेगवेगळ्या संघांकडून  खेळतात. त्यामुळे आयपीएल स्पर्धेनिमित्ताने खेळाडूंना एक वेगळच चित्र पाहायला मिळतं. या स्पर्धेत धावांचा पाऊस पाहायला मिळतो. आयपीएल म्हटलं की गोलंदाजांची धुलाई हे समीकरण ठरलेलंच आहे. फलंदाज अक्षरक्ष: गोलंदाजांची धुलाई करतात. त्यामुळे बॅटिंगने अनेक विक्रम होत असतात. टी 20 क्रिकेटमध्ये 120 चेंडूंचा खेळ होता. त्यातही शतक करणं म्हणजे मोठी बाब आहे. ख्रिस गेल, रोहित शर्मा विराट कोहली आणि यासारख्या फलंदाजांना फटकेबाजी करताना आपण पाहिलंय. या तिघांनी शतकही झळकावलंय. मात्र या स्पर्धेत सर्वात संथ शतक लगावणाऱ्या 5 फलंदाजांबाबत जाणून घेऊयात.

5 फलंदाज आणि संथ शतक

आयपीएल स्पर्धेत सर्वात संथ शतक लगावण्याचा विक्रम हा संयुक्तरित्या मनीष पांडे आणि विराट कोहली या दोघांच्या नावावर आहे. विराटने 2024 साली 67 चेंडूत शतक झळकावलं होतं. विराटने राजस्थान रॉयल्स विरुद्ध शतक केलं होतं. तर मनीष पांडे याने 2009 मध्ये डेक्कन चार्जर्स विरुद्ध शतक ठोकलं होतं. दोन्ही फलंदाज त्यांच्या स्फोटक बॅटिंगसाठी ओळखले जातात. मात्र त्यांच्या नावावर हा नकोसा विक्रम आहे.

दिग्गज माजी फलंदाज सचिन तेंडुलकर याने 2011 साली कोच्ची टस्कर्स केरळ विरुद्ध शतक केलं होतं. सचिनने 66 चेंडू अर्थात 11 षटकांचा सामना करुन शतक पूर्ण केलं. तर केएल राहुल याने 2016 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध खेळताना 64 बॉलमध्ये शेकडा पूर्ण केला होता. अंबाती रायुडू याने चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध 62 बॉलमध्ये शतक पूर्ण केलं होतं.

आयपीएलमधील सर्वात संथ शतक

विराट कोहली , IPL 2024,67 बॉल

मनीष पांडे , IPL 2009, 67 बॉल

सचिन तेंडुलकर, IPL 2011, 66 बॉल

केएल राहुल, IPL 2019, 64 बॉल

अंबाती रायुडू, IPL 2018, 62 बॉल

वेगवान शतकाचा विक्रम कुणाच्या नावावर?

दरम्यान आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक हे अवघ्या 30 चेंडूत पूर्ण करण्यात आलं होतं. युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल याने ही कामगिरी केली होती. तेव्हापासून हा विक्रम कायम आहे. त्यामुळे यंदा 19 व्या मोसमात विराट आणि इतर फलंदाजांपैकी कोणते फलंदाज गेलचा विक्रम मोडीत काढण्यात यशस्वी ठरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Follow Us
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...