AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 तास काम, कार्यालयातच केला आराम, एलअँडटी कंपनीचे चेअरमन पण उतरले वादात

Working Hours | तरुणाईने देश उभारणीसाठी आठवड्याला 70 तास तरी काम करावे, असा सल्ला इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी दिला. त्यावर देशात सध्या वाद-प्रतिवाद झडत आहे. प्रत्येक उद्योजक त्यावर प्रतिक्रिया देत आहे. आता एलअँडटी कंपनीचे चेअरमन ए. एम. नाईक यांनी पण या वादात उडी घेतली आहे.

15 तास काम, कार्यालयातच केला आराम, एलअँडटी कंपनीचे चेअरमन पण उतरले वादात
| Updated on: Nov 04, 2023 | 9:55 AM
Share

नवी दिल्ली | 4 नोव्हेंबर 2023 : राष्ट्र उभारणीसाठी आणि चीनला मागे टाकण्यासाठी तरुणांनी आठवड्यात किमान 70 तास काम करायला हवे, असा सल्ला नारायण मूर्ती यांनी दिला होता. त्यावरुन देशात मोठे वादंग उठले होते. ही भांडवलशाही मानसिकता असल्याचा ठपका अनेकांनी ठेवला होता. तरुणाईने यांच्यासाठी राबायचे आणि ‘रविवाराचा बाबा’ व्हायचे, अशी खिल्ली पण अनेकांनी केली. अनेक उद्योजकांनी, मानसतज्ज्ञ आणि डॉक्टरांनी मूर्ती यांच्या सल्ल्याला विरोध केला. आता लार्सन अँड टूब्रोचे चेअरमन यांनी त्यांच्या कामाचा अनुभव कथन करत या वादात उडी घेतली आहे. काय म्हणाले ए. एम. नाईक?

15 तास केले काम

शुक्रवारी एका कार्यक्रमात एलअँडटीचे चेअरमन ए एम नाईक यांनी विचार मांडले. त्यांनी त्यांची संघर्षगाथा उलगडली. ऑफिसमध्येच ठाण मांडल्याचे त्यांनी सांगितले. 15 तास काम केल्यावर कार्यालयातील टेबलवर झोपण्याचा किस्सा त्यांनी सांगितला. पाच दशकापूर्वी एलअँडटीला या क्षेत्रातील दादा कंपनी करण्यासाठी त्यांनी कशी मेहनत घेतली. किती तास काम केले याविषयीची माहिती त्यांनी दिली.

वादादरम्यान वक्तव्य चर्चेत

इन्फोसिसचे संस्थापक एन. आर. नारायण मूर्ती यांनी तरुणाईला आठवड्यात 70 तास काम करण्याचा सल्ला दिल्यानंतर देशभरात त्यावर तीव्र प्रतिक्रिया आल्या. तरुणाईने त्यांचा सल्ला झिडकारला. हा चुकीचा पायंडा असल्याचे सांगितले. तर कार्यसंस्कृतीवर अनेकांनी उलट सल्ले दिले. कार्यसंस्कृती जितकी आरोग्यदायी असेल तितके अधिक काम चांगले होत असल्याची टिप्पणी पण अनेकांनी केली. तसेच कामगारांची पिळवणूक करण्याची ही मानसिकता असल्याचा आरोप ही अनेकांनी लावला.

काय सांगितला अनुभव

उमेदीच्या काळात नवतंत्रज्ञान शिकायला मिळावे अशी इच्छा होती. त्यासाठी एलअँडटीमध्ये मेहनत केली. सकाळच्या बैठकीसाठी रात्रभर प्रवास केल्याची आठवण त्यांनी सांगितली. 2017 मध्ये नाईक यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार सोडला असला तरी कंपनीचे कामकाज ते पाहतात. सर्वांच्या मेहनतीमुळे एलअँडटी 4 हजार कोटी रुपये भांडवलावरुन 5 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मार्केट कॅप असलेली कंपनी झाल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यावरुन आता या वादाला फोडणी मिळाली आहे. तरुणाई सध्या अशा सल्ल्यावर तुटून पडल्याचे दिसत आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.