सीबीआयमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, ‘या’ पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी

| Updated on: Apr 25, 2024 | 11:48 AM

CBI Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे भरती प्रक्रियेला सुरूवात झालीये. सरकारी नोकरी करण्याची संधी तुमच्यासाठी चालून आलीये. उशीर न करता उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही जाहिर करण्यात आलीये.

सीबीआयमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या पदांसाठी भरती सुरू, मोठी संधी
CBI
Follow us on

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे बंपर भरती प्रक्रिया सुरू झालीये. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. या भरती प्रक्रियेची अधिसूचना ही देखील प्रसिद्ध करण्यात आलीये. केंद्र शासनाची नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे आहे. सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआयकडून ही भरती प्रक्रिया सुरू आहे. थेट सीबीआयमध्ये नोकरी करण्याची संधी तुमच्याकडे चालून आलीये. केंद्रीय अन्वेषण विभागांतर्गत ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. चला तर मग जाणून घ्या या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया.

या भरती प्रक्रियेबद्दलची सविस्तर माहिती ही आपल्याला https://cbi.gov.in/ या साईटवर आरामात मिळेल. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला 4 मे 2024 अगोदर अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज ही करावी लागणार आहेत.

ही भरती प्रक्रिया पैरवी अधिकारी पदासाठी होत आहे. एकून चार जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराला तीन वर्षांचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज हा आपल्याला ऑफलाइन पद्धतीनेच करावा लागेल.

https://cbi.gov.in/vacancy-list/MQ== येथे आपल्याला भरती प्रक्रियेची जाहिरात देखील वाचायला मिळेल. उमेदवाराने व्यवस्थित जाहिरात वाचूनच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा. सीबीआय सेंट्रल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, 10 वा मजला, प्लॉट क्रमांक सी 35 ए, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे अर्ज करावा.

4 मे 2024 च्या अगोदरच आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधी नक्कीच म्हणावी लागणार आहे. आपल्याला अर्जासोबतच काही कागदपत्रेही द्यावी लागणार आहेत. अपूर्ण कागदपत्रे असतील तर उमेदवाराला ग्राह्य धरले जाणार नाहीये.