AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

EXCLUSIVE : दहावी- बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय विचार केला जातोय?

ssc hsc exam 2021 final timetable : दहावी बारावी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे, मात्र कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत  आहेत. 

EXCLUSIVE : दहावी- बारावी बोर्ड परीक्षांबाबत काय विचार केला जातोय?
Varsha Gaikwad
| Updated on: Mar 04, 2021 | 12:53 PM
Share

मुंबई : मार्च महिना उजाडला तरी दहावी बारावी बोर्ड परीक्षांबाबत (SSC HSC Exams 2021) कोणतीही ठोस घोषणा झाल्याचं दिसत नाही. दहावी बारावी परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे, मात्र कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत  आहेत.  याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Maharashtra Education Minister Varsha Gaikwad) यांनी याप्रकरणी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. (Maharashtra Education Minister Varsha Gaikwad talks about SSC HSC Exam dates 2021)

याबाबत वर्षा गायकवाड म्हणाल्या, “कोरोनाची परिस्थिती आहे त्यात मुलांचं आरोग्य, सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. खूप साऱ्या तज्ज्ञांशी शिक्षण विभाग बोलत आहे. सध्यातरी जी दहावी-बारावी बोर्डाची तारीख दिली आहे त्यानुसारच परीक्षा या ऑफलाईनच होणार आहे”.

ऑगस्टला आम्ही सिलॅबस कमी करून नोव्हेंबरमध्ये बोर्डाचा पेपर पॅटर्न ठरतो, त्याची तपासणी करायचं ठरतं. त्यात गावखेड्यात पेपर पोहोचवायला कमीत कमी दोन महिने लागतात. हे सगळं करत असताना बोर्डाला सुद्धा वेळ लागतो.

बोर्ड परीक्षा पॅटर्नबाबत मागणी केली जातीय ? याबाबत निर्णय घेणार ?

बोर्डाच्या परीक्षांबाबत सूचना, मागण्या काही लोकांनी दिल्या आहेत. मात्र,पेपर पॅटर्न आणि त्यानुसार मार्क्स असतात आणि पेपर त्यानुसार तयार केलेले असतात. त्यात काही गोष्टींची आवश्यकता असेल तर तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन घेऊन निर्णय घेऊ, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

पहिली ते आठवी विद्यार्थी परीक्षा

पुढच्या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी, पुढील वर्गासाठी विद्यार्थ्यांचा यावर्षीचा पाया मजबूत होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अजूनही सुरू राहू द्या ऑनलाईन मुलं शिकत आहेत. त्यामुळे आमचा प्रयत्न विद्यार्थ्यांचं शिक्षण सुरू राहावं, परीक्षेसंदर्भत आम्ही लवकर सांगू, असं वर्षा गायकवाड यांनी नमूद केलं.

10 वी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार

दरम्यान काही दिवसांपूर्वी बोर्डाकडून दहावी-बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. यानुसार माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 10 वीची परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होणार आहे. तर उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच 12 वीची परीक्षा 23 एप्रिल 2021 ते 21 मे 2021 या कालावधीत होणार आहे.  महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावरही 16 फेब्रुवारी 2021 पासून वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.

LIVE TV – 

संबंधित बातम्या 

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, लेखी परीक्षा ऑफलाईनच होणार

दहावीचे विद्यार्थी बिनापरीक्षा पास करण्याचा निर्णय जवळपास निश्चित !

(Maharashtra Education Minister Varsha Gaikwad talks about SSC HSC Exam dates and results 2021)

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....