AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रंगपंचमी खेळल्यानंतर मित्रांसोबत तलावावर अंघोळीला गेला, मात्र परतलाच नाही !

रंगपंचमी खेळल्यानंतर मित्रासोबत तलावात अंघोळीसाठी गेला. मात्र ही अंघोळ त्याची शेवटची ठरली. पाण्याचा अंदाज न आल्याने दहावीचा विद्यार्थी तलावात बुडाला.

रंगपंचमी खेळल्यानंतर मित्रांसोबत तलावावर अंघोळीला गेला, मात्र परतलाच नाही !
तलावात पोहायला गेलेला विद्यार्थी पाण्यात बुडालाImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 08, 2023 | 10:10 AM
Share

भंडारा / तेजस मोहतुरे : रंगपंचमी खेळल्यानंतर गावातील चार मित्र तलावात पोहण्यासाठी गेले होते. यावेळी सर्वजण अंघोळीसाठी पाण्यात उतरले. मात्र पाण्याच्या अंदाज न आल्याने दहावीचा विद्यार्थी पाण्यात बुडाला. मित्रांसोबतची ही रंगपंचमी त्याची अखेरची ठरली. चैतन्य राजेश मुटकुरे असे बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे ऐन सणाच्या दिवशी गावावर शोककळा पसरली आहे. चैतनच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी लाखनी पोलीस ठाण्यात मृ्त्यूची नोंद करण्यात आली आहे.

रंगपंचमी खेळल्यानंतर सर्व मित्र अंघोळीला गेले

मयत चैतन्य हा उज्वल विद्यालय येथे दहावीत शिक्षण घेत होता. रंगपंचमी खेळून गावातील तलावावर चार ते पाच मित्रांसोबत अंघोळीसाठी गेला होता. चैतन्य याने तलावाच्या काठावर कपडे काढून तलावात आंघोळीसाठी उतरला. सोबत चार मित्रही पाण्यात उतरले. चैतन्य हा खोलपाण्यात गेला. पोहायला येत नसल्याने आणि पाण्याचा अंदाज न आल्याने चैतन्य हा पाण्यात बुडू लागला.

मित्रांनी वाचवण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ ठरला

सोबत असलेल्या मित्रांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र चैतन्यला वाचविण्यात यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांनी तलावाजवळ एकच गर्दी केली. घटनेची पोलिसांना देण्यात आली. तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकालाही पाचारण करण्यात आले.

सणाच्या दिवशीच गावावर शोककळा

आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी दाखल होत मृतहाचा शोध सुरू केला. सर्च मोहिम राबवत काही तासातच मृतदेह बाहेर काढण्यात आला. चैतन्य हा सर्वाचा लाडका असल्याने कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला. मृतदेह शवविच्छेदनाकरीता लाखनी येथे पाठविण्यात आला. रंगपंचमीच्या दिवशीच घटना घडल्याने गावात शोकाकूल वातावरण आहे.

Follow Us
मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद
Mohan Bhagwat | मोहन भागवत 15 ऑगस्टला नागपुरात! तरुणांशी साधणार संवाद; भारताच्या उज्ज्वल भविष्यावर मांडणार विचार
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र
रेवती सुळेंच्या रिसेप्शनला मोदी, अमित शाहांसह दिग्गजांची हजेरी, मात्र 'या' नेत्याने फिरवली पाठ, नेमकं कारण...
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
महागाईचा आणखी एक झटका! दूध 2 रुपयांनी महागलं, दही-ताक-पनीरही महागणार?
सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं
tv9 Marathi Special Report | सुप्रिया सुळे 8 खासदारांसह मोदींच्या भेटीला; त्या 15 मिनिटांत काय झालं? संपूर्ण व्हिडिओ बघाच
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी
मोठी बातमी! शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा पेच सुटणार? सुप्रीम कोर्टात आज मोठी सुनावणी; कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर पुढे काय होणार?
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश