AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीची मध्य प्रदेशातून सुटका, 50 हजारासाठी ओळखीच्या महिलेनेच मुलीला विकले !

पुण्यातील 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाली. मुलीचा शोध घेऊनही मुलगी न सापडल्याने घरच्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली.

पुण्यातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीची मध्य प्रदेशातून सुटका, 50 हजारासाठी ओळखीच्या महिलेनेच मुलीला विकले !
बेपत्ता अल्पवयीन मुलीची सुटकाImage Credit source: TV9
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Mar 28, 2023 | 1:35 PM
Share

पुणे / प्रदीप कापसे : पुण्यातून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यास भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. सदल मुलीची मध्य प्रदेशातून सुटका करण्यात आली आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार तिच्या पालकांनी दिली होती. यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. तपासादरम्यान बेपत्ता मुलगी मध्य प्रदेशात असल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने मुलीची सुटका करत मुलीला पालकांच्या ताब्यात दिले. ओळखीच्या महिलेनेच 50 हजार रुपयांसाठी मुलीला विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

आरोपी महिला आणि पीडित मुलगी एकाच ठिकाणी नोकरी करत होत्या

सदर मुलगी एका वर्कशॉपमध्ये काम करीत होती. त्याच वर्कशॉपमध्ये शांती ऊर्फ सन्तो हरनाम कुशवाह ही मूळची मध्य प्रदेशची असलेली महिला काम करत होती. या महिलेने मुलीला तुझ्या आवडता मुलगा मध्यप्रदेश येथे गेला आहे. त्याने तुला लग्नासाठी बोलावले आहे, असे खोटे सांगून फूस लावून मध्य प्रदेशात नेले.

महिलेने लग्नासाठी मुलीला 50 हजारात विकले

धर्मेंद्र यादव याने लग्नासाठी मुलगी आणण्यासाठी आरोपी महिलेला सांगितले होते. यासाठी तिला 50 हजार रुपये देऊ केले होते. त्याप्रमाणे महिला या मुलीला फूस लावून मध्य प्रदेशात घेऊन गेली. तेथे गेल्यानंतर मुलीचे जबरदस्तीने धर्मेंद्र यादव याच्यासोबत लग्न लावून देण्यात आले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुला आणि तुझ्या घरच्यांना जीवे मारू, अशी धमकी मुलीला देण्यात आली होती.

मुलगी बेपत्ता झाल्याप्रकरणी नातेवाईकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवली. तपासादरम्यान मुलगी मध्य प्रदेशात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अप्पर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल पोरात पोलीस उपनिरीक्षक, पोलीस हवालदार रवींद्र चिप्पा, पोलीस शिपाई सागर काँडे, महिला पोलीस शिपाई पूजा लोंढे यांचे पथक मध्यप्रदेश येथे तात्काळ रवाना झाले.

दोघा आरोपींना अटक

पोलिसांना मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील सेवढा येथील ग्यास ग्राम येथील स्थानिक पोलिसांकडून मुलीचे लग्न लावून दिल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने पुणे पोलिसांनी सदर घरावर छापा टाकून मुलीला ताब्यात घेतले.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 363, 366, 376 (2) (आय) (एन) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 6, 8, 17 सह बाल-विवाह प्रतिबंध अधिनियम 2006 चे कलम 9, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सदर महिला आणि लग्न करणारा तरुण दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.

Follow Us
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?
राष्ट्रवादीच्या तिजोरीच्या चाव्या आता पवार कुटुंबाच्या हातात?.
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....