AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला

तिघा तरुणाच्या मृत्यूनं अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी गावावर शोककळा!

अहमदनगर जिल्ह्यातील 'या' गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला
तिघा तरुणांवर काळाचा घालाImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Nov 14, 2022 | 11:32 AM
Share

अहमदनगर : एकाच गावातील तिघा तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नगर जिल्ह्यात (Ahmednagar Accident News) घडली. अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी (Kashti) गावात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृत्यू झालेल्या तरुणांचं वय प्रत्येकी 26,24 आणि 25 वर्ष होतं. काष्टी गावात या तरुणांच्या मृत्यूनंतर (Three Youths killed) एक दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही कळतंय.

कशामुळे मृत्यू?

काष्टी गावातील बाजारतळ परिसरात ऋषिकेश महादेव मोरे, वय 26, स्वप्निल सतिश मनुचार्य, वय 24 आणि गणेश बापू शिंदे, वय 25 हे तिघे दुचाकीवरुन जात होते. काल रात्री दुचाकीवरुन एकत्र जात असतेवेळी वाटेतच काळाने या तिघाही तरुणांवर घाला घातला.

ऋषिकेश, स्वप्निल आणि गणेश या तिघांचाही दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी अंत झाला. गावातील तरुण मुलांचा अपघातात जीव गेल्यानंतर या मुलांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

कसा झाला अपघात?

रविवारी रात्रीच्या सुमारास ऋषिकेश, स्वप्निल आणि गणेश हे तिघे जण दुचाकीवरुन जात होते. यावेळी रस्त्यावर एक ऊसाचा ट्रॅक्टर उभा होता. दौंड पाटस रस्त्यावर त्यांची दुचाकी आली असता दुचाकीवरील तरुणांना समोर उभा असलेला ट्रॅक्टर दिसलाच नाही.

या ट्रॅक्टरला दुचाकी जोरात धडकली. मागून ट्रॅक्टरला दुचाकीने दिलेली धडक इतकी जबर होती, की तिघा तरुणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. याआधीही ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांनी जीव गमावलाय.

लातुरातही नुकताच असाच एक अपघात झाला होता. एका डॉक्टर तरुणाचा गावी घरी जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडक बसल्यानं जागीच जीव घेला होता. आता पुन्हा एकदा तशीच घटना समोर आलीय.

रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर ट्रॉलीला मागे कोणतीही लाईट नसल्यामुळे होणार अपघात चिंता वाढवणारे आहेत. हे अपघात रोखण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रॅक्टर चालकांनीही काळजी घ्यावी, असं आवाहन जाणकारांकडून आता केलं जातंय. ग्रामीण भागातील या वाढत्या अपघातांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जातेय.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.