अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला

तिघा तरुणाच्या मृत्यूनं अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी गावावर शोककळा!

अहमदनगर जिल्ह्यातील 'या' गावातील तिघा तरुणांवर एकाच दिवशी काळाचा घाला
तिघा तरुणांवर काळाचा घालाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 11:32 AM

अहमदनगर : एकाच गावातील तिघा तरुणांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नगर जिल्ह्यात (Ahmednagar Accident News) घडली. अहमदनगर जिल्ह्यातील काष्टी (Kashti) गावात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मृत्यू झालेल्या तरुणांचं वय प्रत्येकी 26,24 आणि 25 वर्ष होतं. काष्टी गावात या तरुणांच्या मृत्यूनंतर (Three Youths killed) एक दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचंही कळतंय.

कशामुळे मृत्यू?

काष्टी गावातील बाजारतळ परिसरात ऋषिकेश महादेव मोरे, वय 26, स्वप्निल सतिश मनुचार्य, वय 24 आणि गणेश बापू शिंदे, वय 25 हे तिघे दुचाकीवरुन जात होते. काल रात्री दुचाकीवरुन एकत्र जात असतेवेळी वाटेतच काळाने या तिघाही तरुणांवर घाला घातला.

ऋषिकेश, स्वप्निल आणि गणेश या तिघांचाही दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी अंत झाला. गावातील तरुण मुलांचा अपघातात जीव गेल्यानंतर या मुलांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय.

हे सुद्धा वाचा

कसा झाला अपघात?

रविवारी रात्रीच्या सुमारास ऋषिकेश, स्वप्निल आणि गणेश हे तिघे जण दुचाकीवरुन जात होते. यावेळी रस्त्यावर एक ऊसाचा ट्रॅक्टर उभा होता. दौंड पाटस रस्त्यावर त्यांची दुचाकी आली असता दुचाकीवरील तरुणांना समोर उभा असलेला ट्रॅक्टर दिसलाच नाही.

या ट्रॅक्टरला दुचाकी जोरात धडकली. मागून ट्रॅक्टरला दुचाकीने दिलेली धडक इतकी जबर होती, की तिघा तरुणांचा या भीषण अपघातात मृत्यू झाला. याआधीही ऊसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडकल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांनी जीव गमावलाय.

लातुरातही नुकताच असाच एक अपघात झाला होता. एका डॉक्टर तरुणाचा गावी घरी जात असताना ट्रॅक्टर ट्रॉलीला मागून धडक बसल्यानं जागीच जीव घेला होता. आता पुन्हा एकदा तशीच घटना समोर आलीय.

रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर ट्रॉलीला मागे कोणतीही लाईट नसल्यामुळे होणार अपघात चिंता वाढवणारे आहेत. हे अपघात रोखण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली आणि ट्रॅक्टर चालकांनीही काळजी घ्यावी, असं आवाहन जाणकारांकडून आता केलं जातंय. ग्रामीण भागातील या वाढत्या अपघातांवर तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जातेय.

Non Stop LIVE Update
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.