Amravati Accident : लग्नाची वरात घेऊन जाणारे वाहन पलटी, एकाचा जागीच मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी

| Updated on: May 09, 2022 | 9:42 PM

धारणी मुख्यालयापासून 50 किमी अंतरावर असलेल्या राणीगाव येथून आज सायंकाळी 407 क्रमांकाचे सीजी 15 एसी 0116 हे वाहन मध्य प्रदेशच्या दिशेने जात होते. याच वाहनाला हा भीषण अपघात होऊन ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात सध्या शोककूल वातावरण आहे.

Amravati Accident : लग्नाची वरात घेऊन जाणारे वाहन पलटी, एकाचा जागीच मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी
लग्नाची वरात घेऊन जाणारे वाहन पलटी, एकाचा जागीच मृत्यू तर काहीजण गंभीर जखमी
Image Credit source: tv9
Follow us on

अमरावती : गेल्या काही दिवसांत अमरावती (Amravati) जिल्ह्यातील अपघातांचे (Accident) प्रमाण वाढले आहे. आजही असाच एक अपघात घडलाय. ज्यात पुन्हा एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. मेळघाटातील (Melghat) राणीगाव येथून मध्यप्रदेशकडे लग्नाची वरात घेऊन जाणारे 407 ट्रक वाहन राणीगाव घाटात उलटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने या परिसरात सध्या खळबळ माजली आहे. या अपघातात 407 मध्ये बसलेले 7 ते 8 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत असून या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. धारणी मुख्यालयापासून 50 किमी अंतरावर असलेल्या राणीगाव येथून आज सायंकाळी 407 क्रमांकाचे सीजी 15 एसी 0116 हे वाहन मध्य प्रदेशच्या दिशेने जात होते. याच वाहनाला हा भीषण अपघात होऊन ही दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे परिसरात सध्या शोककूल वातावरण आहे.

कसा घडला हा अपघात?

घाटाचे रस्ते अनेकदा अत्यंत जाचक आणि जीवघेणे ठरत असतात. तसाच काहीसा प्रकार आजही समोर आला आहे. घाटात जाताना वाहन पलटी झाल्याने हा भयंकर अपघात घडला आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं. कारण यात 55 वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. हच नाही तर याच अपघातात सुमारे 7 ते 8 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व जखमींना उपचारा साठी रुग्णालयात पाठवले असल्याचीही माहिती समोर आली आहे. सायंकाळपर्यंत आरोग्यवाहनात जखमीना उपकेंद्राकडे पाठविणे सुरूच होते. काण या भागातील रस्ते खराब असल्याने रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणेही कठीण होऊन बसले होते. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.

रस्ते खरब असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले

मेळघाट या भागात अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. या भागात मदत पोहोचवणेही तात्काळ शक्य होत नाही. त्यामुळे हे अनेकांच्या जीवावर बेतताना दिसून येत आहे. असे काही अपघात आधीही या भागात घडले आहेत. त्यामुळे या भागातील रस्ते दुरुस्त करण्याची मागणीही स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. तसेच घाटातील रस्त्यावर वाहन जपून न चालवल्यास किती विपरीत परिणाम घडू शकतो हेही पुन्हा एकादा या घटनेने अधोरेखित केले आहे. त्यामुळे घाटातील रस्त्यावर वाहनावर चालकांचे योग्य नियंत्रण असणे गरजेचे असते तरच असे प्रकार टाळता येतात. आता या घटनेने मेळघाटातील रस्त्यांचा प्रश्नही पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हे सुद्धा वाचा