AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kidnapping | लग्नाच्या काही तास अगोदर वधूचे अपहरण, पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल, वाचा नेमके काय घडले!

लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. नातेवाईकांपासून ते समाजातील सर्व लोक उपस्थित होते, मात्र त्यानंतर त्यांच्या मुलीचे अपहरण झाले. याप्रकरणी फारबिसगंजचे एसडीपीओ रामपुकर सिंह यांनी सांगितले की, ही गोदिहरे येथील घटना आहे. 22 जून रोजी वरात येणार होती. मात्र त्यापूर्वीच गावातील तरुणाने वधूचे अपहरण केले.

Kidnapping | लग्नाच्या काही तास अगोदर वधूचे अपहरण, पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल, वाचा नेमके काय घडले!
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 29, 2022 | 12:10 PM
Share

बिहारमधील (Bihar) फारबिसगंज जिल्ह्यातील गोदीहरे येथे एक विचित्र घटना घडलीयं. वरात दारात येण्यापूर्वीच वधूचे अपहरण करण्यात आले. पहाटे तीन वाजेपर्यंत वराच्या मंडळींनी वधूची वाट पाहिली. ही घटना 22 जूनची आहे. लग्नाच्या काही तास अगोदरच वधूचे अपहरण (Kidnapping) करण्यात आले. वधूची आई पिंकी देवी यांनी सांगितले की, त्यांनी मुलीच्या लग्नाची सर्व तयारी केली, लग्नाची वरात येणार होती. खूप आनंदामध्ये सर्वकाही सुरू होते. पण तेवढ्यात गावातील एका तरुणाने आपल्या मुलीला आमिष (Bait) दाखवून पळवून नेले.

नातेवाईकांकडून पैसे घेत मुलीच्या लग्नाची तयारी

मुलीच्या आईने सांगितले की, काही लोकांनी तिच्या मुलीला चहा प्यायला लावला. त्यानंतर तिचे अपहरण करण्यात आले. अपहरणकर्त्यांनी 24 तासांत मुलगी परत करू, असे सांगितले होते. आम्ही वाट पाहत राहिलो, पण तसे झाले नाही. नवरदेवाकडील पहाटे तीन वाजेपर्यंत वधूची वाट पाहत होते, मात्र त्यानंतर ते निघून गेले. मुलीचे वडील संजय पासवान यांनी सांगितले की, मुलीच्या लग्नासाठी त्यांनी मोठी तयारी केली होती. इकतेच नाही तर आपल्या मुलीच्या लग्नात काही कमी पडू नये, म्हणून नातेवाईकांकडून देखील पैसे घेतले होते.

फारबिसगंजचे एसडीपीओ रामपुकर सिंह यांनी सांगितले की…

लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती. नातेवाईकांपासून ते समाजातील सर्व लोक उपस्थित होते, मात्र त्यानंतर त्यांच्या मुलीचे अपहरण झाले. याप्रकरणी फारबिसगंजचे एसडीपीओ रामपुकर सिंह यांनी सांगितले की, ही गोदिहरे येथील घटना आहे. 22 जून रोजी वरात येणार होती. मात्र त्यापूर्वीच गावातील तरुणाने वधूचे अपहरण केले. गावातील सौनू कुमारवर मुलीला पळवून नेल्याचा आरोप आहे. त्याचे वडील दारूचा व्यवसाय करतात. पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवून पोलिस कारवाई करत आहेत. यासंदर्भात आजतकने दिला सविस्तर रिपोर्ट.

Follow Us
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
Rahul Narwekar | आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य; सुप्रीम कोर्टात निर्णय....
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
मुख्यमंत्री फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची पुन्हा भारताला धमकी
‘सिंधूचं पाणी आमची रेड लाईन’; पाकिस्तानचे PM शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'-दिपके
‘गावातील शाळांना सुविधा मिळेपर्यंत स्वातंत्र्याचं स्वप्न अपूर्ण'- अभिजीत दिपके
जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन
Chandrashekhar Bawankule | जमिनीच्या वादात अडकलेल्यांसाठी मोठी बातमी! सरकारचा मेगा प्लॅन; चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा, म्हणाले...
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीक नको’
जरांगेंच्या टीकेनंतर बावनकुळे भावुक; प्रसाद लाड म्हणाले, ‘वैयक्तिक टीका नको’
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल : "शिंदेंच्या जीवावर खासदार
मनिषा कायंदे यांचा संजय राऊतांवर हल्लाबोल :
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: सामंतांवर हल्लाबोल
राजकीय उद्योग सोडून उद्योजकांकडे लक्ष द्यावे: रोहित पवारांचा उद्योगमंत्री सामंतांवर हल्लाबोल