लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच संसारात विष, नवऱ्यासह कुटुंबातील सर्वांना विष पाजून मुद्देमाल घेऊन नवरी फरार

| Updated on: Mar 02, 2022 | 5:47 PM

एका नवरीने (Bride) लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी असा मोठा कांड केलाय की ते पाहून तुम्हीही अचंबित व्हाल. आरोपी नवरीनं पतीसह संपूर्ण कुटुंबाला जेवणातून विष (Poison) दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय.

लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच संसारात विष, नवऱ्यासह कुटुंबातील सर्वांना विष पाजून मुद्देमाल घेऊन नवरी फरार
नालासोपाऱ्यात रेल्वे स्थानकात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक
Follow us on

जयपूर : लग्न (Marriage) हा प्रत्येकासाठी एक अनमोल टप्पा असतो. जो पार केल्यानंतर एक सुखी संसार सुरू होतो. लग्नानंतर दोन जीव एकत्र येत नवी सुरूवात करतात. मात्र हेच लग्न एखाद्यासाठी कधीही न विसरणारे भयानक स्वप्न बनू शकते. एका नवरीने (Bride) लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी असा मोठा कांड केलाय की ते पाहून तुम्हीही अचंबित व्हाल. आरोपी नवरीनं पतीसह संपूर्ण कुटुंबाला जेवणातून विष (Poison) दिल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. एवढं करूनही ती थंबली नाही तर घरातील सर्व दागिने, रक्कम आणि मोबाइल घेऊन पसार झालीय. त्यामुळे या घटनेने राज्यस्थान हादरून गेलंय. या घटनेने परिसरात दहशत पसरवलीय. शेजारच्यांनी हा प्रकार पाहिला त्यावेळी त्यांनाही धक्का बसला. त्यांनंतर तातडीने या कुटुंबियांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे मोठा धोका टाळणे शक्य झाले आहे.

जेवणातून विष दिलं

हा चक्रावून सोडणार प्रकार जयपूर (Jaipur) जिल्ह्यातील कोटपूतली येथील आहे. कोटपूतलीच्या कृष्णा टॉकीज परिसरातील पटवा गल्लीत राहणाऱ्या एका कुटुंबातील मुलाचं 22 फेब्रुवारी रोजी लग्न पार पडलं. दोघांच्या घरच्यांनी एका मंदिरात हा विवाहसोहळा उरकला. लग्न झाल्यानंतर नववधू पूजा पतीसोबत सासरी नांदायला गेली होती. मात्र तिच्या मनात काय सुरू आहे याचा ठाव कुणालाही लागला नाही, मात्र नंतर जे घडलं त्यानं सगळ्याचीच झोप उडवली. लग्नानंतर दुसऱ्या रात्री वधू पूजानं सर्वांसाठी जेवण बनवलं. मात्र त्या जेवणात विष होते. हे जेवण साधगिरीने तिने न घाता घरच्यांना खाऊ घातलं. आणि त्यानंतर हा प्रकार समोर आला.

कोणतीही जीवतहानी नाही

रात्री जेवण केल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला गुंगी आली. काही वेळातच हे कुटुंब बेशुद्ध झालं. कुटुंब बेशुद्ध होताच नवरीने घरावर हात साफ करत सर्व मुद्देमाल तुटला आणि फरार झाली. दुसऱ्या दिवशी या शेजारच्यांना संशय आला. कारण कुणीही बाहेर दिसेना. त्यानंतर त्यांनी धाव घेत चौकशी केली. तेव्हा त्यांनाही धक्का बसला. मात्र लवकर हलचाली करून या कुटुंबाला रुग्णालयात दाखल केल्याने कुणाच्याही जीवावर बेतलं नाही, हे महत्वाचं. पोलिसांनी या ठग नवरीचा शोध सुरू केलाय. लवकच पोलिसांच्या हाती काही महत्वाचे धागेदोर लागण्याची शक्यता आहे.

Nashik | पाटाच्या पाण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला; मंत्री दानवेंचा नातेवाईक असल्याची चर्चा

ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीनचिट? NCBने दिलं स्पष्टीकरण

अजितदादांच्या पीएशी ओळख असल्याचा बनाव, पुण्यात तरुणाला दहा लाखांचा गंडा