Nashik | पाटाच्या पाण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला; मंत्री दानवेंचा नातेवाईक असल्याची चर्चा

अभिषेक कैलास खरात हा नाशिकमधील के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सच्या शेवटच्या वर्गात शिकत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अभिषेक बेपत्ता होता. तशी तक्रार अभिषेकचा चुलत भाऊ सूरज खरात याने आडगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिषेक याचा शोध सुरू केला होता.

Nashik | पाटाच्या पाण्यात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडला; मंत्री दानवेंचा नातेवाईक असल्याची चर्चा
नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडालीय.
Follow us
| Updated on: Mar 02, 2022 | 4:01 PM

नाशिकः नाशिकमध्ये इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह पाटाच्या पाण्यात सापडल्याने खळबळ निर्माण झाली आहे. हा घातपात आहे की, आत्महत्या याची चर्चा सुरूय. अभिषेक खरात (Abhishekh Kharat) असे त्या विद्यार्थ्याचे नाव असून, तो केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Ravsaheb Danave) यांचा नातेवाईक असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. तालुक्यातील सय्यैद पिंप्री (Sayyad Pimpri) येथील पाटाच्या पाण्यात हा मृतदेह सापडल्याचे समजते. यानंतर ग्रामीण पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत या विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढला. सध्या शवविच्छेदनासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, मृत्यू कशाने झाला हे अजूनस समोर आले नाही.

नेमके प्रकरण काय?

अभिषेक कैलास खरात हा नाशिकमधील के. के. वाघ इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सच्या शेवटच्या वर्गात शिकत होता. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून अभिषेक बेपत्ता होता. तशी तक्रार अभिषेकचा चुलत भाऊ सूरज खरात याने आडगाव पोलीस ठाण्यात दिली होती. त्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिषेक याचा शोध सुरू केला होता. मात्र, आज सकाळी अकराच्या सुमारास तालुक्यातील सय्यैद पिंपरी येथे पाटाच्या पाण्यात एका मुलाचा मृतदेह सापडला.

प्राथमिक अंदाज काय?

पाटाच्या पाण्यात मृतदेह सापडल्याची बातमी पोलिसांना कळवण्यात आली. पोलिसांनी येऊन पाहणी केली असता, हा मृतदेह बेपत्ता अभिषेक खरात याचा असल्याचे समोर आले. त्यांनी हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. अभिषेकने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. मात्र, तपास केल्याशिवाय ठोस निष्कापर्यंत पोहचता येणार नसल्याचेही सांगितले आहे. दरम्यान, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा विद्यार्थी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा नातलग असल्याचे समजते.

पालकांनो मुलाकडे लक्ष ठेवा

अभिषेकने आत्महत्या केली की, घातपात हे समोर येईलच. मात्र, इतर पालकांनीही आपल्या मुलांकडे लक्ष ठेवायला हवे. आपला मुलगा काय करतो, तो कॉलेजला जातो का, त्याचे मित्र कोण आहेत, त्याची संगत कशी आहे, त्याच्या सवयी काय आहेत याची माहिती त्यांना असावी. मुलगा आणि पालकांमध्ये मैत्रीचे नाते असेल, तर आपण आपल्या मुलांना कोणत्याही परिस्थितीतून आणि संकटातून बाहेर काढू शकतो, अन्यथा उशीर झाल्यानंतर काहीही करू शकणार नाही.

इतर बातम्याः

Nashik | गाडगेबाबांच्या धर्मशाळेत 85 वर्षांपासून अविरत अन्नछत्र; वंचिताचा अनोखा आधारवड!

कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या साहित्य संमेलनाचा हिशेब द्या; नाशिकमध्ये निमंत्रकांना घरचा आहेर

Nashik Corona | कोरोना संपलाय म्हणता ना, पण नाशिकमध्ये पुन्हा 10 मृत्यू!

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.