AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भावा-भावांमधील वाद टोकाला गेला अन्…; असे काय झाले की रक्ताचे नातेच जीवावर उठले !

खुंटी जिल्ह्यातील मुंडा टोली गावातील कानू मुंडा याचा आपला चुलत भाऊ सागर मुंडा याच्याशी जमिनीवरुन वाद सुरु होता. या वादातून सागर मुंडा याने कानूच्या हत्येचा कट रचला.

भावा-भावांमधील वाद टोकाला गेला अन्...; असे काय झाले की रक्ताचे नातेच जीवावर उठले !
जमिनीच्या वादातून भावाकडून भावाची हत्याImage Credit source: tv9
| Updated on: Dec 05, 2022 | 6:04 PM
Share

खुंटी : जमिनीच्या वादातून भावानेच भावाची अपहरण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील खुंटी जिल्ह्यात घडली आहे. हत्येनंतर मृतदेहाचे दोन तुकडे करत वेगवेगळ्या ठिकाणी गाडले. हत्येनंतर सर्व आरोपी ओडिसाला पळून जाण्याच्या तयारीत होते. मात्र त्याआधीच सिमडेगा पोलिसांच्या मदतीने खुंटी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली. या हत्याकांडात एका महिलेचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले. कानू मुंडा असे मयत तरुणाचे नाव आहे.

जमिनीच्या वादातून हत्या

खुंटी जिल्ह्यातील मुंडा टोली गावातील कानू मुंडा याचा आपला चुलत भाऊ सागर मुंडा याच्याशी जमिनीवरुन वाद सुरु होता. या वादातून सागर मुंडा याने कानूच्या हत्येचा कट रचला. यासाठी सागरने आपल्या दोन साथीदारांसह 1 डिसेंबर रोजी राहत्या घरातून कानूचे अपहरण केले.

अपहरण केल्यानंतर कानूची धारदार शस्त्राने गळा चिरत हत्या केली. हत्येनंतर मृतदेहाचे दोन तुकडे केले. शिर डुलवा टोंगरी येथील पैलोल डॅमजवळ नाल्यात गाडले. तर धड तेथून 15 किमी दूर गोपला जंगलात गाडले.

पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपींना अटक

घटनेनंतर सागर मुंडा आणि त्याची पत्नी चंदमणी गुडिया, भाऊ सीनू मुंडा, अमरजीत पूर्ती, जयमसिह ओडेया आणि अनमोल तुती हे बोलेरो कारमधून ओडिसात पळून जात होते. मात्र खुंटी पोलिसांनी सिमडेगा पोलिसांच्या मदतीने बिरदा ओपी गावातून सर्वांना अटक केली.

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सदर ठिकाणी दाखल होत मृतदेहाचे शीर आणि धड ताब्यात घेतले. तसेच हत्येत वापरलेली बोलेरो गाडी आणि कुदळही ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून कानूचा मोबाईलही जप्त करण्यात आला आहे.

हत्या करुन जमिन हडपण्याचा कट होता

मुंडा बंधूंच्या आजोबांची खुंटी शहरातील उच्चभ्रू परिसरात जमिन होती. सांगर मुंडा ही जमिन विकू इच्छित होता. मात्र कानू मुंडाचा जमिन विकण्यास नकार होता. याच कारणातून दोघांमध्ये वाद सुरु होता.

याच वादातून सागरने कानूची हत्या करुन जमिन हडपण्याचा कट रचला. यासाठी त्याने साथीदारांच्या मदतीने कानूचे अपहरण केले. त्यानंतर डोंगराळ परिसरात आधी त्याला जबर मारहाण केली. मग धारदार शस्त्राने गळा चिरुन त्याची हत्या केली. यानंतर शीर आणि धड वेगळे करत शीर हातात घेऊन फोटोही काढला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.