AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रागाच्या भरात भावाने केलं असं कृत्य…; परळीतील धक्कादायक घटनेने शेतकरी हादरले

परळी तालुक्यातील सारडगाव येथे कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना घडली. एका भावाने दुसऱ्या भावाच्या तीन एकर कपाशीच्या पिकावर तणनाशक फवारून ते नष्ट केले. पीडित शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले. पोलिसांनी आरोपी भावावर गुन्हा दाखल केला आहे.

रागाच्या भरात भावाने केलं असं कृत्य...; परळीतील धक्कादायक घटनेने शेतकरी हादरले
parli famer
| Updated on: Aug 06, 2025 | 2:51 PM
Share

परळी तालुक्यातील सारडगाव येथे कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडवून दिली आहे. कौटुंबिक वादामुळे मनात राग धरून एका भावानेच आपल्या दुसऱ्या भावाच्या शेताचे नुकसान केले आहे. त्याने शेतातील ३ एकर कपाशीच्या पिकावर तणनाशकाची फवारणी करून ते पूर्णतः नष्ट केले आहे. या घटनेमुळे पीडित शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तो आर्थिक संकटात सापडला आहे.

नेमकी घटना काय?

परळीतील सारडगाव येथील शेतकरी नारायण नवनाथ गोल्हेर यांनी गट क्रमांक ७६ आणि २११ मधील आपल्या ३ एकर शेतीत मोठ्या मेहनतीने कपाशीची लागवड केली होती. पिकाची स्थिती अत्यंत चांगली होती. त्याला भरपूर बोंडंही लागली होती. नारायण गोल्हेर यांनी या पिकासाठी आतापर्यंत सुमारे दीड लाख रुपये खर्च केले होते. यातून त्यांना पाच ते साडेपाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती.

मात्र, याच दरम्यान नारायण गोल्हेर आणि त्यांचे भाऊ शिवाजी नवनाथ गोल्हेर यांच्यात कौटुंबिक वाद सुरू होते. याच वादातून सूडबुद्धीने शिवाजी गोल्हेर याने रात्रीच्या वेळी शेतात प्रवेश करून ‘राऊंड अप’ नावाचे तणनाशक मोठ्या प्रमाणात कपाशीच्या पिकावर फवारले. या विषारी फवारणीमुळे डोळ्यादेखत संपूर्ण कपाशीचे पीक करपून नष्ट झाले.

गुन्हा दाखल, प्रशासनाकडे मदतीची मागणी

या धक्कादायक घटनेनंतर पीडित शेतकरी नारायण गोल्हेर यांनी तात्काळ परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपी शिवाजी गोल्हेर यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम ३२४, ३५२/२, आणि ३५१/३.३/५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गंभीर नुकसानीमुळे हवालदिल झालेल्या नारायण गोल्हेर यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली आहे.

“माझ्या तीन एकर शेतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ पंचनामा करून मला योग्य ती आर्थिक मदत द्यावी,” अशी विनंती त्यांनी केली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, भावानेच केलेल्या या कृत्यामुळे कौटुंबिक संबंधांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.