AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतीच्या वादातून दोघांची हत्या, मिरची पावडर टाकली आणि मग…, 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Buldhana crime news : शेतीच्या वादातून दोन कुटुंबामध्ये जोरदार वाद झाला. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे हे सगळं करीत असताना सुरुवातीला आरोपींनी डोळ्यात मिरची पूड टाकली.

शेतीच्या वादातून दोघांची हत्या, मिरची पावडर टाकली आणि मग..., 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
buldhana crime newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 03, 2023 | 11:05 AM
Share

गणेश सोळंकी, बुलढाणा : देशात शेतीच्या वादामुळे भावाभावात भांडण झाल्याचं नवीन नाही. अनेकदा दोन कुटुंबात झालेल्या वादात अनेकांचा जीव सुध्दा गेला आहे, अशीचं घटना नुकतीचं बुलढाणा (maharashtra buldhana) जिल्ह्यात घडली आहे. त्यामुळे अनेकांना धक्का लागला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल दाखल केला आहे. त्यापैकी आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाची पोलिस (buldhana police) कसून चौकशी करणार आहेत. शेतीच्या वादातून दोघांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही कुटुंब एकमेकांचे नातेवाईक असल्याची माहिती तिथल्या स्थानिकांनी दिली आहे. ही घटना घडल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे. वरिष्ठ पोलिसांनी (Buldhana Crime news) या प्रकरणाची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शेतीच्या वादातून दोघांचा खून झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील चींचपूर येथील ही घटना आहे. ज्यावेळी दोघांची हत्या करण्यात आल्याची माहिती जिल्ह्यात पसरली. त्यावेळी एकच खळबळ उडाली होती. हिवरखेड पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, तर 7 जणांना अटक केली आहे.

नेमकं काय झालं

बुलढाणा जिल्ह्यात शेतीच्या वादातून दोन जणांचा खून करण्यात आला आहे. खामगाव तालुक्यातील चिंचपूर गावात शेतीच्या जुन्या वादातून दोन जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी हिवरखेड पोलिसांनी संशयित तब्बल 9 जणांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत.

त्यापैकी पोलिसांनी काल 7 जणांना अटक केली. शेतीच्या मालकीवरुन दोन कुटुंबात वाद झाला आहे. काल सुध्दा ज्यावेळी वाद झाला, त्यावेळी दोन्हीकडून संघर्ष झाल्यामुळे वाद विकोपाला गेला. त्यावेळी संशयित आरोपीनी दोघांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर शस्त्राने त्यांच्या शरिरावर वार केले. त्यामध्ये मोहम्मद खा शेख तुराबखा आणि शेख कासम शेख जान मोहमद या दोघांना मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. दोन्ही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

Follow Us
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा...
इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग, पोलिसांनी सापळा....
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले...
अचानक बदललं हवामान! डोंबिवलीत वाऱ्याचा तडाखा; शहरभर धुळीचे ढग पसरले....
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच...
एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात अडकलं, 25 मिनिटे हवेतच....
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहतायत? सुषमा अंधारेंची बोचरी टीका.
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर...
थरकाप उवणारी घटना, तब्बल 22 तास मृत बाळ गर्भात ठेवलं नंतर....
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी
आदिती तटकरे राजीनामा द्या, पुणे अत्याचार प्रकरणानंतर अंधारेंची मागणी.
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी...
विजय थलपती यांच्यासाठी मुख्यमंत्रिपद अजूनही दूरच? राज्यापलांनी....
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज ठाकरेंच्या भेटीचं गूढ उकललं, स्वतःच.
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार.....
सामनातील वृत्तावरून राजकारण तापलं; रितू तावडेंचा जोरदार पलटवार......
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात...
मोठी बातमी! नसरापूरमधील अत्याचार प्रकरणावर सुनावणी पूर्ण, कोर्टात....