AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन

FCRA बिलावर सुप्रिया सुळे आक्रमक; आमच्यावर लादू नका, आधी चर्चा करा! सरकारला थेट आवाहन

| Updated on: Aug 08, 2026 | 4:32 PM
Share

राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी FCRA बिलाला पक्षाचा विरोध असल्याचे सांगत केंद्र सरकारला घाई न करण्याचे आवाहन केले. सरकारने या विधेयकावर सर्व पक्षांशी चर्चा करावी आणि लोकशाही मार्गाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार आणि नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज पत्रकार परिषद घेत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी FCRA बिलाला पक्षाचा विरोध असल्याचे सांगत केंद्र सरकारला घाई न करण्याचे आवाहन केले. सरकारने या विधेयकावर सर्व पक्षांशी चर्चा करावी आणि लोकशाही मार्गाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली.

FCRA बिलाबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “FCRA बिल आमच्यावर लादू नका. चर्चा करून योग्य मार्ग काढला पाहिजे.” चुकीचे किंवा बेकायदेशीर पैसे, ड्रग्सचे पैसे किंवा इतर गैरप्रकारातून आलेल्या निधीला निश्चितच विरोध केला पाहिजे, मात्र काही लोक चांगल्या उद्देशाने मदत करू इच्छित असतील तर त्यांच्याकडे वाईट नजरेने का पाहायचे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या विषयावर सरकारसोबत संयुक्त चर्चा करण्यास आपला पक्ष तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, डिलिमिटेशन बिलाबाबतही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. डिलिमिटेशनचे विधेयक अद्याप आलेलेच नाही, त्यामुळे त्यावर सध्या भूमिका मांडण्याचा प्रश्न नसल्याचे त्यांनी सांगितले. इंडिया आघाडीची दररोज सकाळी बैठक होत असून, या बैठकीत चर्चा केल्यानंतरच पक्षाकडून कोणत्याही मुद्द्यावर भूमिका घेतली जाते, असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले.

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारने अनेक नियम आणि अटी घातल्या आहेत, मात्र ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी अशा प्रकारचे नियम का लागू केले जात नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारचा हा असंवेदनशीलपणा असल्याची टीका करत, अशा योजना केवळ निवडणुकीपुरत्या मर्यादित राहू नयेत, असेही त्या म्हणाल्या.

FCRA बिलाला विरोध, डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर इंडिया आघाडीची भूमिका आणि शेतकरी कर्जमाफीवरून राज्य सरकारवर केलेली टीका यामुळे सुप्रिया सुळे यांच्या पत्रकार परिषदेची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांच्या या वक्तव्यांवर केंद्र आणि राज्य सरकारकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.

Published on: Aug 08, 2026 04:27 PM

Follow Us